शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
2
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
3
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
4
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
5
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
6
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा
7
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
8
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
9
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
10
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
11
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
12
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
13
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
14
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया
15
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
16
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
17
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
18
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
19
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
20
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा

Punjab Election 2022: काँग्रेसच्या खासदार भाजपच्या कार्यक्रमात; म्हणाल्या, माझ्यासाठी कुटुंब आधी, मग... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2022 06:54 IST

अमरिंदर यांच्या विजयासाठी पत्नी परनीत यांची धडपड तर अमरिंदर सिंग यांच्या नेतृत्वाखालील पंजाब सरकार दिल्लीतून भाजप चालवित होते, म्हणून ते बदलावे लागले, असा दावा काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांनी रविवारी येथे केला.

बलवंत तक्षकचंदीगड : पंजाबच्या पटियालातील काँग्रेसच्या खासदार परनीत कौर या शिस्तभंगाच्या कारवाईची पर्वा न करता भाजपाच्या कार्यक्रमांना उपस्थित राहत आहेत. त्या म्हणाल्या की, माझ्यासाठी कुटुंब अगोदर आहे आणि पती कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यासाठी मते मागण्यासाठी मी आले आहे. काँग्रेसपासून वेगळे झाल्यानंतर अमरिंदर सिंग हे पटियाला शहरी विधानसभा मतदारसंघातून पंजाब लोक काँग्रेस या आपल्या पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढत आहेत. त्यांनी भाजपसोबत आघाडी केली आहे. त्यामुळे त्यांच्या पत्नी खासदार परनीत कौर या भाजपाच्या कार्यक्रमात सहभागी होत आहेत. 

भाजपा नेत्यांच्या उपस्थितीत परनीत कौर यांनी लोकांना हात जोडून विनंती केली की, कॅप्टन अमरिंदर सिंग यांना विजयी करा. यापूर्वी अमरिंदर सिंग यांच्या समर्थनार्थ केलेल्या एका विधानावरून परनीत कौर यांना पंजाबचे प्रभारी हरीश चौधरी यांनी काही दिवसांपूर्वी कारणे दाखवा नोटीस जारी केली होती. त्यांनी अद्याप या नोटिसीला उत्तर दिलेले नाही. त्यांचे असे म्हणणे आहे की, नोटीस पक्षाच्या सरचिटणीसांकडून यायला हवी. 

भाजप दिल्लीतून सरकार चालवीत होते म्हणून अमरिंदर यांना हटविले -प्रियांका गांधी

अमरिंदर सिंग यांच्या नेतृत्वाखालील पंजाब सरकार दिल्लीतून भाजप चालवित होते, म्हणून ते बदलावे लागले, असा दावा काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांनी रविवारी येथे केला. कोटकपुरा येथे जाहीर सभेत त्या बोलत होत्या.  आम आदमी पार्टी प्रचार करीत असलेल्या शासनाच्या ‘दिल्ली मॉडेल’पासून लोकांनी सावध राहण्याचे आवाहन करतांना त्या म्हणाल्या की, २०१४ मध्ये गुजरात मॉडेलचा प्रचार करून भाजप केंद्रात सत्तेत आली होती.

अमरिंदर सिंग यांंना मुख्यमंत्रीपदावरून हटविण्याच्या मुद्द्यावर माजी मुख्यमंत्र्यांच्या नावाचा उल्लेख न करता त्या म्हणाल्या की, आमचे पाच वर्षे येथे सरकार होते, हे खरे आहे. सरकारमध्ये काही उणीवा होत्या, हेही खरे आहे. हे सरकार आपल्या मार्गावरून भरकटले होते. दिल्लीतून काँग्रेसकडून नव्हेतर भाजप आणि भाजपप्रणीत सरकारमार्फत चालविले जात होते. हे लागेबांधे उघड झाले. त्यामुळे आम्हाला सरकार बदलावे लागले.

आम्ही तुमचे म्हणणे ऐकत होते. काही तरी चुकीचे होते, याची जाणीव होत होती; परंतु,  आम्ही सर्व काही व्यवस्थित केले आणि पंजाबच्या जनतेला चन्नी यांच्यासारखी व्यक्ती मिळाली.  गरीब कुटुंबातून आलेले ते मुख्यमंत्री आहेत. त्यांनी शंभर-दीडशे दिवसांत खूप काम केले.  पंजाब सरकार पंजाबमधून चालविले पाहिजे.  केजरीवाल यांच्या इशाऱ्यावर दिल्लीतून सरकार चालविण्याचा आम आदमी पार्टीचा बेत आहे, म्हणून या पक्षाला पाठिंबा देण्याची मागची चूक पुन्हा करू नका, असे आवाहनही त्यांनी केले. नवा विचार, नवा पंजाब जाहीर सभेत बोलताना त्यांनी आश्वासन दिले की, चन्नी यांच्या नेतृत्वाखाली सरकार सत्तेत आल्यास  गरजू कुटुंबांना दरवर्षी ८ मोफत सिलिंडर मिळतील आणि या कुटुंबातील महिलांनाही दरमहा ११०० रुपये मिळतील. सरकारी इस्पितळात २० लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळतील. राज्य रोजगार हमी योजनेनुसार दरवर्षी १०० दिवस रोजगाराची हमी असेल.

टॅग्स :Captain Amarinder Singhकॅप्टन अमरिंदर सिंगPunjab Assembly Election 2022पंजाब विधानसभा निवडणूक २०२२