शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
4
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
5
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
6
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
7
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
8
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
9
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
10
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
11
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
12
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
13
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
14
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
15
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
16
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
17
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
18
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
19
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
20
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला

मौत का सौदा! 5 लाख द्या अन् मृतदेह घेऊन जा; कतारमध्ये भारतीयाचा मृत्यू, कंपनीने मागितले पैसे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2022 11:17 IST

मजुरांची भरती करणाऱ्या कंपनीने त्यांच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांकडे पाच लाख रुपयांची मागणीही केली. पाच लाख रुपये न मिळाल्यास मृतदेह मिळणार नसल्याचं सांगण्यात आलं आहे.

नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या कतार फुटबॉल विश्वचषक स्पर्धेसाठी दोहामध्ये तयारी सुरू आहे, परंतु याआधी काही भारतीय मजुरांनी आपला जीव गमावला आहे. मात्र बांधकाम संस्थांनी ना कुटुंबाला भरपाई दिली ना मृत्यूचे नेमके कारण सांगितले. धक्कादायक बाब म्हणजे मजुरांची भरती करणाऱ्या कंपनीने त्यांच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांकडे पाच लाख रुपयांची मागणीही केली. पाच लाख रुपये न मिळाल्यास मृतदेह मिळणार नसल्याचं सांगण्यात आलं आहे. भारतातले अनेक मजूर हे कामासाठी कतारमध्ये गेले होते. त्यातच तेलंगणाचे 40 वर्षीय राजेंद्र प्रभूही होते. 

राजेंद्र यांचा तिथे मृत्यू झाला. मृतदेह ताब्यात देण्यासाठी तब्बल 5 लाख रुपयांची मागणी कुटुंबीयांकडे करण्यात आली. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, 2016 मध्ये ते कतारला गेले होते. एका एजन्सीतर्फे कामगारांना कतारला नेण्यात आलं. राजेंद्र यांना कामासाठी 2500 कतार रियाल (55 हजार रुपये) मिळणार होते, असं राजेंद्र यांनी कुटुंबीयांना सांगितलं होतं. त्यांच्यावर कर्ज असल्याने ते फेडण्यासाठी त्यांनी हे काम स्वीकारलं होतं; मात्र दोहा इथं पोहोचल्यावर परिस्थिती विचित्र असल्याचं राजेंद्रची पत्नी सुचैत्रा यांचं म्हणणं आहे. 

राजेंद्र यांना घेण्यासाठी विमानतळावर कोणीही आलं नव्हतं किंवा पर्यायी व्यवस्थाही करण्यात आली नव्हती. ज्या करारानुसार त्या कामगारांना तिथं नेलं होतं, तसं काहीही तिथे दिसत नव्हतं. तिथे गेल्यावर त्यांना नवीन करार देण्यात आला. त्यानुसार त्यांना कामाचे 22 हजार रुपयेच मिळणार होते. राजेंद्र यांच्यासारख्या कामगारांची भरती करणाऱ्या कंपनीने फसवणूक करून 55 हजार रुपयांच्या ऐवजी 22 हजार रुपयांचा नवा करार केला. राजेंद्र यांनी याबाबत जेव्हा विचारणा केली, तेव्हा हा कराराचाच भाग असल्याचं सांगण्यात आलं. त्या एजन्सीचं नाव कुटुंबीयांना शेवटपर्यंत कळलं नाही.

एजन्सीने फसवणूक करूनही राजेंद्र यांना पैसे कमावण्याबाबत विश्वास होता. कर्ज फेडण्यासाठी त्यांना काहीही करून पैसे कमावायचे होते. त्यांच्याकडे चांगली नोकरीही नव्हती आणि दुसरा पर्यायही नव्हता. त्यामुळे ते खूप त्रासले होते, असं त्यांची पत्नी सुचैत्रा यांनी सांगितलं. ते त्यांच्या नशीबाला दोष देत होते. एकदा कर्ज फेडलं की घरी परत येणार होते. खूप कष्ट, अपुरा मोबदला आणि कर्ज यामुळे ते मानसिक तणाव होते, असं सुचैत्राचं म्हणणं आहे.

एके दिवशी राजेंद्र यांची पत्नी सुचैत्रा यांना राजेंद्र यांच्यासोबत काम करणाऱ्या कामगाराचा फोन आला. राजेंद्र यांनी आत्महत्या केल्याचं त्या कामगाराने सांगितलं. कामगार भरती करणाऱ्या एजन्सीने मृतदेह ताब्यात देण्यासाठी 5 लाख रुपये मागितले होते. भारतीय दूतावासाची मदत घेण्यात आली. मृत्यूनंतर 10 दिवसांनी राजेंद्र यांचा मृतदेह तेलंगणाला पोहोचला. सोबतच 30 हजार रुपयांचा कामाचा मोबदलाही मिळाला. राजेंद्र यांच्या माघारी त्याची पत्नी शिवणकाम करून 7 वर्षांच्या मुलीचा सांभाळ करून कर्ज फेडते आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :IndiaभारतDeathमृत्यू