शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

"अहंकार बाजूला सारून तिन्ही कृषी कायदे तत्काळ मागे घ्या "

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2021 05:24 IST

Farmer Protest: काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे सरकारला आवाहन. लोकशाहीत जनभावनांची उपेक्षा करणारी सरकारे आणि त्यांचे नेते फार काळ सत्तेत राहू शकत नाहीत. नरेंद्र मोदी सरकारच्या ‘थकवा आणि पळवून लावा’ धोरणासमोर आंदोलन करणारे शेतकरी-मजूर अजिबात गुडघे टेकणार नाहीत.

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : अजूनही वेळ आहे. मोदी सरकारने सत्तेचा अहंकार सोडून तत्काळ विनाअट तिन्ही काळे कृषी कायदे परत घ्यावेत आणि थंडी आणि पावसात संघर्ष करत असलेल्या शेतकऱ्यांचे आंदोलन समाप्त करावे. हाच राजधर्म आहे आणि दिवंगत शेतकऱ्यांना श्रद्धांजलीही, असे काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी म्हटले आहे. 

   आंदोलनाबाबत सरकार उदासीन असल्यामुळे आतापर्यंत ५० पेक्षा जास्त शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. काही शेतकऱ्यांनी सरकारकडून होत असलेल्या उपेक्षेमुळे आत्महत्येचे पाऊल उचलले तरीही निर्दयी मोदी सरकारच्या हृदयाला पाझर फुटलेला नाही की, आजपर्यंत मोदी किंवा कोणत्याही मंत्र्याने सांत्वन करणारा शब्दही उच्चारलेला नाही. मी सगळ्या दिवंगत शेतकरी बांधवांना श्रद्धांजली अर्पण करते व देवाकडे प्रार्थना करते की, त्यांच्या कुटुंबीयांना दु:ख सहन करण्याची शक्ती द्यावी, असे सोनिया गांधी म्हणाल्या.

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाच्या इतिहासात हे पहिलेच अहंकारी सरकार सत्तेत आले आहे की, ज्याला सामान्य जनता तर दूर देशाचे पोट भरणाऱ्यांच्या वेदना आणि ते करत असलेला संघर्ष दिसत नाही. असे दिसते की, मूठभर उद्योगपती आणि त्यांचा नफा सुनिश्चित करणे हे या सरकारचा मुख्य अजेंडा बनला आहे, अशी टिका सोनिया गांधी यांनी केली.

लोकशाहीत जनभावनांची उपेक्षा करणारी सरकारे आणि त्यांचे नेते फार काळ सत्तेत राहू शकत नाहीत. नरेंद्र मोदी सरकारच्या ‘थकवा आणि पळवून लावा’ धोरणासमोर आंदोलन करणारे शेतकरी-मजूर अजिबात गुडघे टेकणार नाहीत. दमन करून आपण सत्ता चालवू, हा या सरकारचा निधार्र  यशस्वी होणार नाही. मोदी सरकारने सत्तेचा अहंकार सोडून तत्काळ विनाअट तिन्ही काळे कृषी कायदे परत घ्यावेत.  मोदी सरकारने हे लक्षात ठेवावे की, लोकशाहीचा अर्थच जनता आणि शेतकरी-मजुरांच्या हितांचे रक्षण करणे आहे, असे सोनिया गांधी म्हणाल्या.

आंदोलक शेतकऱ्यांच्या पावसाने वाढविल्या अडचणीn    केंद्राच्या नव्या कृषी कायद्यांविरुद्ध एक महिन्यापेक्षा अधिक काळापासून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अडचणी पावसाने वाढविल्या आहेत. रात्रभर झालेल्या पावसाने आंदोलनस्थळी ठिकठिकाणी पाणी साचले आहे.n    संयुक्त किसान मोर्चाशी संबंधित नेते अभिमन्यू कोहर यांनी सांगितले की, शेतकरी ज्या तंबूमध्ये राहत आहेत ते तंबू वॉटरप्रूफ आहेत; पण थंडी आणि त्यात पावसाची भर यामुळे दैनंदिन कामकाज विस्कळीत झाले आहे. पावसानंतर थंडीही वाढली आहे; पण सरकारला शेतकऱ्यांचा त्रास दिसत नाही.n    सिंघू बॉर्डरवर असलेले गुरविंदर सिंह यांनी सांगितले की, अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. तरीही आमच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आम्ही येथून हटणार नाहीत. दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, किमान तापमान ९.९ अंश सेल्सिअस झाले आहे, तर येथे २५ मिमी पाऊस झाला आहे. ६ जानेवारीपर्यंत या भागात पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीFarmerशेतकरी