शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

Punjab Flood : पुराचे थैमान! पंजाबमधील मृतांचा आकडा ५१ वर; पिकं पाण्याखाली, शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2025 11:38 IST

Punjab Flood : पुरामुळे आतापर्यंत १५ जिल्ह्यांतील ३.८७ लाखांहून अधिक लोक प्रभावित झाले आहेत आणि सुमारे १.८४ लाख हेक्टरवरील पिकांचं मोठं नुकसान झालं आहे.

पंजाबमधीलपूरस्थिती अजूनही गंभीर आहे. सध्या राज्यात पाऊस पडत नसला तरी आणि काही दिवसांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. परंतु गेल्या काही दिवसांत आलेल्या पुराचे परिणाम अजूनही भयावह आहे. गेल्या २४ तासांत मानसा, मोगा आणि पटियाला जिल्ह्यात आणखी ३ जणांचा मृत्यू झाल्यानंतर मृतांचा आकडा ५१ वर पोहोचला आहे.

पुरामुळे आतापर्यंत १५ जिल्ह्यांतील ३.८७ लाखांहून अधिक लोक प्रभावित झाले आहेत आणि सुमारे १.८४ लाख हेक्टरवरील पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. सरकारने मदतीसाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. पंजाब मंत्रिमंडळाने शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे आणि पूरग्रस्त शेतांसाठी प्रति एकर २०,००० रुपये भरपाई जाहीर केली आहे. ‘जिसदा खेत, उसकी रेत’ योजना मंजूर करण्यात आली आहे, ज्याअंतर्गत शेतकरी पुरानंतर शेतात साचलेली वाळू काढू शकतील आणि विकू शकतील. यामुळे त्यांना त्यांचे नुकसान भरून काढण्यास मदत होईल. 

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक बाधित गावांमध्ये पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे परिस्थिती सुधारू लागली आहे.बियास नदीवर बांधलेल्या पोंग धरणाची पाण्याची पातळी १,३९०.७४ फूट झाली आहे, तर एक दिवस आधी ती १,३९२.२० फूट होती. धरणातील पाण्याचा प्रवाह रविवारी ३६,९६८ क्युसेकवरून ३४,५८० क्युसेकवर आला आहे. भाक्रा धरणातील पाण्याची पातळी देखील १,६७७.२ फुटावर आली आहे. सतत देखरेख आणि पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे पूरग्रस्त भागात काही प्रमाणात दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

महसूल मंत्री हरदीप सिंग मुंडियां म्हणाले की, आतापर्यंत १,८४,९३८ हेक्टरवरील पिकं पुरामुळे उद्ध्वस्त झाली आहेत. घरं आणि पशुधनाच्या नुकसानीचे मूल्यांकन अद्याप सुरू आहे आणि पाणी ओसरल्यानंतर संपूर्ण तपशील समोर येईल. त्याच वेळी पठाणकोट जिल्ह्यात तीन लोक अजूनही बेपत्ता आहेत. पंजाबमधील या पुराचा केवळ कृषी उत्पादनावरच नव्हे तर ग्रामीण अर्थव्यवस्थेवरही खोलवर परिणाम होईल असं तज्ज्ञांचं मत आहे.

टॅग्स :PunjabपंजाबfloodपूरRainपाऊस