शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
3
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
4
BCCI च्या मुंबईतील कार्यालयात चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या मालालवर मारला डल्ला
5
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
6
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
7
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
8
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
9
Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री
10
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
11
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
12
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
13
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
14
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
15
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
16
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
17
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
18
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
19
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
20
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

Punjab Election Result 2022: मनसे नेते म्हणाले, "प्रस्थापितांना नाकारुन पंजाबने देशासमोर आदर्श ठेवला"

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2022 12:02 IST

Punjab Election Result 2022: पंजाबमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये आम आदमी पार्टीने  (AAP) मुसंडी मारली असून 64 हून अधिकजागांवर आघाडी घेतली आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमेय खोपकर (Ameya Khopkar) यांनी ट्विट केले आहे.

मुंबई : उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूर या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची मतमोजणी सुरु आहे. दरम्यान, पंजाबमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये आम आदमी पार्टीने  (AAP) मुसंडी मारली असून 64 हून अधिकजागांवर आघाडी घेतली आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमेय खोपकर (Ameya Khopkar) यांनी ट्विट केले आहे. प्रस्थापितांना नाकरुन पंजाबने देशासमोर आदर्श ठेवला आहे, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच पर्याय उपलब्ध असतात, फक्त डोळे उघडे ठेवावे लागतात, असेही अमेय खोपकर यांनी ट्विटद्वारे म्हटले आहे.

दरम्यान, पंजाब विधानसभा निवडणूक निकालात आम आदमी पार्टीने प्रस्थापितांना धक्का देत मोठे यश प्राप्त केले आहे. पंजाबमधील स्थानिक पक्षांना नाकारत, तसेच प्रस्थापितांविरोधात मतदान झाल्याचा कौल सुरुवातीच्या कलांमध्ये दिसून आला आहे. पंजाबमध्ये काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. काँगेसचे अनेक दिग्गज नेते पिछाडीवर आहेत. तसेच शिरोमणी अकाली दलाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल देखील पिछाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे. 

एक्झिट पोलच्या अंदाजांनुसार पंजाबमध्ये जितक्या जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता, त्यापेक्षा जास्त जागा आपला मिळत असल्याचे मतमोजणीच्या कलांमधून दिसून येत आहे. दरम्यान, अंतिम निकालानंतर पंजाबमधील राजकीय स्थिती स्पष्ट होईल. मात्र सध्याच्या निकालांनी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, आज जे निकाल हाती आले आहेत, त्या निवडणुका आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांनी भगवंत मान यांच्या नेतृत्त्वाखाली पंजाबमध्ये लढवल्या होत्या. 

आम आदमी पार्टी काय म्हणते?दिवसही मोठा आहे कारण प्रकाशसिंग बादल लांबीमधून पिछाडीवर आहेत. आपल्या सामान्य माणसांचा पराभव होत आहे. नवज्योतसिंग सिद्धू पराभूत होत आहेत. म्हणूनच आजचा दिवस चर्चेचा आहे असे मला वाटते. पंजाब आता भगवंत मान चालवतील आणि आम आदमी पार्टीचे लोक चालवतील, असे आम आदमी पार्टीचे नेते संजीव झा म्हणाले. तर भाजपाचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी म्हणाले की, आम्ही अर्ध्या जागेवर लढलो, त्यामुळे हे होत आहे. आम्ही सर्व जागांवर लढलो असतो तर काहीतरी वेगळे झाले असते. 

टॅग्स :Punjab Assembly Election Results 2022पंजाब विधानसभा निवडणूक निकाल २०२२Punjab Assembly Election 2022पंजाब विधानसभा निवडणूक २०२२MNSमनसेAAPआपArvind Kejriwalअरविंद केजरीवाल