शहरं
Join us  
Trending Stories
1
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
2
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
3
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
4
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
5
एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
6
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
7
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
8
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
9
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
10
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
11
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
12
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
13
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
14
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
15
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
16
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
17
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
18
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
19
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
20
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण

"नितीश कुमारांची मुख्यमंत्री म्हणून शेवटची इनिंग, यात शंका नाही", पुष्पम प्रिया यांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2024 13:57 IST

बिहारच्या राजकारणात थेट मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून समोर आलेल्या पुष्पम प्रिया चौधरी यांनी सोशल मीडियावर नितीश कुमार यांचे अभिनंदन केले आणि त्यांना टोलाही लगावला आहे. 

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार पुन्हा एकदा राष्ट्रीय जनता दल सोडून भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएमध्ये सामील झाले आहेत. नितीश कुमार यांनी भाजपासोबत जात 9 व्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. दरम्यान, नितीश कुमार यांनी भाजपासोबत हातमिळवणी केल्यानंतर प्लुरल्स पार्टीच्या प्रमुख पुष्पम प्रिया यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. बिहारच्या राजकारणात थेट मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून समोर आलेल्या पुष्पम प्रिया चौधरी यांनी सोशल मीडियावर नितीश कुमार यांचे अभिनंदन केले आणि त्यांना टोलाही लगावला आहे. 

नितीश कुमार यांना मुख्यमंत्रिपदावरून हटवल्याशिवाय मास्क काढणार नाही, अशी शपथ घेतलेल्या पुष्पम प्रिया चौधरी यांनी म्हटले आहे की, "नितीश कुमार यांची मुख्यमंत्री म्हणून ही शेवटची इनिंग आहे, यात शंका नाही. वीस महिने बाकी आहेत. ते निरोगी राहू देत, कारण बिहारला त्यांच्या वक्तव्यामुळे आणि वागण्यामुळे आणखी पेच सहन करावा लागू नये. जाता-जाता ते राज्याच्या हिताचे काहीतरी चांगले करतील, अशी आशा आहे. त्यांचे अभिनंदन."

पुष्पम प्रिया चौधरी यांनी बिहार विधानसभा निवडणुकीच्यावेळी (2020) शपथ घेतली होती. नितीश कुमार यांना मुख्यमंत्री पदावरून हटवल्याशिवाय चेहऱ्यावरील मास्क काढणार नाही, अशी शपथ पुष्पम प्रिया चौधरी यांनी घेतली होती. गेल्या वर्षी जुलैमध्ये नितीश कुमार जेव्हा त्यांचे वडील जेडीयू नेते विनोद कुमार चौधरी यांच्या श्राद्धानिमित्त पुष्पम प्रिया यांच्या घरी पोहोचले होते, तेव्हाही पुष्पम प्रिया यांनी आपल्या चेहऱ्यावरील मास्क काढले नव्हते. 

त्यावेळी पुष्पम प्रिया चौधरी म्हणाल्या होत्या की, नितीश कुमार यांचे माझ्या वडिलांशी कौटुंबिक संबंध होते. त्यांच्यासाठी नितीशकुमार हे नेते होते. नितीशकुमार यांच्याकडून त्यांना खूप अपेक्षा होत्या. बिहारमधील परिस्थितीसाठी मी नितीशकुमारांना जबाबदार धरते. कौटुंबिक संबंध बाजूला आहे. मात्र आजही मी राजकीयदृष्ट्या नितीशकुमारांच्या विरोधात आहे.

दरम्यान, नुकतेच जेव्हा नितीश कुमार यांच्या सरकारने पंचायत प्रतिनिधींचे वेतन आणि भत्ते वाढवले ​​होते, तेव्हा पुष्पम प्रिया चौधरी यांनी सरकारची खिल्ली उडवली होती. सरकारने पंचायत प्रतिनिधींचे मानधन 2500 रुपयांवरून 5000 हजार रुपयांपर्यंत वाढवून एक उपकार केले आहे. विधानसभा प्रतिनिधींना लाखो रुपये पगार व इतर भत्ते व सुविधा मिळतात. त्याच बिहारमध्ये पंचायत प्रतिनिधींना चिल्लर दिली जात आहे, असे पुष्पम प्रिया चौधरी यांनी म्हटले होते. 

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारBiharबिहार