शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

१० वर्षात ४७ विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसचा पराभव; महाराष्ट्रातल्या निकालाने नेतृत्वावर प्रश्नचिन्ह

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2024 16:01 IST

गेल्या काही वर्षात विविध राज्यातील विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसल्याचे पाहायला मिळत आहे.

Maharashtra Election Results 2024: महाराष्ट्र आणि झारखंड निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर काँग्रेस पक्षात धुसफूस सुरू झाली आहे. झारखंडमध्ये काँग्रेसने प्रादेशिक पक्षांच्या मदतीने विजय मिळवला आहे. पण महाराष्ट्रात मात्र काँग्रेसला आपली विश्वासार्हता जपता आलेली नाही. महाराष्ट्रात काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांचाही दारुण पराभव झाला. काँग्रेसच्या प्रचारसभांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली. मात्र काँग्रेस या गर्दीचे मतांमध्ये रूपांतर करू शकली नाही. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि माजी अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचा निवडणुकीत पराभव झाला. त्यामुळे महाराष्ट्रातल्या निकालाने काँग्रेसला मोठा हादरा बसला आहे.

महाराष्ट्रात १०१ जागांवर निवडणूक लढवणाऱ्या काँग्रेसला केवळ १६ जागा मिळवता आल्या आहेत. तर गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने १४७ जागांवर लढून ४४ जागा जिंकल्या होत्या. काँग्रेस पक्षाची पायाभरणी झालेल्या मुंबई शहरातच पक्षाची कामगिरी सर्वात वाईट ठरली आहे. मुंबईतील ३६ जागांपैकी काँग्रेसला केवळ ३ जागा जिंकता आल्या आहेत. महाराष्ट्रात ७५ जागा अशा होत्या जिथे काँग्रेसची भाजपशी थेट लढत होती. तेथेही बहुतांश जागा भाजपच्या वाट्याला गेल्या. ७५ पैकी ६५ जागांवर काँग्रेस पराभूत झाली आहे.

दुसरीकडे, निकाल आल्यापासून पक्षांतर्गत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या पराभवासाठी  नेतृत्वाला जबाबदार धरले. "आमचे नेतृत्व वाईट आहे. महाराष्ट्राच्या निवडणुकीत काँग्रेसने ज्या आत्मविश्वासाने प्रवेश केला होता, त्यावरून निकाल त्यांच्या बाजूने लागल्याचे दिसून येत होते, परंतु पक्षाच्या या अतिआत्मविश्वासानेच तो उतरवला. दुसरीकडे, भाजप नेते मैदानात उतरले आणि त्यांच्या मित्रपक्षांनी निवडणूक जिंकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले," असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं.

पोटनिवडणुकीत काँग्रेसने वायनाड आणि नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत विजय मिळवला आहे. पण विधानसभेच्या पोटनिवडणुकीत अनेक जागा गमावल्या. राजस्थान विधानसभेच्या पोटनिवडणुकीत पक्षाने गेल्या वर्षी जिंकलेल्या तीन जागांपैकी तीनही जागा गमावल्या. त्याचप्रमाणे पंजाब पोटनिवडणुकीत जिंकलेल्या तीन जागाही गमावल्या. तर पंजाब, आसाम आणि मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसने प्रत्येकी एक जागा जिंकली. त्याचबरोबर कर्नाटकातील तीन आणि केरळमधील एका जागेवरही विजय मिळाला आहे. 

लोकसभा निवडणुकीव्यतिरिक्त या वर्षी झालेल्या अनेक विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर आता पक्ष नेतृत्वावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. २०१४ ते २०२४ दरम्यान झालेल्या ६२ विधानसभा निवडणुकांपैकी काँग्रेसचा ४७ निवडणुकांमध्ये पराभव झाला आहे. तर काँग्रेसला केवळ १५ निवडणुका जिंकता आल्या आहेत. ज्या राज्यांमध्ये काँग्रेस सत्तेत होती तिथे झालेल्या ४० विधानसभा निवडणुकांमध्ये पक्षाने फक्त ७ निवडणुका जिंकल्या होत्या. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024congressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गे