शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

Pulwama Attack : मोठी बातमी ... अखेर त्या दोन तरुणांची कबुली, 'जैश ए मोहम्मद'च्या होते संपर्कात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2019 15:51 IST

Pulwama Attack : व्हॅलेंटाईन डे दिवशी 14 फेब्रुवारीला काश्मीरच्या पुलवामा येथे दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या जवानांची कार स्फोटकाने उडवली.

लखनौ -  पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली. तर सीमेवरही लष्कराकडून मोठी कारवाई करत दहशतवाद्यांना लक्ष्य करण्यात आलं. त्यानंतर,  उत्तर प्रदेश दहशतवादी विरोधी पथकाने दोन काश्मिरी तरुणांनी अटक केली होती. या दोन्ही तरुणांनी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी आपला संबंध असल्याची कुबली दिली आहे. एटीएसने शहारनपूर येथील देऊबंद शहरातून या दोघांना अटक केली होती. या तरुणांनी पुलवामा हल्ल्यांसदर्भात माहिती दिली असून अद्याप खोलवर तपास सुरू आहे 

व्हॅलेंटाईन डे दिवशी 14 फेब्रुवारीला काश्मीरच्या पुलवामा येथे दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या जवानांची कार स्फोटकाने उडवली. या भ्याड हल्ल्यात देशातील 39 जवान शहीद झाले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशीही दहशतवाद्यांच्या चकमकीत आणखी 3 जवानांना वीरमरण प्राप्त झाले. या घटनेने देश हळलला असून तीव्र शब्दात अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही या हल्ल्याचा जशास तशा रितीने उत्तर दिले जाईल, असे म्हणत पाकिस्तानला ठणकावले होते. तर, हल्ल्यानंतर पाच दिवसांनी सुरक्षा जवानांनी या हल्ल्यातील म्होरक्या अब्दुल रशीद गाझीला ठार केले. मात्र, या हल्ल्यासंदर्भात सुगावे आणि धागे दोरे शोधण्याचा तपास सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश दहशतवादी विरोधी पथकाकडून दोन काश्मिरी तरुणांना अटक करण्यात आली होती. शाहनवाज आणि अब्दुल मलिक अशी या अटक करण्यात आलेल्या तरुणांची नावे आहेत. 

उत्तर प्रदेशचे पोलीस महासंचालक ओ पी सिंह यांनी दोन्ही आरोपी तरुणांची चौकशी केली असता, आपले जैश-ए-मोहम्मदशी संबंध असल्याचं त्यांनी कबूल केलं. ओ पी सिंह यांनी तब्बल चार तास या तरुणांची चौकशी केली. त्यानंतर जम्मू काश्मीर पोलीस महासंचालक दिलबाग सिंह यांना ही माहिती देण्यात आली. या माहितीच्या आधारे भविष्यातील कट कारस्थानासंदर्भातील अजून काही गोष्टी हाती लागण्याची शक्यता आहे, असं ओ पी सिंह यांनी सांगितलं आहे. देवबंद येथून या दोन संशयित तरुणांना अटक केल्यानंतर लखनौ एटीएस न्यायलयाने या दोघांनाही 10 दिवसांच्या पोलीस कोठडीत पाठवले होते. या चौकशीदरम्यान, पोलिसांना ही माहिती मिळाली आहे. यातील शानवाज अहमद तेली हा जम्मू आणि काश्मीरच्या कुलमागचा रहिवासी असून अक्युब अहमद मलिक हा पुलवामाचा स्थानिक रहिवासी आहे. 

दरम्यान, या अगोदरही पुलवामा दहशतवादी हल्ल्याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी सात जणांना ताब्यात घेतलं आहे. हे सर्व युवक पुलवामा आणि अवंतीपुरा जिल्ह्यांतील असून, त्यांच्यावर पुलवाम्यातील दहशतवादी हल्ल्याला मदत केल्याचा संशय आहे. दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदनं काश्मीरमध्ये गुरुवारी (14 फेब्रुवारी) हल्ला घडवून आणला. या हल्ल्यात भारत मातेचे 40 जवान शहीद झालेत. केंद्रीय राखीव दलाचे जवान दहशतवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झाले.     

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाJammu Kashmirजम्मू-काश्मीरJaish e Mohammadजैश-ए-मोहम्मदTerror Attackदहशतवादी हल्ला