शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

Pulwama Attack : मोठी बातमी ... अखेर त्या दोन तरुणांची कबुली, 'जैश ए मोहम्मद'च्या होते संपर्कात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2019 15:51 IST

Pulwama Attack : व्हॅलेंटाईन डे दिवशी 14 फेब्रुवारीला काश्मीरच्या पुलवामा येथे दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या जवानांची कार स्फोटकाने उडवली.

लखनौ -  पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली. तर सीमेवरही लष्कराकडून मोठी कारवाई करत दहशतवाद्यांना लक्ष्य करण्यात आलं. त्यानंतर,  उत्तर प्रदेश दहशतवादी विरोधी पथकाने दोन काश्मिरी तरुणांनी अटक केली होती. या दोन्ही तरुणांनी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी आपला संबंध असल्याची कुबली दिली आहे. एटीएसने शहारनपूर येथील देऊबंद शहरातून या दोघांना अटक केली होती. या तरुणांनी पुलवामा हल्ल्यांसदर्भात माहिती दिली असून अद्याप खोलवर तपास सुरू आहे 

व्हॅलेंटाईन डे दिवशी 14 फेब्रुवारीला काश्मीरच्या पुलवामा येथे दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या जवानांची कार स्फोटकाने उडवली. या भ्याड हल्ल्यात देशातील 39 जवान शहीद झाले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशीही दहशतवाद्यांच्या चकमकीत आणखी 3 जवानांना वीरमरण प्राप्त झाले. या घटनेने देश हळलला असून तीव्र शब्दात अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही या हल्ल्याचा जशास तशा रितीने उत्तर दिले जाईल, असे म्हणत पाकिस्तानला ठणकावले होते. तर, हल्ल्यानंतर पाच दिवसांनी सुरक्षा जवानांनी या हल्ल्यातील म्होरक्या अब्दुल रशीद गाझीला ठार केले. मात्र, या हल्ल्यासंदर्भात सुगावे आणि धागे दोरे शोधण्याचा तपास सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश दहशतवादी विरोधी पथकाकडून दोन काश्मिरी तरुणांना अटक करण्यात आली होती. शाहनवाज आणि अब्दुल मलिक अशी या अटक करण्यात आलेल्या तरुणांची नावे आहेत. 

उत्तर प्रदेशचे पोलीस महासंचालक ओ पी सिंह यांनी दोन्ही आरोपी तरुणांची चौकशी केली असता, आपले जैश-ए-मोहम्मदशी संबंध असल्याचं त्यांनी कबूल केलं. ओ पी सिंह यांनी तब्बल चार तास या तरुणांची चौकशी केली. त्यानंतर जम्मू काश्मीर पोलीस महासंचालक दिलबाग सिंह यांना ही माहिती देण्यात आली. या माहितीच्या आधारे भविष्यातील कट कारस्थानासंदर्भातील अजून काही गोष्टी हाती लागण्याची शक्यता आहे, असं ओ पी सिंह यांनी सांगितलं आहे. देवबंद येथून या दोन संशयित तरुणांना अटक केल्यानंतर लखनौ एटीएस न्यायलयाने या दोघांनाही 10 दिवसांच्या पोलीस कोठडीत पाठवले होते. या चौकशीदरम्यान, पोलिसांना ही माहिती मिळाली आहे. यातील शानवाज अहमद तेली हा जम्मू आणि काश्मीरच्या कुलमागचा रहिवासी असून अक्युब अहमद मलिक हा पुलवामाचा स्थानिक रहिवासी आहे. 

दरम्यान, या अगोदरही पुलवामा दहशतवादी हल्ल्याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी सात जणांना ताब्यात घेतलं आहे. हे सर्व युवक पुलवामा आणि अवंतीपुरा जिल्ह्यांतील असून, त्यांच्यावर पुलवाम्यातील दहशतवादी हल्ल्याला मदत केल्याचा संशय आहे. दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदनं काश्मीरमध्ये गुरुवारी (14 फेब्रुवारी) हल्ला घडवून आणला. या हल्ल्यात भारत मातेचे 40 जवान शहीद झालेत. केंद्रीय राखीव दलाचे जवान दहशतवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झाले.     

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाJammu Kashmirजम्मू-काश्मीरJaish e Mohammadजैश-ए-मोहम्मदTerror Attackदहशतवादी हल्ला