शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

Punjab Election 2022: काँग्रेसच्या खासदार भाजपच्या कार्यक्रमात; म्हणाल्या, माझ्यासाठी कुटुंब आधी, मग... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2022 06:54 IST

अमरिंदर यांच्या विजयासाठी पत्नी परनीत यांची धडपड तर अमरिंदर सिंग यांच्या नेतृत्वाखालील पंजाब सरकार दिल्लीतून भाजप चालवित होते, म्हणून ते बदलावे लागले, असा दावा काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांनी रविवारी येथे केला.

बलवंत तक्षकचंदीगड : पंजाबच्या पटियालातील काँग्रेसच्या खासदार परनीत कौर या शिस्तभंगाच्या कारवाईची पर्वा न करता भाजपाच्या कार्यक्रमांना उपस्थित राहत आहेत. त्या म्हणाल्या की, माझ्यासाठी कुटुंब अगोदर आहे आणि पती कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यासाठी मते मागण्यासाठी मी आले आहे. काँग्रेसपासून वेगळे झाल्यानंतर अमरिंदर सिंग हे पटियाला शहरी विधानसभा मतदारसंघातून पंजाब लोक काँग्रेस या आपल्या पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढत आहेत. त्यांनी भाजपसोबत आघाडी केली आहे. त्यामुळे त्यांच्या पत्नी खासदार परनीत कौर या भाजपाच्या कार्यक्रमात सहभागी होत आहेत. 

भाजपा नेत्यांच्या उपस्थितीत परनीत कौर यांनी लोकांना हात जोडून विनंती केली की, कॅप्टन अमरिंदर सिंग यांना विजयी करा. यापूर्वी अमरिंदर सिंग यांच्या समर्थनार्थ केलेल्या एका विधानावरून परनीत कौर यांना पंजाबचे प्रभारी हरीश चौधरी यांनी काही दिवसांपूर्वी कारणे दाखवा नोटीस जारी केली होती. त्यांनी अद्याप या नोटिसीला उत्तर दिलेले नाही. त्यांचे असे म्हणणे आहे की, नोटीस पक्षाच्या सरचिटणीसांकडून यायला हवी. 

भाजप दिल्लीतून सरकार चालवीत होते म्हणून अमरिंदर यांना हटविले -प्रियांका गांधी

अमरिंदर सिंग यांच्या नेतृत्वाखालील पंजाब सरकार दिल्लीतून भाजप चालवित होते, म्हणून ते बदलावे लागले, असा दावा काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांनी रविवारी येथे केला. कोटकपुरा येथे जाहीर सभेत त्या बोलत होत्या.  आम आदमी पार्टी प्रचार करीत असलेल्या शासनाच्या ‘दिल्ली मॉडेल’पासून लोकांनी सावध राहण्याचे आवाहन करतांना त्या म्हणाल्या की, २०१४ मध्ये गुजरात मॉडेलचा प्रचार करून भाजप केंद्रात सत्तेत आली होती.

अमरिंदर सिंग यांंना मुख्यमंत्रीपदावरून हटविण्याच्या मुद्द्यावर माजी मुख्यमंत्र्यांच्या नावाचा उल्लेख न करता त्या म्हणाल्या की, आमचे पाच वर्षे येथे सरकार होते, हे खरे आहे. सरकारमध्ये काही उणीवा होत्या, हेही खरे आहे. हे सरकार आपल्या मार्गावरून भरकटले होते. दिल्लीतून काँग्रेसकडून नव्हेतर भाजप आणि भाजपप्रणीत सरकारमार्फत चालविले जात होते. हे लागेबांधे उघड झाले. त्यामुळे आम्हाला सरकार बदलावे लागले.

आम्ही तुमचे म्हणणे ऐकत होते. काही तरी चुकीचे होते, याची जाणीव होत होती; परंतु,  आम्ही सर्व काही व्यवस्थित केले आणि पंजाबच्या जनतेला चन्नी यांच्यासारखी व्यक्ती मिळाली.  गरीब कुटुंबातून आलेले ते मुख्यमंत्री आहेत. त्यांनी शंभर-दीडशे दिवसांत खूप काम केले.  पंजाब सरकार पंजाबमधून चालविले पाहिजे.  केजरीवाल यांच्या इशाऱ्यावर दिल्लीतून सरकार चालविण्याचा आम आदमी पार्टीचा बेत आहे, म्हणून या पक्षाला पाठिंबा देण्याची मागची चूक पुन्हा करू नका, असे आवाहनही त्यांनी केले. नवा विचार, नवा पंजाब जाहीर सभेत बोलताना त्यांनी आश्वासन दिले की, चन्नी यांच्या नेतृत्वाखाली सरकार सत्तेत आल्यास  गरजू कुटुंबांना दरवर्षी ८ मोफत सिलिंडर मिळतील आणि या कुटुंबातील महिलांनाही दरमहा ११०० रुपये मिळतील. सरकारी इस्पितळात २० लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळतील. राज्य रोजगार हमी योजनेनुसार दरवर्षी १०० दिवस रोजगाराची हमी असेल.

टॅग्स :Captain Amarinder Singhकॅप्टन अमरिंदर सिंगPunjab Assembly Election 2022पंजाब विधानसभा निवडणूक २०२२