शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदींना जिरेटोप घातल्याने वादंग; टीकेनंतर प्रफुल्ल पटेलांनी शिवप्रेमींना दिला 'हा' शब्द
2
निवडणूक प्रचारात कांद्यासाठी आंदोलनाची घोषणा; पण लंकेंनी आता शेतकऱ्यांना केलं नवं आवाहन!
3
"आमच्या घरी ईद साजरी केली जायची"; पंतप्रधान मोदींनी सांगितला मुस्लिम शेजाऱ्यांचा किस्सा
4
12वी पास कंगनाकडे कोट्यवधींचे हीरे, एकाच दिवसात खरेदी केल्या LIC च्या 50 पॉलिसी, जाणून घ्या किती आहे संपत्ती?
5
मराठमोळ्या अभिनेत्रीला झालाय गंभीर आजार, व्हिडिओ शेअर करत म्हणाली, 'मी प्रेग्नंट नाही...'
6
गंभीर हसल्याशिवाय क्रशला प्रपोज करणार नाही; तरूणीच्या पोस्टरला भारतीय दिग्गजाचं उत्तर
7
PM Modi Net Worth: कोणत्या बँकेत आहे PM नरेंद्र मोदींचं खातं, कुठे आहे गुंतवणूक? पाहा डिटेल्स
8
सत्तापिपासून भाजपा मृतदेहांवरून रॅली काढतंय का? मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून काँग्रेसचा जळजळीत सवाल
9
'लोकांचा जीव जातोय आणि हिला डान्स सुचतोय'; पाऊस पडल्यानंतर रील केल्यामुळे मन्नारा चोप्रा ट्रोल
10
'नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा नक्कीच पंतप्रधान होतील, आम्हालाही त्यांच्यासारख्या नेत्याची गरज; पाकिस्तानी अब्जाधीशांनी केले कौतुक
11
Kangana Ranaut : "तुम्ही मला एकदा मारलंत तर अनेक वेळा..."; कंगना राणौतचं विक्रमादित्य सिंहांवर टीकास्त्र
12
'अनिल कपूरसारखा पती नको' असं का म्हणाली होती माधुरी दीक्षित? इंटरेस्टिंग आहे यामागचं कारण
13
IPL Playoffsच्या २ जागांसाठी ५ संघ शर्यतीत; SRH ला ८७.३%, CSK ला ७२.७% टक्के चान्स, तर RCBला...
14
राज ठाकरेंच्या पाठिंब्यानं महायुतीला बळ; भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे 'शिवतीर्थ'वर
15
Video - ना स्ट्रेचर, ना कोणाची मदत; आजारी वडिलांना उचलून घेऊन रुग्णालयात फिरत राहिला लेक
16
सूर्यावर भीषण स्फोट; ISROच्या आदित्य L-1 आणि चांद्रयान-2 च्या कॅमेऱ्यात कैद
17
IPL मुळे भारताच्या वाट्याला T20 WC पूर्वी १ सराव सामना; दोन बॅचमध्ये संघ अमेरिकेला जाणार
18
सांगलीच्या निर्णयात घाई केली; भाजपा प्रवेशाबाबत विश्वजित कदमांचं मोठं विधान
19
SBI'ने ग्राहकांना दिली भेट! एफडीवरील व्याजदरात केली मोठी वाढ, पाहा नवे दर
20
Corona Virus : चिंताजनक! भारतात आला कोरोनाचा नवा व्हेरिएंट; 'ही' आहेत लक्षणं, लोकांसाठी किती धोकादायक?

Pulwama Attack : 'नको आरक्षण, नको मंदिर, नको तुमचे १५ लाख, मोदीजी फक्त 40 च्या बदल्यात 400 हवेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2019 5:27 AM

दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सीआरपीएफचे ४९ जवान शहीद झाले आणि अवघा देश सुन्न झाला. याच अनुषंगाने ‘कसा करावा दहशतवादाचा बीमोड’ या विषयावर ‘लोकमत’ने वाचकांकडून प्रतिक्रिया मागविल्या होत्या.

दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सीआरपीएफचे ४९ जवान शहीद झाले आणि अवघा देश सुन्न झाला. याच अनुषंगाने ‘कसा करावा दहशतवादाचा बीमोड’ या विषयावर ‘लोकमत’ने वाचकांकडून प्रतिक्रिया मागविल्या होत्या. अवघ्या दोन दिवसांत पत्रांचा अक्षरक्ष: पाऊस पडला. यावरूनच देशवासीयांच्या तीव्र भावनांची कल्पना येते. या अमानवी हल्ल्याबाबत दु:ख व्यक्त करतानाच लोकांनी आपल्या मनातील संतापाला वाट मोकळी करून दिली आहे. अनेक जणांनी पाकिस्तानचा बदला घ्या, दहशतवाद्यांना ठेचून काढा, असे म्हटले आहे. तर आंतरराष्ट्रीय स्तरावर आर्थिक कोंडी करून पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा उघडा पाडावा, असे काहींना वाटते. महत्त्वाचे म्हणजे, शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी ठाम उभे असल्याची ग्वाही देताना, तेथे कर माझे जुळती... ही भावना सर्वांचीच आहे! 

