शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

राजकारण बाजूला ठेवा, देशाच्या सीमेकडे लक्ष द्या; संजय राऊतांनी केंद्र सरकारला सुनावलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2022 10:10 IST

देशाच्या सुरक्षा व्यवस्थेचेही राजकारण सरकार करतंय. सीमा उघड्या पडल्या. शत्रू घुसले तरी चालतील. ही घटना देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने दुर्दैव आहे अशी प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली आहे.

नवी दिल्ली - भारत-चीन सीमेवर पुन्हा तणाव वाढलाय. चीनचे सैन्य गुजरात निवडणूक होईपर्यंत वाट पाहत होते का? चीनच्या सैन्याला शांत राहायला सांगितले होते? लडाख झाले, डोकलाम झाले आता तवांग आलं. देशाच्या राजकर्त्यांनी राजकारणाकडे लक्ष कमी देऊन देशाच्या सीमा असुरक्षित झाल्या आहेत. चीनसारखा शत्रू तिन्ही बाजूने घुसतोय त्यावर लक्ष दिले तर खऱ्या अर्थाने राष्ट्राची सेवा होईल अशा शब्दात शिवसेना उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. 

संजय राऊत म्हणाले की, संसदेच्या दोन्ही सभागृहात विरोधकांकडून राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा लावून धरू. परिस्थिती गंभीर आहे. सरकार राजकारणात गुंतल्यामुळे चीन, पाकिस्तान आणि इतर शत्रू सीमेवर धडका मारतायेत. सरकार ही बाब गांभीर्याने घेत नाही. पंतप्रधान, संरक्षणमंत्र्यांनी देशापासून काहीतरी लपवण्याचा प्रयत्न केलाय हे तवांगच्या घटनेवरून स्पष्ट दिसते. तवांगमध्ये ही झटापट शुक्रवारी झाली. ८ दिवसानंतर हे समोर आले. जखमी सैनिक आसामच्या गुवाहाटीत उपचार घेतायेत. सत्य काय ते कळायला मार्ग नाही. भारताचे किती सैनिक जखमी झालेत? कोण शहीद झालंय का? यावर अधिकृत माहिती सरकार द्यायला तयार नाही. जे गलवानबाबतीत झाले ते तवांगबाबतीत घडतंय असा आरोप त्यांनी केला. 

तसेच आज सकाळी सगळे प्रमुख विरोधी पक्ष एकमेकांशी संपर्कात आहेत. त्याबाबत निश्चित आज संसदेत जाब विचारू. गुजरात निवडणूक निकालाच्या जल्लोषात हे सरकार मग्न असताना चीनचं सैन्य तवांगमध्ये घुसत होते. देशाच्या सुरक्षा व्यवस्थेचेही राजकारण सरकार करतंय. सीमा उघड्या पडल्या. शत्रू घुसले तरी चालतील. ही घटना देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने दुर्दैव आहे. अरुणाचल प्रदेशावर चीन दावा करतंय. स्थानिकांनी तवांग भारताच्या नकाशावर ठेवले. चीनच्या नकाशात तवांग त्यांचा प्रदेश दाखवलाय. तिथे गांभीर्याने सरकारने काम करणे गरजेचे होते पण ते दिसत नाही असंही संजय राऊत म्हणाले. 

दरम्यान, या प्रश्नावर पंतप्रधान, संरक्षणमंत्री यांनी उत्तर दिले पाहिजे. याआधीही गलवानवेळी उत्तर दिले. पण वारंवार चीन कुरापती करतंय. अशावेळी शत्रूंना थरकाप उडवणारे सरकार असं ऐकायला मिळते. तवांगचे संरक्षण करा, अरुणाचलचे संरक्षण करा. त्याऐवजी मोठमोठ्या वल्गना करताना संरक्षणमंत्री दिसतात. चीनसारखा शत्रू देशात घुसतोय आणि आपण पाकिस्तानवर बोलतोय. आपण चीनची मुकाबला केला पाहिजे. चीन पुढे जातोय आपले आंतरराष्ट्रीय धोरण चुकतंय का? याचा विचार होणे गरजेचे आहे. सत्ताधाऱ्यांनी राजकारण बाजूला ठेऊन देशाच्या सीमेकडे लक्ष द्यावं. आम्ही बोललो तर आम्हाला देशद्रोही ठरवून तुरुंगात टाकलं जातं अशी टीकाही संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर केली.  

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतindia china faceoffभारत-चीन तणावBJPभाजपाCentral Governmentकेंद्र सरकार