शहरं
Join us  
Trending Stories
1
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
4
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
5
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
6
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
7
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
8
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
9
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
10
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
11
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
12
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
13
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
14
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
15
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
16
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
17
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
18
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
19
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
20
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!

Punjab Traffic Rules: दारू पिऊन वाहन चालवल्यास रक्तदान आणि समाजसेवा; पंजाब सरकारचा अनोखा उपक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2022 15:40 IST

Punjab Traffic Rules: पंजाबमधील आम आदमी पक्षाच्या सरकारने राज्यात वाहतूक नियमांबाबत नवीन अधिसूचना जारी केली आहे.

चंदीगड:पंजाबमधील आम आदमी पक्षाच्या सरकारने राज्यात वाहतूक नियमांबाबत नवीन अधिसूचना जारी केली आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास आता केवळ दंड भरावा लागणार नाही, तर चुकीची पुनरावृत्ती केल्यास दुप्पट दंड भरावा लागेल. यासोबतच दारू पिऊन वाहन चालवणाऱ्याचे ड्रायव्हिंग लायसन्स तीन महिन्यांसाठी निलंबित करण्यात येईल आणि त्या व्यक्तीला नजीकच्या रुग्णालयात समाजसेवा करावी लागेल किंवा एक युनिट रक्तदान करावे लागेल.

नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई

पंजाब सरकारने वाहतुकीच्या नियमात केलेले बदल सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. कोणी वाहतुकीचा नियम मोडला तर त्याला रिफ्रेशर कोर्स करावा लागेल, असे नोटिफिकेशनमध्ये नमूद करण्यात आले आहे. यानंतर परिवहन प्राधिकरणाकडून प्रमाणपत्रही घ्यावे लागणार आहे. एवढेच नाही तर किमान 20 शालेय विद्यार्थ्यांना दोन तास वाहतुकीचे नियम शिकवावे लागणार आहेत. याशिवाय, सामान्य शिक्षा म्हणून ड्रायव्हिंग लायसन्स तीन महिन्यांसाठी निलंबित केले जाईल, असे या अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे. यामध्ये ओव्हरस्पीडिंग, वाहन चालवताना मोबाईल फोन वापरणे, दारू पिऊन गाडी चालवणे, ट्रिपल रायडिंग आणि सिग्लन तोडणे, यांचा समावेश आहे.

उल्लंघन केल्यास किती दंडओव्हरस्पीडिंगवर आता पंजाबमध्ये 1000 रुपये दंड आकारला जाईल. जर कोणी या नियमाचे वारंवार उल्लंघन करताना आढळले तर दंड दुप्पट केला जाईल. त्याचबरोबर दारू पिऊन गाडी चालवल्यास, गाडी चालवताना मोबाईल फोन वापरल्यास 5000 रुपये दंड आकारला जाईल. या नियमाचे दुसऱ्यांदा उल्लंघन केल्यास दंडाची रक्कम दुप्पट केली जाईल. ओव्हरलोड वाहनांवर प्रथमच 20 हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. दुसऱ्यांदा दुप्पट दंड भरावा लागेल. याशिवाय, पहिल्यांदा सिग्लन मोडल्यास किंवा ट्रिपल रायडिंग केल्यास 1,000 रुपये दंड आकारला जाईल. पुन्हा नियमाचे उल्लंघन केल्यास दुप्पट दंड भरावा लागेल. 

पंजाबमधील वाहतुकीची स्थिती काय आहेवाहतूक नियमांचे उल्लंघन रोखण्यासाठी आणि नवीन मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करण्यासाठी पंजाब सरकारने पोलिसांना ट्रॅफिक बॅरिअर्स बसवण्याचे निर्देश दिले आहेत. सध्या पंजाबमध्ये वाहतूक नियमांचे उल्लंघन सामान्य बाब झाली आहेय येथे दररोज 13 लोक रस्ते अपघातात मृत्युमुखी पडतात. 2011-2020 दरम्यान पंजाबमध्ये 56,959 हून अधिक अपघात झाले. ज्यामध्ये 46,550 लोकांचा मृत्यू झाला होता.

टॅग्स :PunjabपंजाबAAPआपBhagwant Mannभगवंत मान