शहरं
Join us  
Trending Stories
1
'वक्फ बोर्डाच्या जमिनी मूळ मालकांना परत मिळाव्या'; चंद्रशेखर बावनकुळे यांची मागणी
2
डीपफेक व्हिडीओवर बसणार आळा, मोदी सरकार आणणार डिजिटल इंडिया विधेयक; यूट्यूबवरही नियंत्रण येणार
3
अलकनंदामध्ये मिनी बस ६६० फूट खाली कोसळली; रुद्रप्रयाग दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू, चौकशीचे आदेश
4
भारत-कॅनडा सामन्याचा निकाल लागला! जाणून घ्या टीम इंडियाचं Super 8 वेळापत्रक
5
संरक्षक भिंत तोडून सिमेंट मिक्सर कोसळला सात जण जखमी
6
पाकिस्तानला धुणारा पाऊस गतविजेत्या इंग्लंडची नौका बुडवणार? अँटिग्वावरील लाईव्ह दृश्य
7
मणिपूरमध्ये सचिवालयजवळच्या इमारतीला भीषण आग; जवळच मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान
8
“लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला सर्वाधिक बळ महाराष्ट्राने दिले”; जयंत पाटील स्पष्टच बोलले
9
Raju Shetty : 'महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माझी फसवणूक केली'; राजू शेट्टींचा गंभीर आरोप
10
सरकारकडून अद्यापपर्यंत उपोषणाची दखल का नाही : लक्ष्मण हाके
11
“इटलीत थाट मणिपूरकडे मात्र पाठ, हीच का मोदींची गॅरंटी?”; NCP शरद पवार गटाचा सवाल
12
विराट कोहली कोणत्या गोष्टीवरून चिडलेला दिसला? IND vs CAN सामन्याबाबत महत्त्वाचे अपडेट्स
13
“मी म्हणालो होतो, आम्हाला भाजपामुक्त राम हवा, अयोध्यावासीयांनी करुन दाखवले”: उद्धव ठाकरे
14
इंटरनेटवर पाहून केलेलं डाएटिंग ठरू शकतं जीवघेणं; तुम्हीही करताय का 'ही' चूक?
15
शुबमन गिलने खरंच इंस्टाग्रामवर रोहितला अनफॉलो केले का? राखीव खेळाडूवर शिस्तभंगाची कारवाई?
16
'मविआ'मध्ये छोटा, मोठा भाऊ कुणीही नाही, लवकरच जागावाटप करणार'; पृथ्वीराज चव्हाणांनी चर्चांना दिला पूर्णविराम
17
"आता यांच्यामध्ये बसून..."; भाजपसोबत जाण्यावर उद्धव ठाकरेंचं शरद पवारांसमोर सूचक विधान
18
विधानसभेला तरी प्रकाश आंबेडकरांना सोबत घेणार का? उद्धव ठाकरेंचे एका वाक्यात उत्तर, म्हणाले...
19
“लोकसभेत आमचा स्ट्राइक रेट चांगला, महायुतीत आम्हीच मोठा भाऊ”; शिंदे गटातील नेत्यांचे विधान
20
"विजयाचं श्रेय जसं मला मिळतं, तसंच पराभवाचं कारणही मीच, कार्यकर्त्यांची माफी मागतो"

मुलीने पळून जाऊन केलं लग्न, पंचायतीने प्रेमविवाहावरच घातली बंदी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2018 1:32 PM

सगळ्यांनाच धक्का बसेल असा निर्णय पंचायतीने घेतला आहे.

लुधियाना- एका प्रेमी युगुलाने पळून लाऊन लग्न केल्याची घटना पंजाबमध्ये घडली. या घटनेमुळे सगळ्यांनाच धक्का बसेल असा निर्णय पंचायतीने घेतला आहे. चणकोईया खुर्द गावातील ही घटना असून गावाने थेट प्रेमविवाहावर बंदी घालणारा ठरावच मंजूर केला. तसंच या ठरावाचं उल्लंघन करणाऱ्या जोडप्यावर व त्यांच्याशी संबंध ठेवणाऱ्या नातेवाईकांवर बहिष्कार टाकला जाईल, अशी एकप्रकारची धमकी दिली आहे. 

29 एप्रिलला गावातील पंचायतीमध्ये ठराव मांडण्यात आला. गावातील गुरुद्वारा समिती आणि स्पोर्ट्स क्लबनेही या ठरावाला मान्यता दिली. या ठरावानुसार आता गावात प्रेमविवाहावर बंदी असेल. पंचायतीने संमत केलेल्या ठरावात नमूद केलं आहे की, एखाद्या मुलाने किंवा मुलीने त्यांच्या मनानुसार लग्न केलं तर त्यांना समजातून बहिष्कृत केलं जाईल. तसंच दोघांच्या कुटुंबीयांनी किंवा नातेवाईकांनी त्यांच्याशी संबंध ठेवले तर त्यांच्यावरही बहिष्कार टाकला जाईल. दुकानदारांनी त्या जोडप्याला कोणत्याही वस्तू विकता येणार नाही. अशा जोडप्याला गावातील सार्वजनिक जागा वापरता येणार नाही. ग्रामपंचायत तसेच गुरुद्वाराने उपलब्ध करुन दिलेल्या सुविधांचा लाभही घेता येणार नाही. पंचायतीच्या या ठरावाची माहिती पत्रकाद्वारे गावातील बस थांबा आणि रस्त्यालगतच्या भिंतीवर लावण्यात आली आहे. 

दरम्यान, पंचायतीच्या या ठरावाचं गावाचे सरपंच हकम सिंग यांनी समर्थन केलं आहे. हा फतवा नसून गावाने एकमताने घेतलेला निर्णय आहे. मुलीचे आजोबा आणि कुटुंबीयांनीच असा ठराव मांडण्याची मागणी केली होती. ठराव मंजूर केला नाही तर आत्मदहन करु असा इशारा त्यांनी दिला होता, असं ते म्हणाले.  दरम्यान, पंचयतीच्या या ठरावाची अंमलबजावणी होणार नसल्याचं कायदेतज्ज्ञांचं मत आहे. संविधानातील मूलभूत अधिकारांचं हे उल्लंघन आहे, असं सामाजिक संघटनांनी म्हटलं आहे.