शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या मुंबईतील बैठकीला भाजप कार्यकर्त्यालाच पाठविले? फोटो समोर आल्याने उडाली खळबळ...
2
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
3
दरमहा लाखोंची कमाई; तरीही महिन्याच्या शेवटी खर्चाला पैसे उरत नाही? आर्थिक तज्ञांनी सांगितलं खरं कारण
4
लिव्ह-इन पार्टनरच्या सांगण्यावरून रुग्णालयातून बाळ चोरलं, पण परत येताना रस्ताच विसरली! आणखी एक चूक केली अन्...
5
"रोहित आर्यने जो मार्ग स्वीकारला तो चुकीचा, पण..." काँग्रेसचे उपस्थित केले गंभीर प्रश्न
6
"मी मालिकेत येईन पण...", शिल्पा शिंदे 'भाभीजी घर पर है'मध्ये कमबॅक करणार? दिली प्रतिक्रिया
7
Mumbai Local Train Update: वांगणी-शेलू स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड; CSMT कडे जाणारी लोकलसेवा ठप्प
8
World Cup FINAL: टीम इंडियाला नडू शकते आफ्रिकन कर्णधार लॉरा वोल्वार्ड, जाणून घ्या रेकॉर्ड
9
भयानक! 'तो' वाद टोकाला गेला! बायकोने फेसबुक वापरल्याने नवरा संतापला, थेट जीवच घेतला
10
५ वर्षांसाठी ₹१० लाखांचं कार लोन घेतल्यास कोणत्या बँकेत किती पडेल EMI? पाहा संपूर्ण गणित
11
७-८ नव्हे तर 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमा बनवण्यासाठी लागले तब्बल 'इतके' कोटी; महेश मांजरेकर म्हणाले- "बजेट वाढलं कारण..."
12
पृथ्वीच्या 'महाविनाशा'चा धोका टळला? शास्त्रज्ञांचा नवीन अभ्यास समोर आला...
13
सोने महागले! मागणी १६% ने घटली; लोक आता ज्वेलरीपेक्षा 'या' फॉर्ममध्ये करतायेत मोठी गुंतवणूक
14
जेमिमा रॉड्रीग्ज, गौतम गंभीर अन् माखलेली जर्सी... १४ वर्षांपूर्वीचा भारताचा 'विजयी' योगायोग
15
नोव्हेंबरमध्ये जन्मलेल्या व्यक्ती म्हणजे प्रेमाचा सागर, पण पोटात ज्वालामुखी; वाचा गुण दोष!
16
Rakhi Sawant : "मी दोन्ही किडन्या विकल्या, सलमानसाठी सोन्याची अंगठी घेतली"; राखी सावंतचा धक्कादायक दावा
17
सौदी अरेबियाने घेतला मोठा निर्णय! लाखों भारतीय मुस्लिमांवर होणार थेट परिणाम; नेमकं प्रकरण काय?
18
ट्रम्पना ठेंगा! भारतात परत येतेय 'ही' ऑटो कंपनी; ४ वर्षांपूर्वी बंद केलेली फॅक्ट्री परत होणार सुरू
19
वेगाची राणी...! महाराष्ट्राची लेक, डायना पंडोले इतिहास रचणार; फेरारी क्लब चॅलेंजमध्ये भाग घेणारी पहिली भारतीय महिला रेसर
20
Prabodhini Ekadashi 2025: विष्णूंची योगनिद्रा संपताच सलग २१ दिवस करा ही 'प्रभावी उपासना

Punjab Traffic Rules: दारू पिऊन वाहन चालवल्यास रक्तदान आणि समाजसेवा; पंजाब सरकारचा अनोखा उपक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2022 15:40 IST

Punjab Traffic Rules: पंजाबमधील आम आदमी पक्षाच्या सरकारने राज्यात वाहतूक नियमांबाबत नवीन अधिसूचना जारी केली आहे.

चंदीगड:पंजाबमधील आम आदमी पक्षाच्या सरकारने राज्यात वाहतूक नियमांबाबत नवीन अधिसूचना जारी केली आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास आता केवळ दंड भरावा लागणार नाही, तर चुकीची पुनरावृत्ती केल्यास दुप्पट दंड भरावा लागेल. यासोबतच दारू पिऊन वाहन चालवणाऱ्याचे ड्रायव्हिंग लायसन्स तीन महिन्यांसाठी निलंबित करण्यात येईल आणि त्या व्यक्तीला नजीकच्या रुग्णालयात समाजसेवा करावी लागेल किंवा एक युनिट रक्तदान करावे लागेल.

नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई

पंजाब सरकारने वाहतुकीच्या नियमात केलेले बदल सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. कोणी वाहतुकीचा नियम मोडला तर त्याला रिफ्रेशर कोर्स करावा लागेल, असे नोटिफिकेशनमध्ये नमूद करण्यात आले आहे. यानंतर परिवहन प्राधिकरणाकडून प्रमाणपत्रही घ्यावे लागणार आहे. एवढेच नाही तर किमान 20 शालेय विद्यार्थ्यांना दोन तास वाहतुकीचे नियम शिकवावे लागणार आहेत. याशिवाय, सामान्य शिक्षा म्हणून ड्रायव्हिंग लायसन्स तीन महिन्यांसाठी निलंबित केले जाईल, असे या अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे. यामध्ये ओव्हरस्पीडिंग, वाहन चालवताना मोबाईल फोन वापरणे, दारू पिऊन गाडी चालवणे, ट्रिपल रायडिंग आणि सिग्लन तोडणे, यांचा समावेश आहे.

उल्लंघन केल्यास किती दंडओव्हरस्पीडिंगवर आता पंजाबमध्ये 1000 रुपये दंड आकारला जाईल. जर कोणी या नियमाचे वारंवार उल्लंघन करताना आढळले तर दंड दुप्पट केला जाईल. त्याचबरोबर दारू पिऊन गाडी चालवल्यास, गाडी चालवताना मोबाईल फोन वापरल्यास 5000 रुपये दंड आकारला जाईल. या नियमाचे दुसऱ्यांदा उल्लंघन केल्यास दंडाची रक्कम दुप्पट केली जाईल. ओव्हरलोड वाहनांवर प्रथमच 20 हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. दुसऱ्यांदा दुप्पट दंड भरावा लागेल. याशिवाय, पहिल्यांदा सिग्लन मोडल्यास किंवा ट्रिपल रायडिंग केल्यास 1,000 रुपये दंड आकारला जाईल. पुन्हा नियमाचे उल्लंघन केल्यास दुप्पट दंड भरावा लागेल. 

पंजाबमधील वाहतुकीची स्थिती काय आहेवाहतूक नियमांचे उल्लंघन रोखण्यासाठी आणि नवीन मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करण्यासाठी पंजाब सरकारने पोलिसांना ट्रॅफिक बॅरिअर्स बसवण्याचे निर्देश दिले आहेत. सध्या पंजाबमध्ये वाहतूक नियमांचे उल्लंघन सामान्य बाब झाली आहेय येथे दररोज 13 लोक रस्ते अपघातात मृत्युमुखी पडतात. 2011-2020 दरम्यान पंजाबमध्ये 56,959 हून अधिक अपघात झाले. ज्यामध्ये 46,550 लोकांचा मृत्यू झाला होता.

टॅग्स :PunjabपंजाबAAPआपBhagwant Mannभगवंत मान