शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
3
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
4
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
5
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
6
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
7
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
8
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
9
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
10
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
11
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
12
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
13
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
14
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
16
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
17
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
18
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
19
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
20
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला

"नितीश कुमारांची मुख्यमंत्री म्हणून शेवटची इनिंग, यात शंका नाही", पुष्पम प्रिया यांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2024 13:57 IST

बिहारच्या राजकारणात थेट मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून समोर आलेल्या पुष्पम प्रिया चौधरी यांनी सोशल मीडियावर नितीश कुमार यांचे अभिनंदन केले आणि त्यांना टोलाही लगावला आहे. 

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार पुन्हा एकदा राष्ट्रीय जनता दल सोडून भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएमध्ये सामील झाले आहेत. नितीश कुमार यांनी भाजपासोबत जात 9 व्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. दरम्यान, नितीश कुमार यांनी भाजपासोबत हातमिळवणी केल्यानंतर प्लुरल्स पार्टीच्या प्रमुख पुष्पम प्रिया यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. बिहारच्या राजकारणात थेट मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून समोर आलेल्या पुष्पम प्रिया चौधरी यांनी सोशल मीडियावर नितीश कुमार यांचे अभिनंदन केले आणि त्यांना टोलाही लगावला आहे. 

नितीश कुमार यांना मुख्यमंत्रिपदावरून हटवल्याशिवाय मास्क काढणार नाही, अशी शपथ घेतलेल्या पुष्पम प्रिया चौधरी यांनी म्हटले आहे की, "नितीश कुमार यांची मुख्यमंत्री म्हणून ही शेवटची इनिंग आहे, यात शंका नाही. वीस महिने बाकी आहेत. ते निरोगी राहू देत, कारण बिहारला त्यांच्या वक्तव्यामुळे आणि वागण्यामुळे आणखी पेच सहन करावा लागू नये. जाता-जाता ते राज्याच्या हिताचे काहीतरी चांगले करतील, अशी आशा आहे. त्यांचे अभिनंदन."

पुष्पम प्रिया चौधरी यांनी बिहार विधानसभा निवडणुकीच्यावेळी (2020) शपथ घेतली होती. नितीश कुमार यांना मुख्यमंत्री पदावरून हटवल्याशिवाय चेहऱ्यावरील मास्क काढणार नाही, अशी शपथ पुष्पम प्रिया चौधरी यांनी घेतली होती. गेल्या वर्षी जुलैमध्ये नितीश कुमार जेव्हा त्यांचे वडील जेडीयू नेते विनोद कुमार चौधरी यांच्या श्राद्धानिमित्त पुष्पम प्रिया यांच्या घरी पोहोचले होते, तेव्हाही पुष्पम प्रिया यांनी आपल्या चेहऱ्यावरील मास्क काढले नव्हते. 

त्यावेळी पुष्पम प्रिया चौधरी म्हणाल्या होत्या की, नितीश कुमार यांचे माझ्या वडिलांशी कौटुंबिक संबंध होते. त्यांच्यासाठी नितीशकुमार हे नेते होते. नितीशकुमार यांच्याकडून त्यांना खूप अपेक्षा होत्या. बिहारमधील परिस्थितीसाठी मी नितीशकुमारांना जबाबदार धरते. कौटुंबिक संबंध बाजूला आहे. मात्र आजही मी राजकीयदृष्ट्या नितीशकुमारांच्या विरोधात आहे.

दरम्यान, नुकतेच जेव्हा नितीश कुमार यांच्या सरकारने पंचायत प्रतिनिधींचे वेतन आणि भत्ते वाढवले ​​होते, तेव्हा पुष्पम प्रिया चौधरी यांनी सरकारची खिल्ली उडवली होती. सरकारने पंचायत प्रतिनिधींचे मानधन 2500 रुपयांवरून 5000 हजार रुपयांपर्यंत वाढवून एक उपकार केले आहे. विधानसभा प्रतिनिधींना लाखो रुपये पगार व इतर भत्ते व सुविधा मिळतात. त्याच बिहारमध्ये पंचायत प्रतिनिधींना चिल्लर दिली जात आहे, असे पुष्पम प्रिया चौधरी यांनी म्हटले होते. 

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारBiharबिहार