शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

Punjab Election 2022: पंजाबच्या विधानसभेला महिलांचे कायमच वावडे; पक्षांची प्रतिगामी मानसिकता

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2022 10:46 IST

महाराष्ट्र विधानसभा ही पंजाबपेक्षा अडीचपट मोठी आहे, हे खरे असले तरी पंजाबमध्ये महिलांना संधी देण्यात राजकीय पक्ष मागे असल्याचेच चित्र दिसते.

विश्वास पाटील

अमृतसर : पंजाब विधानसभेला महिलांचे वावडे आहे की काय, अशी शंका यावी इतके कमी प्रतिनिधित्व आजपर्यंत या प्रदेशाने महिलांना दिले आहे. राजकीय पक्ष महिलांना उमेदवारी देण्यात मागे असले तरी महिला मात्र तुम्ही देत नसाल तर राहू दे; परंतु मी लढणार, अशी भूमिका घेऊन मैदानात उतरत आहेत. त्यामुळे प्रत्येक निवडणुकीत अपक्ष निवडणूक लढवणाऱ्या महिलांचे प्रमाण मात्र लक्षणीय आहे.महाराष्ट्राच्या विधानसभेत सध्या २४ महिला आमदार आहेत.

महाराष्ट्र विधानसभा ही पंजाबपेक्षा अडीचपट मोठी आहे, हे खरे असले तरी पंजाबमध्ये महिलांना संधी देण्यात राजकीय पक्ष मागे असल्याचेच चित्र दिसते. ही दोन्ही राज्ये अनेक बाबतीत पुढारलेली म्हणून ओळखली जातात. महाराष्ट्राने अजून महिलेला मुख्यमंत्री म्हणून संधी दिलेली नाही. पंजाबात मात्र काँग्रेसच्या राजिंदर कौर भट्टल या १९९७ मध्ये ८२ दिवसांच्या का असेनात; परंतु मुख्यमंत्री झाल्या होत्या. या राज्यात महिलांचे ४८ टक्के मतदान आहे. यापूर्वी १९६९ च्या निवडणुकीत एकही महिला आमदार म्हणून निवडून आलेली नव्हती.  विधानसभेच्या १९६० पासून २०१७ पर्यंत ११७ सदस्यांच्या सभागृहात सर्वाधिक १४ महिला २०१२ मध्ये निवडून आल्या होत्या. आता होऊ घातलेल्या निवडणुकीत एकूण १,३०४ उमेदवारांमध्ये ९३ महिला उमेदवार आहेत. त्यापैकी ३५ महिलांना विविध पक्षांनी संधी दिली असून, उर्वरित बहुतांशी अपक्ष म्हणून नशीब अजमावत आहेत.

पक्ष संधी द्यायला तयार नाहीतपंजाबमधील महिलांना राजकारणात रस आहे. निवडणूकही लढवायची आहे; परंतु राजकीय पक्ष संधी द्यायला तयार नाहीत. निवडून येण्याची क्षमता हे एक त्यामागील महत्त्वाचे कारण असले तरी जोपर्यंत संधी मिळणार नाही तोपर्यंत ही क्षमताही वाढणार नाही. या राज्याने स्थानिक स्वराज्य संस्थेत मात्र महिलांना ५० टक्के आरक्षण दिले आहे. नव्या सभागृहात पंजाबी लोक किती महिलांना आमदार करतात, हीच खरी उत्सुकता आहे.

सरंजामशाही मनोवृत्तीच कारणीभूतपंजाबमध्ये महिला सर्व क्षेत्रांत अग्रेसर आहेत. त्या ट्रॅक्टर चालवितात. कृषी बिलाच्या विरोधातील आंदोलनातही त्या पुढे होत्या; परंतु निवडणुकीत राजकीय पक्ष महिलांना संधी देत नाहीत, यामागे या प्रदेशाची सरंजामशाही मनोवृत्तीच कारणीभूत आहे. -जुपिंदरजित सिंग,ज्येष्ठ पत्रकार, चंदीगड 

टॅग्स :Punjab Assembly Election 2022पंजाब विधानसभा निवडणूक २०२२