शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
2
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
3
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
4
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
5
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
6
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
7
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
8
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
9
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
10
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
11
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
12
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
13
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
14
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
15
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
16
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
17
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
18
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
19
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
20
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर

अबुधाबीहून लग्नासाठी सुट्टी घेऊन आला अन् प्लान रद्द करून शेतकरी आंदोलनात सहभागी झाला

By कुणाल गवाणकर | Updated: December 26, 2020 11:17 IST

यूएईहून दोन महिन्यांची सुट्टी घेऊन आलेला तरुण शेतकरी आंदोलनात सहभागी

दिल्ली: मोदी सरकारनं आणलेल्या नव्या कृषी कायद्यांविरोधात पंजाब आणि हरयाणातील हजारो शेतकरी आंदोलन करत आहेत. दिल्लीच्या सीमेवरील भागांत गेल्या महिनाभरापासून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. यूएईहून आलेला एक तरुणदेखील शेतकऱ्यांच्या आंदोलनात सहभागी झाला आहे. विशेष म्हणजे हा तरुण लग्न करण्यासाठी दोन महिन्यांची सुट्टी काढून पंजाबमध्ये दाखल झाला. मात्र मोठा भाऊ आणि गावातील बरेचसे शेतकरी आंदोलनासाठी दिल्लीला जात असल्यानं पाहून त्यानंदेखील आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. पंजाबला जाऊन मुलगी शोधायची आणि लग्न करायचं या उद्देशानं २९ वर्षी सतनाम सिंगनं अबुधाबी सोडली. जवळपास दोन वर्षे सलग काम केल्यानंतर सतनामला दोन महिन्यांची रजा मिळाली. त्यानंतर तो २९ नोव्हेंबरला जालंधरला पोहोचला. त्यावेळी मोठा भाऊ आणि गावातील शेतकरी सिंघू सीमेवर सरकारविरुद्ध आंदोलन करत असल्याचं त्याला समजलं. सतनाम दोन दिवस आई बाबांसोबत राहिला. त्यानंतर त्यानं दुचाकीवरून एका मित्रासोबत दिल्ली-हरयाणाची सीमा गाठली.लग्न नंतर होऊ शकतं. नोकरी नंतर करता येऊ शकते, असं अबुधाबीत प्लंबर म्हणून काम करणाऱ्या सतनामनं पीटीआय वृत्तसंस्थेला सांगितलं. सतनामनं या सुट्टीत लग्न करावं, अशी त्याच्या पालकांची इच्छा होती. मात्र सतनाम सध्या आंदोलनात सहभागी झाला आहे. 'मी सुट्टीत लग्न करावं. माझा संसार सुरू व्हावा, अशी माझ्या पालकांची इच्छा आहे. माझी आई आता ७० वर्षांची आहे. तिच्या दृष्टीवर परिणाम झाला आहे. तिला नीटसं दिसत नाही. वडिलांचं वयदेखील जास्त असल्यानं त्यांना शेतातील सर्व कामं जमत नाही,' अशा शब्दांत सतनामनं घरातील परिस्थिती सांगितली.सतनामचे पालक घरी आहेत. त्यांना सोडून सतनाम आंदोलनासाठी सिंघू सीमेवर आला आहे. मात्र त्यांनी सतनामला रोखलं नाही, असं सतनामचा मित्र सुखा सिंहनं सांगितलं. अजून किती दिवस आंदोलन करणार, असा प्रश्न विचारला असता, जोपर्यंत लढा जिंकत नाही तोपर्यंत, असं उत्तर सतनामनं दिलं. 'मी आधी शेतकरी आहे. सुरुवातीला शेतातच काम करायचो. त्यानंतर नोकरीसाठी यूएईला गेलो. मला आधी माझं शेत वाचवायचं आहे,' असं सतनाम म्हणाला. 

टॅग्स :marriageलग्नFarmerशेतकरी