शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

पत्रकार गोस्वामींची चौकशी करणारा पोलीस पॉझिटीव्ह, अर्णबला क्वारंटाईन करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2020 13:15 IST

पालघर हत्याकांडासंदर्भातील चर्चेच्या कार्यक्रमात गोस्वामी यांनी धार्मिक तेढ निर्माण होईल असे वक्तव्य करत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याबाबत आक्षेपार्ह टीका केल्याची तक्रार काँग्रेसच्यावतीने देशभरात ठिकठिकाणी नोंदविण्यात आली

मुंबई - काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याबाबत वृत्तावरून खासगी वृत्तवाहिनीचे संपादक अर्नब गोस्वामी यांनी केलेल्या वक्तव्याबाबत एन. एम. जोशी मार्ग पोलिसांनी जवळपास १२ तास चौकशी करत त्यांचा जबाब नोंदवित तपास सुरू केला आहे. याप्रकरणी न्यायालयात खटला सुरु असून अर्नब गोस्वामी यांच्या बाजुने निष्णात वकिल अॅड. हरिश साळवे लढत आहेत. हरिश साळवेंनी आपली बाजू मांडताना, अर्नब यांची चौकशी करणारा पोलीस कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे न्यायलयात सांगितले. यावरुन काँग्रेस नेत्याने काही प्रश्न उपस्थित केले आहेत. 

पालघर हत्याकांडासंदर्भातील चर्चेच्या कार्यक्रमात गोस्वामी यांनी धार्मिक तेढ निर्माण होईल असे वक्तव्य करत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याबाबत आक्षेपार्ह टीका केल्याची तक्रार काँग्रेसच्यावतीने देशभरात ठिकठिकाणी नोंदविण्यात आली. याप्रकरणी नागपूर पोलीस ठाण्यात गोस्वामींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार हा गुन्हा पुढील तपासासाठी एन. एम. जोशी मार्ग पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. त्यानुसार गोस्वामी यांनी चौकशीसाठी हजर राहावे म्हणून पोलिसांकडून दोन नोटिसा पाठविण्यात आल्या होत्या. त्याच नोटीशीला प्रतिसाद देत गोस्वामी यांनी पोलीस ठाणे गाठले. त्यानुसार सकाळपासून सुमारे १२ तास त्यांच्याकडे चौकशी करत त्यांचा जबाब नोंदवून घेण्यात आला आहे. आता, न्यायालयात अर्नब गोस्वामी यांची बाजू मांडताना, अॅड. हरिश साळवे यांनी, अर्नबची चौकशी करणाऱ्यांपैकी एक पोलीस कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे न्यायालयात सांगितले. त्यानंतर, कर्नाटकच्या बंगळुरूमधील युवक काँग्रेसचे नेते स्रीवत्सा यांनी अर्नब गोस्वामीला क्वारंटाईन करण्याची मागणी केली आहे.  

अर्णब गोस्वामींच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात माहिती दिली, त्यानुसार अर्णबची चौकशी करणारा एक पोलीस कोरोना पॉझिटीव्ह आहे. मग, अर्णब यांना आत्तापर्यंत क्वारंटाईन का करण्यात आलं नाही. अर्णब हे आत्ताही स्टुडिओत जाऊन आपला शो कसा काय घेऊ शकतात. अर्णब यांच्यासह त्यांच्या कार्यालयातील सर्वांनाच क्वारंटाईन करण्यात यावे, अशी मागणीही स्रीवत्सा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटद्वारे केली. स्रीवत्सा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना या ट्विटमध्ये मेन्शन केले आहे. दरम्यान, गोस्वामी यांच्या गाडीवर हल्ला केल्याप्रकरणी प्रतिककुमार शामसुंदर मिश्रा आणि अरुण बोराडे यांना अटक करण्यात आली होती. 

टॅग्स :arnab goswamiअर्णब गोस्वामीMumbaiमुंबईTwitterट्विटरCourtन्यायालय