शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

Punjab Flood : पुराचे थैमान! पंजाबमधील मृतांचा आकडा ५१ वर; पिकं पाण्याखाली, शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2025 11:38 IST

Punjab Flood : पुरामुळे आतापर्यंत १५ जिल्ह्यांतील ३.८७ लाखांहून अधिक लोक प्रभावित झाले आहेत आणि सुमारे १.८४ लाख हेक्टरवरील पिकांचं मोठं नुकसान झालं आहे.

पंजाबमधीलपूरस्थिती अजूनही गंभीर आहे. सध्या राज्यात पाऊस पडत नसला तरी आणि काही दिवसांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. परंतु गेल्या काही दिवसांत आलेल्या पुराचे परिणाम अजूनही भयावह आहे. गेल्या २४ तासांत मानसा, मोगा आणि पटियाला जिल्ह्यात आणखी ३ जणांचा मृत्यू झाल्यानंतर मृतांचा आकडा ५१ वर पोहोचला आहे.

पुरामुळे आतापर्यंत १५ जिल्ह्यांतील ३.८७ लाखांहून अधिक लोक प्रभावित झाले आहेत आणि सुमारे १.८४ लाख हेक्टरवरील पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. सरकारने मदतीसाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. पंजाब मंत्रिमंडळाने शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे आणि पूरग्रस्त शेतांसाठी प्रति एकर २०,००० रुपये भरपाई जाहीर केली आहे. ‘जिसदा खेत, उसकी रेत’ योजना मंजूर करण्यात आली आहे, ज्याअंतर्गत शेतकरी पुरानंतर शेतात साचलेली वाळू काढू शकतील आणि विकू शकतील. यामुळे त्यांना त्यांचे नुकसान भरून काढण्यास मदत होईल. 

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक बाधित गावांमध्ये पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे परिस्थिती सुधारू लागली आहे.बियास नदीवर बांधलेल्या पोंग धरणाची पाण्याची पातळी १,३९०.७४ फूट झाली आहे, तर एक दिवस आधी ती १,३९२.२० फूट होती. धरणातील पाण्याचा प्रवाह रविवारी ३६,९६८ क्युसेकवरून ३४,५८० क्युसेकवर आला आहे. भाक्रा धरणातील पाण्याची पातळी देखील १,६७७.२ फुटावर आली आहे. सतत देखरेख आणि पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे पूरग्रस्त भागात काही प्रमाणात दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

महसूल मंत्री हरदीप सिंग मुंडियां म्हणाले की, आतापर्यंत १,८४,९३८ हेक्टरवरील पिकं पुरामुळे उद्ध्वस्त झाली आहेत. घरं आणि पशुधनाच्या नुकसानीचे मूल्यांकन अद्याप सुरू आहे आणि पाणी ओसरल्यानंतर संपूर्ण तपशील समोर येईल. त्याच वेळी पठाणकोट जिल्ह्यात तीन लोक अजूनही बेपत्ता आहेत. पंजाबमधील या पुराचा केवळ कृषी उत्पादनावरच नव्हे तर ग्रामीण अर्थव्यवस्थेवरही खोलवर परिणाम होईल असं तज्ज्ञांचं मत आहे.

टॅग्स :PunjabपंजाबfloodपूरRainपाऊस