शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

पंजाबमध्ये शेतकऱ्यांची पाणी व विजेची बिले माफ, मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी यांनी केली घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2021 12:39 IST

शपथविधीनंतर पत्रकार परिषदेत चन्नी यांनी शेतकऱ्यांची वीज व पाण्याची बिले माफ करण्याची घोषणा करतानाच तिन्ही कृषी कायदे केंद्राने मागे घ्यावेत, अशी मागणी केली.

चंदीगड : कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसने लगेचच रविवारी मुख्यमंत्री म्हणून चरणजित सिंग चन्नी यांचे नाव जाहीर केले आणि सोमवारी त्यांचा शपथविधीही पार पडला. त्यांच्याबरोबरच सुखिंदर सिंग रंधावा व ओमप्रकाश सोनी या दोघांनाही राज्यपाल बनवारीलाल पुराेहित यांनी शपथ दिली. हे दोघे उपमुख्यमंत्री असतील. 

शपथविधीनंतर पत्रकार परिषदेत चन्नी यांनी शेतकऱ्यांची वीज व पाण्याची बिले माफ करण्याची घोषणा करतानाच तिन्ही कृषी कायदे केंद्राने मागे घ्यावेत, अशी मागणी केली. त्यांच्यासोबत प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिद्धू व निरीक्षक हरीश रावत होते. सहा महिन्यांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने मुख्यमंत्र्यांनी लगेचच पावले टाकायला सुरुवात केल्याचे यातून दिसून आले. शपथविधीनंतर ते अतिशय हळवे झाले होते. केवळ काँग्रेसमुळेच माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातील व्यक्तीला हे पद मिळू शकले, असे सांगताना त्यांना अश्रू आवरता आले नाहीत.

चन्नी हे पंजाबचे पहिले दलित शीख मुख्यमंत्री असून, उपमुख्यमंत्री रंधावा हे जाट शीख, तर ओमप्रकाश सोनी हिंदू आहेत. मुख्यमंत्रिपदासाठी रंधावा यांचे नावही घेतले जात होते; पण आयत्या वेळी ते मागे पडले. मात्र, पक्षाचा निर्णय आपणास मान्य आहे, असे त्यांनी जाहीर केले. 

३४ राखीव जागांवर डोळा, जातीच्या समीकरणांवर काँग्रेसचा भर -पंजाब विधानसभा निवडणुका डोळ्य़ांसमोर ठेवून काँग्रेसने पंजाबमधील शीख, दलित व हिंदू तिन्ही प्रमुख समुदायांना सत्तेतील मोठी पदे दिली  आहेत. पंजाबमध्ये दलित लोकसंख्या ३२ टक्के असून, विधानसभेत ३४ जागा राखीव आहेत. गेल्या निवडणुकीत राखीव ३४ पैकी काँग्रेसने २२ व आपने ९ जागांवर बाजी मारली होती. काँग्रेसने एकूण ११७ पैकी ७७ जागा जिंकल्या होत्या. 

   अकाली दलाने भाजपशी दोस्ती तोडल्यानंतर बहुजन समाज पार्टीशी युती करताना दलित नेत्यास उपमुख्यमंत्री करू, असे जाहीर केले आहे. ‘आप’नेही सत्तेत आल्यास दलित व्यक्तीस मुख्यमंत्री करण्याची घोषणा केली आहे. त्याआधीच दलित नेत्यास मुख्यमंत्री करून, त्यांना शह देण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला आहे. राज्यात दलित शिखांचे प्रमाण ३२, जाट शिखांचे प्रमाण १९ टक्के आणि हिंदूंचे प्रमाण ३८ टक्के आहे. बहुसंख्य दलित हे शीख असल्याने शिखांचे एकूण प्रमाण ५१ टक्के इतके भरते. हे सामाजिक व राजकीय गणित विचारात घेऊनच मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी आणि उपमुख्यमंत्री सुखिंदर सिंग रंधावा व ओमप्रकाश सोनी यांनी निवड झाली आहे. अमरिंदर सिंग यांनी चन्नी यांचे अभिनंदन केले आहे. 

टॅग्स :PunjabपंजाबFarmerशेतकरीelectricityवीज