शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

LOC वर भारताकडून पाकला सडेतोड प्रत्युत्तर; अनेक चौक्या केल्या उद्ध्वस्त 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2019 19:50 IST

बॉर्डरवर पाकिस्तानच्या नापाक हरकती सुरु असून भारतीय जवानही पाकच्या हल्ल्याला आक्रमक उत्तर देत आहेत

नवी दिल्ली - भारत-पाक यांच्यातील तणाव वाढल्यामुळे पाकिस्तानकडून सीमेवर गोळीबार सुरु आहे.  मात्र पाकच्या गोळीबारीला भारताकडून जशास तसं प्रत्युत्तर देणं सुरु आहे. जम्मू काश्मीरच्या कृष्णा घाटी, मेंढर सेक्टरमध्ये पाककडून गोळीबार सुरु आहे. पाकच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतानेही आक्रमक भूमिका घेतली आहे. भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या अनेक चौक्या उद्ध्वस्त केल्या आहेत. त्यात पाकिस्तानी सैन्यातील जवानही मारले गेल्याची माहिती आहे. 

मंगळवारी दुपारी पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारात भारतीय जवान रवी रंजन कुमार सिंह शहीद झाले आहेत. ३६ वर्षीय रवी रंजन कुमार हे बिहारच्या गोप बीघा गावात राहणारे आहेत. त्यांच्यामागे त्यांची पत्नी रिता देवी आणि मुलं असं कुटुंब आहे. 

बॉर्डरवर पाकिस्तानच्या नापाक हरकती सुरु असून भारतीय जवानही पाकच्या हल्ल्याला आक्रमक उत्तर देत आहेत. काही दिवसांपूर्वीच जम्मू काश्मीरच्या नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केलं होतं. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी राजौरी सेक्टरमध्ये पाक सेनेची एक चौकी उद्ध्वस्त करण्यात आली. पाककडून वारंवार होणाऱ्या हल्ल्याला भारताने जशास तसे उत्तर देण्याचं ठरवलं आहे. १५ ऑगस्टच्या दिवशीही जम्मू काश्मीरच्या पूंछ भागात पाकिस्तानकडून दिवसभर गोळीबार सुरु होता. उरी आणि राजौरी या भागात पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आलं. त्यावेळी पाकिस्तानचे ३ जवान भारताने ठार मारले. 

भारत सरकारने जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 हटवण्याचा निर्णय घेतल्यापासून पाकिस्तान सातत्याने आंततराष्ट्रीय पातळीवर हा मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र संयुक्त राष्ट्रांमध्ये नाचक्की झाल्याने आता पाकिस्तानने आपला मोर्चा काश्मीरमध्ये हिंसाचार घडवण्याकडे वळवला आहे.  

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तानJammu Kashmirजम्मू-काश्मीर