शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

मौत का सौदा! 5 लाख द्या अन् मृतदेह घेऊन जा; कतारमध्ये भारतीयाचा मृत्यू, कंपनीने मागितले पैसे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2022 11:17 IST

मजुरांची भरती करणाऱ्या कंपनीने त्यांच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांकडे पाच लाख रुपयांची मागणीही केली. पाच लाख रुपये न मिळाल्यास मृतदेह मिळणार नसल्याचं सांगण्यात आलं आहे.

नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या कतार फुटबॉल विश्वचषक स्पर्धेसाठी दोहामध्ये तयारी सुरू आहे, परंतु याआधी काही भारतीय मजुरांनी आपला जीव गमावला आहे. मात्र बांधकाम संस्थांनी ना कुटुंबाला भरपाई दिली ना मृत्यूचे नेमके कारण सांगितले. धक्कादायक बाब म्हणजे मजुरांची भरती करणाऱ्या कंपनीने त्यांच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांकडे पाच लाख रुपयांची मागणीही केली. पाच लाख रुपये न मिळाल्यास मृतदेह मिळणार नसल्याचं सांगण्यात आलं आहे. भारतातले अनेक मजूर हे कामासाठी कतारमध्ये गेले होते. त्यातच तेलंगणाचे 40 वर्षीय राजेंद्र प्रभूही होते. 

राजेंद्र यांचा तिथे मृत्यू झाला. मृतदेह ताब्यात देण्यासाठी तब्बल 5 लाख रुपयांची मागणी कुटुंबीयांकडे करण्यात आली. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, 2016 मध्ये ते कतारला गेले होते. एका एजन्सीतर्फे कामगारांना कतारला नेण्यात आलं. राजेंद्र यांना कामासाठी 2500 कतार रियाल (55 हजार रुपये) मिळणार होते, असं राजेंद्र यांनी कुटुंबीयांना सांगितलं होतं. त्यांच्यावर कर्ज असल्याने ते फेडण्यासाठी त्यांनी हे काम स्वीकारलं होतं; मात्र दोहा इथं पोहोचल्यावर परिस्थिती विचित्र असल्याचं राजेंद्रची पत्नी सुचैत्रा यांचं म्हणणं आहे. 

राजेंद्र यांना घेण्यासाठी विमानतळावर कोणीही आलं नव्हतं किंवा पर्यायी व्यवस्थाही करण्यात आली नव्हती. ज्या करारानुसार त्या कामगारांना तिथं नेलं होतं, तसं काहीही तिथे दिसत नव्हतं. तिथे गेल्यावर त्यांना नवीन करार देण्यात आला. त्यानुसार त्यांना कामाचे 22 हजार रुपयेच मिळणार होते. राजेंद्र यांच्यासारख्या कामगारांची भरती करणाऱ्या कंपनीने फसवणूक करून 55 हजार रुपयांच्या ऐवजी 22 हजार रुपयांचा नवा करार केला. राजेंद्र यांनी याबाबत जेव्हा विचारणा केली, तेव्हा हा कराराचाच भाग असल्याचं सांगण्यात आलं. त्या एजन्सीचं नाव कुटुंबीयांना शेवटपर्यंत कळलं नाही.

एजन्सीने फसवणूक करूनही राजेंद्र यांना पैसे कमावण्याबाबत विश्वास होता. कर्ज फेडण्यासाठी त्यांना काहीही करून पैसे कमावायचे होते. त्यांच्याकडे चांगली नोकरीही नव्हती आणि दुसरा पर्यायही नव्हता. त्यामुळे ते खूप त्रासले होते, असं त्यांची पत्नी सुचैत्रा यांनी सांगितलं. ते त्यांच्या नशीबाला दोष देत होते. एकदा कर्ज फेडलं की घरी परत येणार होते. खूप कष्ट, अपुरा मोबदला आणि कर्ज यामुळे ते मानसिक तणाव होते, असं सुचैत्राचं म्हणणं आहे.

एके दिवशी राजेंद्र यांची पत्नी सुचैत्रा यांना राजेंद्र यांच्यासोबत काम करणाऱ्या कामगाराचा फोन आला. राजेंद्र यांनी आत्महत्या केल्याचं त्या कामगाराने सांगितलं. कामगार भरती करणाऱ्या एजन्सीने मृतदेह ताब्यात देण्यासाठी 5 लाख रुपये मागितले होते. भारतीय दूतावासाची मदत घेण्यात आली. मृत्यूनंतर 10 दिवसांनी राजेंद्र यांचा मृतदेह तेलंगणाला पोहोचला. सोबतच 30 हजार रुपयांचा कामाचा मोबदलाही मिळाला. राजेंद्र यांच्या माघारी त्याची पत्नी शिवणकाम करून 7 वर्षांच्या मुलीचा सांभाळ करून कर्ज फेडते आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :IndiaभारतDeathमृत्यू