शहरं
Join us  
Trending Stories
1
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
2
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
3
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
4
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
5
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
6
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
7
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
8
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
9
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
10
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
11
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
12
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
13
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
14
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
15
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
16
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
17
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
18
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
19
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
20
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
Daily Top 2Weekly Top 5

Punjab Election 2022: काँग्रेसच्या खासदार भाजपच्या कार्यक्रमात; म्हणाल्या, माझ्यासाठी कुटुंब आधी, मग... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2022 06:54 IST

अमरिंदर यांच्या विजयासाठी पत्नी परनीत यांची धडपड तर अमरिंदर सिंग यांच्या नेतृत्वाखालील पंजाब सरकार दिल्लीतून भाजप चालवित होते, म्हणून ते बदलावे लागले, असा दावा काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांनी रविवारी येथे केला.

बलवंत तक्षकचंदीगड : पंजाबच्या पटियालातील काँग्रेसच्या खासदार परनीत कौर या शिस्तभंगाच्या कारवाईची पर्वा न करता भाजपाच्या कार्यक्रमांना उपस्थित राहत आहेत. त्या म्हणाल्या की, माझ्यासाठी कुटुंब अगोदर आहे आणि पती कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यासाठी मते मागण्यासाठी मी आले आहे. काँग्रेसपासून वेगळे झाल्यानंतर अमरिंदर सिंग हे पटियाला शहरी विधानसभा मतदारसंघातून पंजाब लोक काँग्रेस या आपल्या पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढत आहेत. त्यांनी भाजपसोबत आघाडी केली आहे. त्यामुळे त्यांच्या पत्नी खासदार परनीत कौर या भाजपाच्या कार्यक्रमात सहभागी होत आहेत. 

भाजपा नेत्यांच्या उपस्थितीत परनीत कौर यांनी लोकांना हात जोडून विनंती केली की, कॅप्टन अमरिंदर सिंग यांना विजयी करा. यापूर्वी अमरिंदर सिंग यांच्या समर्थनार्थ केलेल्या एका विधानावरून परनीत कौर यांना पंजाबचे प्रभारी हरीश चौधरी यांनी काही दिवसांपूर्वी कारणे दाखवा नोटीस जारी केली होती. त्यांनी अद्याप या नोटिसीला उत्तर दिलेले नाही. त्यांचे असे म्हणणे आहे की, नोटीस पक्षाच्या सरचिटणीसांकडून यायला हवी. 

भाजप दिल्लीतून सरकार चालवीत होते म्हणून अमरिंदर यांना हटविले -प्रियांका गांधी

अमरिंदर सिंग यांच्या नेतृत्वाखालील पंजाब सरकार दिल्लीतून भाजप चालवित होते, म्हणून ते बदलावे लागले, असा दावा काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांनी रविवारी येथे केला. कोटकपुरा येथे जाहीर सभेत त्या बोलत होत्या.  आम आदमी पार्टी प्रचार करीत असलेल्या शासनाच्या ‘दिल्ली मॉडेल’पासून लोकांनी सावध राहण्याचे आवाहन करतांना त्या म्हणाल्या की, २०१४ मध्ये गुजरात मॉडेलचा प्रचार करून भाजप केंद्रात सत्तेत आली होती.

अमरिंदर सिंग यांंना मुख्यमंत्रीपदावरून हटविण्याच्या मुद्द्यावर माजी मुख्यमंत्र्यांच्या नावाचा उल्लेख न करता त्या म्हणाल्या की, आमचे पाच वर्षे येथे सरकार होते, हे खरे आहे. सरकारमध्ये काही उणीवा होत्या, हेही खरे आहे. हे सरकार आपल्या मार्गावरून भरकटले होते. दिल्लीतून काँग्रेसकडून नव्हेतर भाजप आणि भाजपप्रणीत सरकारमार्फत चालविले जात होते. हे लागेबांधे उघड झाले. त्यामुळे आम्हाला सरकार बदलावे लागले.

आम्ही तुमचे म्हणणे ऐकत होते. काही तरी चुकीचे होते, याची जाणीव होत होती; परंतु,  आम्ही सर्व काही व्यवस्थित केले आणि पंजाबच्या जनतेला चन्नी यांच्यासारखी व्यक्ती मिळाली.  गरीब कुटुंबातून आलेले ते मुख्यमंत्री आहेत. त्यांनी शंभर-दीडशे दिवसांत खूप काम केले.  पंजाब सरकार पंजाबमधून चालविले पाहिजे.  केजरीवाल यांच्या इशाऱ्यावर दिल्लीतून सरकार चालविण्याचा आम आदमी पार्टीचा बेत आहे, म्हणून या पक्षाला पाठिंबा देण्याची मागची चूक पुन्हा करू नका, असे आवाहनही त्यांनी केले. नवा विचार, नवा पंजाब जाहीर सभेत बोलताना त्यांनी आश्वासन दिले की, चन्नी यांच्या नेतृत्वाखाली सरकार सत्तेत आल्यास  गरजू कुटुंबांना दरवर्षी ८ मोफत सिलिंडर मिळतील आणि या कुटुंबातील महिलांनाही दरमहा ११०० रुपये मिळतील. सरकारी इस्पितळात २० लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळतील. राज्य रोजगार हमी योजनेनुसार दरवर्षी १०० दिवस रोजगाराची हमी असेल.

टॅग्स :Captain Amarinder Singhकॅप्टन अमरिंदर सिंगPunjab Assembly Election 2022पंजाब विधानसभा निवडणूक २०२२