शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

म्हणे, भारतानेच दहशतवाद पोसला, आमच्यावर युद्धही लादलं; पाकिस्तानी लष्कराचा कांगावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2019 16:34 IST

पुलवामातील हल्ल्यात आमचा हात नाही; पाकिस्तानी लष्करानं हात झटकले

नवी दिल्ली: पुलवामातील दहशतवादी हल्ल्यावरुन आमच्यावर बेछूट आरोप केले जात आहेत. या हल्ल्याशी आमचा कोणताही संबंध नाही, असा दावा करत पाकिस्तानी लष्करानं हात झटकले आहेत. भारतानंच दहशतवाद पोसला. पाकिस्तानवर युद्ध लादलं. भारतात निवडणुका असतात, त्याचवेळी दहशतवादी हल्ले होतात. पाकिस्तानात महत्त्वाचे कार्यक्रम सुरू असतात, त्यावेळी भारताकडून दबाव आणला जातो, अशा उलट्या बोंबादेखील पाकिस्तानी लष्करानं मारल्या. पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी लष्कराचे मेजर जनरल आसिफ गफूर यांनी आज पत्रकार परिषद घेतली. पुलवामातील दहशतवादी हल्ल्यावरुन भारतानं आमच्यावर बेछूट आरोप केले. कोणत्याही पुराव्यांशिवाय आरोप केले गेले. त्या आरोपांची चौकशी आमच्याकडून पूर्ण करण्यात आली. त्यामुळेच आम्हाला उत्तर देण्यास उशीर झाला, असं स्पष्टीकरण पाकिस्तानी लष्करानं दिलं. पुलवामा हल्ल्यासाठी भारतच जबाबदार असल्याचा जावईशोध पाकिस्ताननं लावला. 'पुलवामातील ज्या ठिकाणी सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला झाला, ते ठिकाण नियंत्रण रेषेपासून खूप दूर आहे. त्यामुळे पाकिस्तानातील एखादी व्यक्ती तिथंपर्यंत पोहोचणं शक्य नाही. त्यामुळे या हल्ल्याला पाकिस्तान जबाबदार कसा?', असा प्रश्न पाकिस्तानी लष्करानं उपस्थित केला. पुलवामातील हल्ल्यासाठी पाकिस्तानी लष्करानं अप्रत्यक्षपणे भारतीय सैन्यालाच जबाबदार धरलं. 'काश्मीरमध्ये जवानांचा कडक पहारा असतो. त्या भागात सर्वसामान्य जनतेपेक्षा लष्कराच्या जवानांची संख्या जास्त आहे. सत्तर वर्षांपासून भारतीय सैन्य तिथे आहे. तिथे जर पाकिस्तानी व्यक्ती पोहोचली असा भारताचा दावा असेल, तर मग सुरक्षेत काहीतरी चूक झाली असेल,' असं म्हणत गफूर यांनी भारतीय सुरक्षा दलाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभं करण्याचा प्रयत्न केला. 'पुलवामा हल्ला ज्यानं घडवला, तो तरुण काश्मीरचाच रहिवासी आहे. त्याला भारतीय सैन्यानं वाईट वागणूक दिली होती, अशा बातम्या सोशल मीडियावर आल्या आहेत. सैन्यानं दिलेल्या वर्तणुकीचा राग मनात धरुन त्यानं हा हल्ला केला असावा,' असा दावा पाकिस्तानी लष्करानं केला. भारताकडून दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन दिलं जात असल्याचा आरोपदेखील पाकिस्तानी लष्कराकडून करण्यात आला. 'भारतात ज्यावेळी निवडणुका येतात, त्यावेळी दहशतवादी हल्ले होतात. पाकिस्तानात महत्त्वाचे कार्यक्रम सुरू असतात, नेमका त्याचवेळी भारताकडून दबाव आणला जातो. ज्यावेळी संवाद सुरू असतो, संबंध सुधारण्याची प्रक्रिया सुरू असते, त्याचवेळी भारतात दहशतवादी कारवाया होतात,' असं अजब तर्कट पाकिस्तानी लष्करानं मांडलं. '2001 मध्ये भारताच्या संसदेवर हल्ला झाला. त्याच्या पुढच्या वर्षी पाकिस्तानात सार्वत्रिक निवडणुका होत्या. 2008 मध्ये मुंबईवर हल्ला झाला. 2009 मध्ये भारतात निवडणूक होती. आता भारतात लोकसभेची निवडणूक होऊ घातली आहे. नेमक्या त्याचवेळी पुलवामात हल्ला झाला,' असं म्हणत पाकिस्तानी लष्करानं भारतालाच दहशतवादी हल्ल्यांसाठी जबाबदार धरलं.

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाPakistanपाकिस्तानIndian Armyभारतीय जवानElectionनिवडणूकJammu Kashmirजम्मू-काश्मीरTerror Attackदहशतवादी हल्ला