शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

राजकारण बाजूला ठेवा, देशाच्या सीमेकडे लक्ष द्या; संजय राऊतांनी केंद्र सरकारला सुनावलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2022 10:10 IST

देशाच्या सुरक्षा व्यवस्थेचेही राजकारण सरकार करतंय. सीमा उघड्या पडल्या. शत्रू घुसले तरी चालतील. ही घटना देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने दुर्दैव आहे अशी प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली आहे.

नवी दिल्ली - भारत-चीन सीमेवर पुन्हा तणाव वाढलाय. चीनचे सैन्य गुजरात निवडणूक होईपर्यंत वाट पाहत होते का? चीनच्या सैन्याला शांत राहायला सांगितले होते? लडाख झाले, डोकलाम झाले आता तवांग आलं. देशाच्या राजकर्त्यांनी राजकारणाकडे लक्ष कमी देऊन देशाच्या सीमा असुरक्षित झाल्या आहेत. चीनसारखा शत्रू तिन्ही बाजूने घुसतोय त्यावर लक्ष दिले तर खऱ्या अर्थाने राष्ट्राची सेवा होईल अशा शब्दात शिवसेना उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. 

संजय राऊत म्हणाले की, संसदेच्या दोन्ही सभागृहात विरोधकांकडून राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा लावून धरू. परिस्थिती गंभीर आहे. सरकार राजकारणात गुंतल्यामुळे चीन, पाकिस्तान आणि इतर शत्रू सीमेवर धडका मारतायेत. सरकार ही बाब गांभीर्याने घेत नाही. पंतप्रधान, संरक्षणमंत्र्यांनी देशापासून काहीतरी लपवण्याचा प्रयत्न केलाय हे तवांगच्या घटनेवरून स्पष्ट दिसते. तवांगमध्ये ही झटापट शुक्रवारी झाली. ८ दिवसानंतर हे समोर आले. जखमी सैनिक आसामच्या गुवाहाटीत उपचार घेतायेत. सत्य काय ते कळायला मार्ग नाही. भारताचे किती सैनिक जखमी झालेत? कोण शहीद झालंय का? यावर अधिकृत माहिती सरकार द्यायला तयार नाही. जे गलवानबाबतीत झाले ते तवांगबाबतीत घडतंय असा आरोप त्यांनी केला. 

तसेच आज सकाळी सगळे प्रमुख विरोधी पक्ष एकमेकांशी संपर्कात आहेत. त्याबाबत निश्चित आज संसदेत जाब विचारू. गुजरात निवडणूक निकालाच्या जल्लोषात हे सरकार मग्न असताना चीनचं सैन्य तवांगमध्ये घुसत होते. देशाच्या सुरक्षा व्यवस्थेचेही राजकारण सरकार करतंय. सीमा उघड्या पडल्या. शत्रू घुसले तरी चालतील. ही घटना देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने दुर्दैव आहे. अरुणाचल प्रदेशावर चीन दावा करतंय. स्थानिकांनी तवांग भारताच्या नकाशावर ठेवले. चीनच्या नकाशात तवांग त्यांचा प्रदेश दाखवलाय. तिथे गांभीर्याने सरकारने काम करणे गरजेचे होते पण ते दिसत नाही असंही संजय राऊत म्हणाले. 

दरम्यान, या प्रश्नावर पंतप्रधान, संरक्षणमंत्री यांनी उत्तर दिले पाहिजे. याआधीही गलवानवेळी उत्तर दिले. पण वारंवार चीन कुरापती करतंय. अशावेळी शत्रूंना थरकाप उडवणारे सरकार असं ऐकायला मिळते. तवांगचे संरक्षण करा, अरुणाचलचे संरक्षण करा. त्याऐवजी मोठमोठ्या वल्गना करताना संरक्षणमंत्री दिसतात. चीनसारखा शत्रू देशात घुसतोय आणि आपण पाकिस्तानवर बोलतोय. आपण चीनची मुकाबला केला पाहिजे. चीन पुढे जातोय आपले आंतरराष्ट्रीय धोरण चुकतंय का? याचा विचार होणे गरजेचे आहे. सत्ताधाऱ्यांनी राजकारण बाजूला ठेऊन देशाच्या सीमेकडे लक्ष द्यावं. आम्ही बोललो तर आम्हाला देशद्रोही ठरवून तुरुंगात टाकलं जातं अशी टीकाही संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर केली.  

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतindia china faceoffभारत-चीन तणावBJPभाजपाCentral Governmentकेंद्र सरकार