शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Tiwari : "शिवीगाळ केली, वाहनांवर हल्ला"; मनोज तिवारींच्या रोड शोमध्ये प्रचंड गोंधळ, RJD वर गंभीर आरोप
2
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या RSS वर बंदी घालण्याच्या मागणीवर अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
3
शाहरुख खानचा वाढदिवस, 'मन्नत'बाहेर चाहत्यांची तुफान गर्दी; युके-जपानवरुनही आले फॅन्स
4
विशेष लेख | फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरण: आफ्टर डेथ पॉलिटिकल स्टोरी !
5
"मी अवतारात आले आहे...'; शर्ट परिधान करुन रेड कार्पेटवर आली प्राजक्ता माळी, व्हिडीओ व्हायरल
6
दुलारचंद यादव हत्याकांड: नाट्यमय घडामोडींनंतर अनंत सिंह यांना अटक, रात्री पोहोचले पोलीस, त्यानंतर...
7
कार्तिक सोमप्रदोष व्रत २०२५: महादेव प्रसन्न होतील, सर्व मनोकामना पूर्ण करतील; ‘असे’ करा व्रत!
8
इस रात की सुबह नही ! मुंबईतील 'ओलीस नाट्य' म्हणजे आभासी वेडेपणाचे भेसूर प्रतिबिंब
9
आजचे राशीभविष्य, ०२ नोव्हेंबर २०२५: हाती पैसा, यश-कीर्ती लाभेल; पण हट्टीपणा सोडावा
10
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभच लाभ, पद-पैसा वाढ; ६ राशींना काहीसा ताप, तुमची रास कोणती?
11
एक काेटी वाहनांना नाही ‘हाय सिक्युरिटी नंबरप्लेट’! एकूण ६८.२४ लाख चालकांनी दिला प्रतिसाद
12
महिला वर्ल्डकप: आज घडणार इतिहास; प्रथमच जिंकेल भारत किंवा दक्षिण आफ्रिका; उत्सुकता शिगेला
13
कुष्ठरोगाचे निदान झाले रे झाले की, रुग्णनाेंद बंधनकारक; सार्वजनिक आरोग्य विभागाचा निर्णय
14
कसली थंडी..? आता अनुभवा ‘नोव्हेंबर हीट’! मुंबईसह राज्यभरात अवकाळी पावसाचीही शक्यता
15
आयोगाचा सर्व्हर कुणाच्या कार्यालयात? कुणाची नावे काढायची, कुठली टाकायची हा कट सुरू: ठाकरे
16
चार हजार ग्राहकांनी वाढवली २२ मेगावॅट क्षमता; २ हजार ४६० औद्योगिक ग्राहकांचाही समावेश
17
मूक आंदोलन करून भाजपने केला पलटवार! ...हा तर मविआचा नवा कट- रवींद्र चव्हाण
18
जय हरी विठ्ठल.. एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
19
दुबार मतदार दिसताच बडवा; मविआ-मनसेचा महाएल्गार! मतदार यादीतील घोळाबाबत मुंबईत निषेध मोर्चा
20
गाव पोटा.. व्यवसाय शेती अन् वालेगावकर दाम्पत्याला मिळाला उपमुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान

LOC वर भारताकडून पाकला सडेतोड प्रत्युत्तर; अनेक चौक्या केल्या उद्ध्वस्त 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2019 19:50 IST

बॉर्डरवर पाकिस्तानच्या नापाक हरकती सुरु असून भारतीय जवानही पाकच्या हल्ल्याला आक्रमक उत्तर देत आहेत

नवी दिल्ली - भारत-पाक यांच्यातील तणाव वाढल्यामुळे पाकिस्तानकडून सीमेवर गोळीबार सुरु आहे.  मात्र पाकच्या गोळीबारीला भारताकडून जशास तसं प्रत्युत्तर देणं सुरु आहे. जम्मू काश्मीरच्या कृष्णा घाटी, मेंढर सेक्टरमध्ये पाककडून गोळीबार सुरु आहे. पाकच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतानेही आक्रमक भूमिका घेतली आहे. भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या अनेक चौक्या उद्ध्वस्त केल्या आहेत. त्यात पाकिस्तानी सैन्यातील जवानही मारले गेल्याची माहिती आहे. 

मंगळवारी दुपारी पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारात भारतीय जवान रवी रंजन कुमार सिंह शहीद झाले आहेत. ३६ वर्षीय रवी रंजन कुमार हे बिहारच्या गोप बीघा गावात राहणारे आहेत. त्यांच्यामागे त्यांची पत्नी रिता देवी आणि मुलं असं कुटुंब आहे. 

बॉर्डरवर पाकिस्तानच्या नापाक हरकती सुरु असून भारतीय जवानही पाकच्या हल्ल्याला आक्रमक उत्तर देत आहेत. काही दिवसांपूर्वीच जम्मू काश्मीरच्या नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केलं होतं. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी राजौरी सेक्टरमध्ये पाक सेनेची एक चौकी उद्ध्वस्त करण्यात आली. पाककडून वारंवार होणाऱ्या हल्ल्याला भारताने जशास तसे उत्तर देण्याचं ठरवलं आहे. १५ ऑगस्टच्या दिवशीही जम्मू काश्मीरच्या पूंछ भागात पाकिस्तानकडून दिवसभर गोळीबार सुरु होता. उरी आणि राजौरी या भागात पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आलं. त्यावेळी पाकिस्तानचे ३ जवान भारताने ठार मारले. 

भारत सरकारने जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 हटवण्याचा निर्णय घेतल्यापासून पाकिस्तान सातत्याने आंततराष्ट्रीय पातळीवर हा मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र संयुक्त राष्ट्रांमध्ये नाचक्की झाल्याने आता पाकिस्तानने आपला मोर्चा काश्मीरमध्ये हिंसाचार घडवण्याकडे वळवला आहे.  

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तानJammu Kashmirजम्मू-काश्मीर