शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
3
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
4
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
5
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
6
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
7
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
8
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
9
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
10
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
11
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
12
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
13
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
14
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
15
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
16
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
17
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
18
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
19
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
20
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?

संरक्षणच नाही, अंतराळ आणि ऊर्जा क्षेत्रातील सहकार्यासाठीही पुतीन यांची भारत भेट  ठरणार महत्त्वपूर्ण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2018 10:15 IST

रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन आजपासून भारत दौऱ्यावर येत आहेत. दोन्ही देशांतील मैत्रिपुर्ण संबंध आणि संरक्षण कराराच्या दृष्टीने पुतीन यांची भारतभेट महत्त्वाची मानली जात आहे.

नवी दिल्ली - रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन आजपासून भारत दौऱ्यावर येत आहेत. दोन्ही देशांतील मैत्रिपुर्ण संबंध आणि संरक्षण कराराच्या दृष्टीने पुतीन यांची भारतभेट महत्त्वाची मानली जात आहे. भारत आणि रशियामध्ये एस-400 क्षेपणास्त्र करार होण्याची शक्यता असल्याने या भेटीकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. मात्र केवळ संरक्षण क्षेत्राच्या दृष्टीनेच नव्हे तर अंतराळ संशोधन आणि उर्जा क्षेत्रातील सहकार्याच्या दृष्टीनेही पुतीन यांचा भारत दौरा महत्त्वपूर्ण ठरणार आहे.रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन आणि भारताचे पंतप्रधान यांच्यात शुक्रवारी चर्चा होणार आहे. त्या चर्चेवेळी संरक्षण क्षेत्रातील भागीदारीबाबत चर्चा होऊन एस-400 क्षेपणास्र करारावर सह्या होण्याची शक्यता आहे. तसेच इतर महत्त्वपूर्ण संरक्षण करारांवरही सहमती होऊ शकते. संरक्षण क्षेत्राबरोबरच अंतराळ संशोधनातील सहकार्याबाबत दोन्ही देशांच्या शिष्टमंडळामध्ये निर्णय होऊ शकतो. त्यामुळे 2022 साली चंद्रावर मानवाला पाठवण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांनी केलेल्या घोषणेला बळ मिळू शकेल. तसेच या मोहिमेसाठी रशिया साहित्य आणि प्रशिक्षण देऊ शकतो, अशी शक्यता सूत्रांकडून वर्तवण्यात येत आहे.  पुतीन यांच्या भारत दौऱ्यादरम्यान दोन्ही देशांमध्ये ऊर्जा क्षेत्रातील भागीदारीबाबतही महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे. भारताने रशियातील ऊर्जा क्षेत्रामध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. 

दरम्यान, पुतीन यांच्या या दौ-याचा मुख्य उद्देश एस-400 क्षेपणास्त्र प्रणालीच्या करारावर स्वाक्षरी करण्याचा आहे. एस-400 क्षेपणास्त्र प्रणालीसाठीचा हा करार 5 अब्ज डॉलरचा होणार आहे. परंतु अमेरिकेचा या कराराला तीव्र विरोध आहे. रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार, या दौ-यात पुतिन पंतप्रधान नरेंद्र मोदींशी अधिकृतरीत्या चर्चा करणार आहेत. ते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहेत. भारताची दरवर्षी होत असलेल्या द्विपक्षीय चर्चांमध्ये रशियाचाही समावेश आहे. तसेच भारताबरोबर दरवर्षी द्विपक्षीय चर्चा करणारा जपान हा दुसरा देश आहे. भारत-रशियादरम्यानच्या द्विपक्षीय संबंध हे विशेष महत्त्वाचे आहेत.

टॅग्स :Vladimir Putinव्लादिमीर पुतिनrussiaरशियाIndiaभारत