शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

तो शहीदांचा अपमान नाही का? बाटला हाऊस चकमकीचा उल्लेख करत मोदींचा काँग्रेसला प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2019 16:54 IST

बाटला हाऊस संदर्भात काँग्रेसने प्रश्नचिन्ह उपस्थित करणं हा त्या चकमकीत शहीद झालेल्या जवानाचा अपमान नाही का? असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसला केला आहे.

ठळक मुद्देबाटला हाऊस संदर्भात काँग्रेसने प्रश्नचिन्ह उपस्थित करणं हा त्या चकमकीत शहीद झालेल्या अपमान नाही का? काँग्रेसने नेहमी व्होट बँकेचे राजकारण केले आहे, पहिल्या दोन टप्प्यातील मतदानानंतर विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. आता ते पुरावे मागत नाहीत. किती दहशतवादी मारले गेले हे विचारणं त्यांनी बंद केले आहे

अररिया - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारच्या अररिया प्रचारसभेत काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. या सभ्येमध्ये बोलताना नरेंद्र मोदींनी एअर स्ट्राईकवर शंका उपस्थित करणाऱ्या काँग्रेसवर बाटला हाऊस चकमकीचा उल्लेख करत प्रश्नचिन्ह उपस्थित केले. बाटला हाऊस संदर्भात काँग्रेसने प्रश्नचिन्ह उपस्थित करणं हा त्या चकमकीत शहीद झालेल्या जवानाचा अपमान नाही का? असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसला केला आहे. 26/11 ला मुंबईवर जो दहशतवादी हल्ला झाला त्यानंतर पाकिस्तानवर कारवाई करण्याऐवजी काँग्रेसने हिंदूंना दहशतवाद या शब्दाशी जोडून राजकारण केले असा आरोप यावेळी पंतप्रधानांनी केला. 

यावेळी बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले की, काँग्रेसने नेहमी व्होट बँकेचे राजकारण केले आहे. दिल्लीच्या बाटला हाऊसमध्ये मध्ये भारतीय जवानांनी दहशतवादांची रणनीती उधवस्त केली. मात्र दहशतवाद्यांवर झालेल्या कारवाईने आनंद व्यक्त करण्याऐवजी काँग्रेसच्या बड्या नेत्यांच्या डोळ्यात अश्रू आले. या कारवाईत ज्या जवानांनी बाटला हाऊसमध्ये घरात घुसून दहशतवाद्यांना ठार केलं. त्यात शहीद झालेल्या जवानांचा हा अपमान नाही का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. भाजपाच्या भोपाळ लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी शहीद हेमंत करकरे यांच्याविषयी जे वादग्रस्त विधान केले होते. यानंतर काँग्रेसने भाजपावर शहीदांचा अपमान केला असा आरोप केला होता त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे भाष्य केले आहे. 

निवडणुकीपूर्वी जे लोक पुरावे मागत होते ते लोक दोन टप्प्यातील मतदानानंतर निराश झाले आहेत. आता ते पुरावे मागत नाहीत. किती दहशतवादी मारले गेले हे विचारणं त्यांनी बंद केले आहे. देशातील मतदारांनी पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील मतदानानंतर त्यांच्या तोंडाला कुलूप लावलं आहे. पहिल्या दोन टप्प्यातील मतदानानंतर विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. आत्ताच्या लोकसभेत विरोधकांची जेवढी संख्या आहे तेवढे तरी निवडून येतील का याची चिंता विरोधकांना लागली असल्याचा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना लगावला.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीararia-pcअररियाBihar Lok Sabha Election 2019बिहार लोकसभा निवडणूक 2019