शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

भगवंत मान: कॉमेडियनपेक्षा राजकारणी जास्त; कसे आले राजकारणात? पाहा, कारकीर्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2022 08:02 IST

पंजाबमधील आम आदमी पार्टीचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून भगवंत मान यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.

शरद गुप्ता, लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : पंजाबमधील आम आदमी पार्टीचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार भगवंत मान हे फक्त कॉमेडियन नाहीत, अन्यथा पक्षाने केलेल्या सर्वेक्षणात २२ लाखांपैकी ९३ टक्के मते त्यांना मिळाली नसती. 

महाविद्यालयीन काळापासूनच स्टँड अप कॉमेडी सुरू केली होती. लाफ्टर चॅलेंज टीव्ही शो जिंकल्यानंतर त्यांच्याकडे टीव्ही व चित्रपटांच्या ऑफरची रांग लागली. तरीही त्यांनी सामाजिक सेवा करण्यास प्राधान्य दिले. 

पंजाबच्या वेगवेगळ्या भागांत कॉमेडी शो करताना त्यांनी जल प्रदूषणातून बालकांच्या हाडामध्ये आजार पसरताना पाहिला. तेव्हा त्यांनी २००६ मध्ये लोक लहर ही स्वयंसेवी संस्था स्थापन केली.  कॉमेडी शो करून मिळालेल्या पैशातून ते बालकांवर उपचार करतात. २०११मध्ये ते मनप्रीत बादल यांच्या संपर्कात आले. तत्कालीन मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल यांचे पुतणे व तत्कालीन वित्तमंत्री मनप्रीत यांनी त्यावेळी मंत्रिमंडळातून राजीनामा देऊन पंजाब पीपल्स पार्टी स्थापन केली होती.

असे पोहोचले संसदेत : भगवंत मान यांना आम आदमी पार्टी आवडली. २०१४ मधील संगरूर लोकसभा निवडणूक त्यांनी २.११ लाखांनी जिंकली व लोकसभेत आपल्या हजरजबाबीपणामुळे तसेच शायराना विनोदांमुळे त्यांनी मने जिंकली. २०१९ मध्ये संगरूरमधून विजयी होऊन लोकसभेत गेले.

उत्तर देणे सोडले :  दोन वर्षांपूर्वी त्यांनी दारू न पिण्याची शपथ व्यासपीठावर घेतली होती. आपण खरेच दारू सोडली आहे का, असे विचारले असता, खास अंदाजात ते म्हणतात, मी अशा आरोपांना उत्तर देणे सोडले आहे. 

टॅग्स :Punjab Assembly Election 2022पंजाब विधानसभा निवडणूक २०२२Aam Admi partyआम आदमी पार्टीArvind Kejriwalअरविंद केजरीवाल