शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची मागणी शरद पवारांनी केली मान्य; म्हणाले,"...त्यासाठी तुमच्या सगळ्यांची तयारी पाहिजे"
2
शरद पवारांना मोठा धक्का; इथे वर्धापनदिनाचा कार्यक्रम, तिथे २ बड्या नेत्यांचा भाजपा प्रवेश
3
जयंत पाटील बाहेर पडणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘पत्रही नाही, राजीनामाही नाही…’
4
"माझ्या मुलाला न्याय हवाय, सोनमच्या खात्यात २० लाख..."; राजाच्या आईने केली सुनेची पोलखोल
5
Sonam Raghuvanshi : ज्या गाईडला दिला नकार, तोच बनला मोठा साक्षीदार! सोनमचं पितळ उघडं कसं पडलं?
6
दिल्लीत एका फ्लॅटला भीषण आग, जीव वाचवण्यासाठी वडिलांची दोन मुलांसह इमारतीवरून उडी, तिघांचाही मृत्यू
7
“चुकीच्या मार्गाला सुप्रिया सुळे जातील असे वाटत नाही”; संजय राऊत आशावादी, भाजपावर टीका
8
गोल्ड लोन घेताय? थांबा! RBI च्या 'या' नवीन नियमांचा तुम्हाला फायदा होणार की तोटा? वाचा सविस्तर
9
COVID19: कोरोनाचा विळखा घट्ट होतोय; राज्यातील रुग्णांचा आकडा १३०० पार!
10
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
11
...म्हणून सोनमचा प्रियकर स्वत: शिलाँगला गेला नव्हता, राजाचा काटा काढण्यासाठी असा रचला भयानक कट  
12
MBA चं स्वप्न मोडलं, घराबाहेर जाण्यावर लावली बंदी; सोनम रघुवंशीची अशी होती 'सीक्रेट लाइफ'
13
वारंवार घरातून पळून जात होती पत्नी; वैतागलेल्या पतीनं उचललं धक्कादायक पाऊल!
14
Raja Raghuvanshi Murder Case : पती राजाची 'सुपारी' देणारी सोनम रघुवंशी गर्भवती आहे का? तिची प्रेग्नंसी टेस्ट झाली अन्...
15
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
16
रेश्मा शिंदेने घरातच साजरी केली वटपौर्णिमा! अभिनेत्रीसोबत साऊथ पतीनेही वडाच्या झाडाला मारल्या फेऱ्या
17
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
18
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
19
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
20
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!

१० वर्षात ४७ विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसचा पराभव; महाराष्ट्रातल्या निकालाने नेतृत्वावर प्रश्नचिन्ह

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2024 16:01 IST

गेल्या काही वर्षात विविध राज्यातील विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसल्याचे पाहायला मिळत आहे.

Maharashtra Election Results 2024: महाराष्ट्र आणि झारखंड निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर काँग्रेस पक्षात धुसफूस सुरू झाली आहे. झारखंडमध्ये काँग्रेसने प्रादेशिक पक्षांच्या मदतीने विजय मिळवला आहे. पण महाराष्ट्रात मात्र काँग्रेसला आपली विश्वासार्हता जपता आलेली नाही. महाराष्ट्रात काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांचाही दारुण पराभव झाला. काँग्रेसच्या प्रचारसभांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली. मात्र काँग्रेस या गर्दीचे मतांमध्ये रूपांतर करू शकली नाही. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि माजी अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचा निवडणुकीत पराभव झाला. त्यामुळे महाराष्ट्रातल्या निकालाने काँग्रेसला मोठा हादरा बसला आहे.

महाराष्ट्रात १०१ जागांवर निवडणूक लढवणाऱ्या काँग्रेसला केवळ १६ जागा मिळवता आल्या आहेत. तर गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने १४७ जागांवर लढून ४४ जागा जिंकल्या होत्या. काँग्रेस पक्षाची पायाभरणी झालेल्या मुंबई शहरातच पक्षाची कामगिरी सर्वात वाईट ठरली आहे. मुंबईतील ३६ जागांपैकी काँग्रेसला केवळ ३ जागा जिंकता आल्या आहेत. महाराष्ट्रात ७५ जागा अशा होत्या जिथे काँग्रेसची भाजपशी थेट लढत होती. तेथेही बहुतांश जागा भाजपच्या वाट्याला गेल्या. ७५ पैकी ६५ जागांवर काँग्रेस पराभूत झाली आहे.

दुसरीकडे, निकाल आल्यापासून पक्षांतर्गत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या पराभवासाठी  नेतृत्वाला जबाबदार धरले. "आमचे नेतृत्व वाईट आहे. महाराष्ट्राच्या निवडणुकीत काँग्रेसने ज्या आत्मविश्वासाने प्रवेश केला होता, त्यावरून निकाल त्यांच्या बाजूने लागल्याचे दिसून येत होते, परंतु पक्षाच्या या अतिआत्मविश्वासानेच तो उतरवला. दुसरीकडे, भाजप नेते मैदानात उतरले आणि त्यांच्या मित्रपक्षांनी निवडणूक जिंकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले," असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं.

पोटनिवडणुकीत काँग्रेसने वायनाड आणि नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत विजय मिळवला आहे. पण विधानसभेच्या पोटनिवडणुकीत अनेक जागा गमावल्या. राजस्थान विधानसभेच्या पोटनिवडणुकीत पक्षाने गेल्या वर्षी जिंकलेल्या तीन जागांपैकी तीनही जागा गमावल्या. त्याचप्रमाणे पंजाब पोटनिवडणुकीत जिंकलेल्या तीन जागाही गमावल्या. तर पंजाब, आसाम आणि मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसने प्रत्येकी एक जागा जिंकली. त्याचबरोबर कर्नाटकातील तीन आणि केरळमधील एका जागेवरही विजय मिळाला आहे. 

लोकसभा निवडणुकीव्यतिरिक्त या वर्षी झालेल्या अनेक विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर आता पक्ष नेतृत्वावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. २०१४ ते २०२४ दरम्यान झालेल्या ६२ विधानसभा निवडणुकांपैकी काँग्रेसचा ४७ निवडणुकांमध्ये पराभव झाला आहे. तर काँग्रेसला केवळ १५ निवडणुका जिंकता आल्या आहेत. ज्या राज्यांमध्ये काँग्रेस सत्तेत होती तिथे झालेल्या ४० विधानसभा निवडणुकांमध्ये पक्षाने फक्त ७ निवडणुका जिंकल्या होत्या. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024congressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गे