शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

पंजाबमध्ये शेतकऱ्यांची पाणी व विजेची बिले माफ, मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी यांनी केली घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2021 12:39 IST

शपथविधीनंतर पत्रकार परिषदेत चन्नी यांनी शेतकऱ्यांची वीज व पाण्याची बिले माफ करण्याची घोषणा करतानाच तिन्ही कृषी कायदे केंद्राने मागे घ्यावेत, अशी मागणी केली.

चंदीगड : कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसने लगेचच रविवारी मुख्यमंत्री म्हणून चरणजित सिंग चन्नी यांचे नाव जाहीर केले आणि सोमवारी त्यांचा शपथविधीही पार पडला. त्यांच्याबरोबरच सुखिंदर सिंग रंधावा व ओमप्रकाश सोनी या दोघांनाही राज्यपाल बनवारीलाल पुराेहित यांनी शपथ दिली. हे दोघे उपमुख्यमंत्री असतील. 

शपथविधीनंतर पत्रकार परिषदेत चन्नी यांनी शेतकऱ्यांची वीज व पाण्याची बिले माफ करण्याची घोषणा करतानाच तिन्ही कृषी कायदे केंद्राने मागे घ्यावेत, अशी मागणी केली. त्यांच्यासोबत प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिद्धू व निरीक्षक हरीश रावत होते. सहा महिन्यांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने मुख्यमंत्र्यांनी लगेचच पावले टाकायला सुरुवात केल्याचे यातून दिसून आले. शपथविधीनंतर ते अतिशय हळवे झाले होते. केवळ काँग्रेसमुळेच माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातील व्यक्तीला हे पद मिळू शकले, असे सांगताना त्यांना अश्रू आवरता आले नाहीत.

चन्नी हे पंजाबचे पहिले दलित शीख मुख्यमंत्री असून, उपमुख्यमंत्री रंधावा हे जाट शीख, तर ओमप्रकाश सोनी हिंदू आहेत. मुख्यमंत्रिपदासाठी रंधावा यांचे नावही घेतले जात होते; पण आयत्या वेळी ते मागे पडले. मात्र, पक्षाचा निर्णय आपणास मान्य आहे, असे त्यांनी जाहीर केले. 

३४ राखीव जागांवर डोळा, जातीच्या समीकरणांवर काँग्रेसचा भर -पंजाब विधानसभा निवडणुका डोळ्य़ांसमोर ठेवून काँग्रेसने पंजाबमधील शीख, दलित व हिंदू तिन्ही प्रमुख समुदायांना सत्तेतील मोठी पदे दिली  आहेत. पंजाबमध्ये दलित लोकसंख्या ३२ टक्के असून, विधानसभेत ३४ जागा राखीव आहेत. गेल्या निवडणुकीत राखीव ३४ पैकी काँग्रेसने २२ व आपने ९ जागांवर बाजी मारली होती. काँग्रेसने एकूण ११७ पैकी ७७ जागा जिंकल्या होत्या. 

   अकाली दलाने भाजपशी दोस्ती तोडल्यानंतर बहुजन समाज पार्टीशी युती करताना दलित नेत्यास उपमुख्यमंत्री करू, असे जाहीर केले आहे. ‘आप’नेही सत्तेत आल्यास दलित व्यक्तीस मुख्यमंत्री करण्याची घोषणा केली आहे. त्याआधीच दलित नेत्यास मुख्यमंत्री करून, त्यांना शह देण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला आहे. राज्यात दलित शिखांचे प्रमाण ३२, जाट शिखांचे प्रमाण १९ टक्के आणि हिंदूंचे प्रमाण ३८ टक्के आहे. बहुसंख्य दलित हे शीख असल्याने शिखांचे एकूण प्रमाण ५१ टक्के इतके भरते. हे सामाजिक व राजकीय गणित विचारात घेऊनच मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी आणि उपमुख्यमंत्री सुखिंदर सिंग रंधावा व ओमप्रकाश सोनी यांनी निवड झाली आहे. अमरिंदर सिंग यांनी चन्नी यांचे अभिनंदन केले आहे. 

टॅग्स :PunjabपंजाबFarmerशेतकरीelectricityवीज