शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
2
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
3
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
4
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
5
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
6
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
7
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
8
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
9
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
10
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
11
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
12
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
13
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
14
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
15
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
16
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी
17
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
18
सर्वत्र मृतदेह, ओळख पटवणेही अशक्य; गुजरात सरकारकडून डीएनए सॅम्पल देण्याचं आवाहन
19
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
20
Ahmedabad Plane Crash : पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी

Punjab Power Crisis:  मोफतची वीज ‘आप’ला पडणार ‘महागात’!; शेतकरीही वैतागले, विरोध सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2022 13:01 IST

Punjab Power Crisis: पंजाबमध्ये अनेक ठिकाणी सहा सहा तास असते वीज गायब. सरकारी विभागानंही वीज बिलं भरली नाहीत.

Punjab Power Crisis: पंजाब निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्षानं सत्तेत आल्यानंतर ३०० युनिटपर्यंत वीज मोफत देण्याची घोषणा केली होती. त्यानंतर भगवंत मान यांनी मुख्यमंत्रीपदाची सूत्रं स्वीकारल्यावर त्यांनी राज्यात मोफत वीज देण्याची घोषणा केली. यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी मान यांचं अभिनंदनही केलं. “आम्ही आमचं आश्वासन पूर्ण केलं. आम्ही जे बोलतो ते करतो. आम्ही अन्य पक्षांप्रमाणे खोटी आश्वासनं देत नाही,” असं केजरीवाल म्हणाले होते. याला एक आठवडाच झाला असून आता शेतकऱ्यांनी सरकारला विरोध करत पुतळाही जाळला. तर दुसरीकडे विरोधकांकडूनही भगवंत मान सरकारवर टीका केली जात आहे.

पंजाबमध्ये अनेक कारणांमुळे वीजेचं उत्पादन कमी झालं आहे. यामुळे राज्य ब्लॅकआऊटच्या उंबरठ्यावर आहे. वीजेची वाढती मागणी आणि उपलब्धता यात सरकार संतुलन साधू शकत नसल्याचं म्हटलं जात आहे. तसंच राज्यातील एकूण १५ थर्मल पॉवर युनिटपैकी ४ युनिट बंद पडले आहेत. यामुळे ५५८० मेगावॅटच्या तुलनेत ३३२७ मेगावॅट वीज उपलब्ध होत आहे. 

आता वीजेची मागणी पूर्ण करण्यासाठी पीएसपीसीएलनं अघोषित लोड शेडिंगचा मार्ग स्वीकारला आहे. यामुळे राज्यातील ग्रामीण भागातील जनता त्रस्त झाली आहे. त्यांना त्या ठिकाणी दररोज लोड शेडिंगला सामोरं जावं लागत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार शहरांमध्येही ५ ते ६ वीज नसते.

का आहे समस्या?खराब ट्रान्समिशन लाईन्स आणि कमकुवत इन्फ्रास्ट्रक्चर हे याचं मोठं कारण मानलं जात आहे. याशिवाय कोळसा हीदेखील मुख्य समस्या आहे. याशिवाय पंजाबच्या सरकारी विभागांकडूही वीज बिलं भरलेली नाहीत आणि अधिक सब्सिडीनं पीएसपीसीएलला आर्थिक नुकसान केलं आहे.

फ्री सब्सिडी बिघडवणार गणितराज्याचं सध्याचं सब्सिडी बिल अंदाजे १३ हजार कोटी रुपये आहे. ते जुलैनंतर वाढून १९ हजार कोटी रुपये होईल. रिपोर्ट्सनुसार मोफत युनिट्समुळे सरकारवर ६ हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडणार आहे.

विरोध आणि नाराजीराज्यात सुरू असलेल्या अघोषित लोड शेडिंगचा शेतकरी विरोध करत आहेत. तर सामान्य जनतेतही नाराजी आहे. तर दुसरीकडे विरोधी पक्षाच्या नेत्यांनीही सरकारला प्रश्न विचारले आहेत. आता त्यांना समजलं पाहिजे सरकार खरं आव्हान आहे लाफ्टर चॅलेंज नाही, असं म्हणत पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष राजा अमरिंदर सिंग वडिंग यांनी मान सरकारवर निशाणा साधला

टॅग्स :PunjabपंजाबBhagwant Mannभगवंत मानArvind Kejriwalअरविंद केजरीवाल