राष्ट्रीय आपत्ती जाहीर कराया हल्ल्याला केंद्र सरकारने राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषित करावे. तसेच सात दिवसांचा दुखवटा जाहीर करावा. त्यामुळे शहीद जवान व त्यांच्या कुटुंबीयांप्रती सन्मान व देशातील एकता यातून दिसून येईल. युद्धासाठी सर्वांनी तयार रहायला हवे. बाह्य आणीबाणी घोषित करावी. हल्ला हाच संरक्षणाचा सर्वात मोठा मार्ग आहे.- राम कोरके, सेवानिवृत्त नायक, तोफखाना रेजिमेंटमर्यादित युद्धाचा विचार करावाभारताने पाकिस्तानसोबत मर्यादित युद्धाचा विचार करावा. पाकिस्तानमध्ये जाणाऱ्या अनेक नद्यांचे पाणी अडवून गोची करावी. बलुचिस्तान हा प्रांत पाकिस्तानपासून स्वतंत्र होण्यासाठी आज धडपड करत आहे. भारताने बलुच नेत्यांना शक्य ती सर्व मदत करावी. काश्मीरमधील अनेक भारतीय राजकारणी पाकिस्तानधार्जिणे धोरण राबवताना दिसतात. त्यांच्या नांग्या ठेचाव्यात.- आशिष पाटील, संभाजीनगर, कोल्हापूर.धमाका कराशहीद भगत सिंग यांनी ब्रिटिश काळात जसे असेम्बलीमध्ये बॉम्ब फेकला आणि त्यावर प्रतिक्रिया देताना म्हटले की ‘बहरो को सुनाने के लिये धमाको की जरूरत होती है’ अगदी त्या प्रमाणे भारत सरकारलासुद्धा असेच काही पाऊल उचलावे लागणार आहे. त्याशिवाय दहशतवादी आणि पाकिस्तान यांचे कंबरडे मोडणार नाही. अमेरिकेने पाकिस्तानात घुसून ओसामा बिन लादेनला संपवला. भारतानेसुद्धा तसेच भीषण सर्जिकल स्ट्राइक करून संपूर्ण दहशतवाद संपवावा.- वैभव आसरकर, अकोट, जि. अकोलाघरभेद्यांचा बंदोबस्त कराकाश्मीरचा विशेष दर्जा काढावा, माजी सैनिक व इतर राज्यातील इच्छुक नागरिकांना काश्मिरमध्ये रहाण्याची परवानगी द्यावी. सच्च्या भारतीयांची संख्या वाढल्यास पाकिस्तानी धार्जिणे लोकांवर आपोआपच वचक बसेल. सैनिकी कारवायांमध्ये अडचणी निर्माण करणे, दहशतवाद्यांना मदत करणे, अशा कामे करणाºया घरभेद्यांचा कायमचा बंदोबस्त करावा.- दिलीपकुमार खिस्ते,कामोठे, ता. पनवेल जि. रायगडजशास तसेच उत्तर हवेजशास-तसे उक्ती प्रमाणे आता खुले-आम सामना केला तरच दहशतवाद्यांवर जरब बसेल. कआज आपले राष्ट्र दहशतवाद्यांसाठी प्रयोगशाळा झाली आहे, दहशतवादाचे वेग-वेगळे प्रयोग खुले-आम होत आहेत अशावेळी आपण स्वत: खंबीर असतांना वाट का बघतो? कुठलाही राजकीय हेतू अथवा मनसुबा न बाळगता दहशतवादी अड्डे असलेल्या देशांना संघटीतपणे धडा शिकवणे योग्य ठरेल.- प्रमोद सुभाषराव डांगे (कुलकर्णी) नक्षत्रवाडी, औरंगाबाद.दहशतवाद संपवाभारतीय सैन्यदलावर झालेला भ्याड हल्ला हा भारतातील प्रत्येक जाती-धर्मातील लोकांवर झालेला हल्ला आहे. ना हिंदु - ना मुस्लीम, ना सिख - ना इसाई, आम्ही फक्त आणि फक्त भारतीय आहोत. सर्जिकल स्ट्राईकनंतर परत हा हल्ला झाल्याने पाकिस्तानने पुन्हा एकदा डोके वर काढल्याच दिसते. म्हणूनच त्यांना आता कायमचे संपवण्याची गरज भारतातील प्रत्येक नागरिकास वाटते आहे.- प्रशांत माळी, मु.पो. मापटेमळाता. आटपाडी, जि. सांगलीपाकची कोंडी करापुलवामातील दहशतवाद्यांच्या अमानवीय, क्रूर हल्याचा मी निषेध करतो तसेच शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करतो. केवळ सर्जिकल स्ट्राईक करुन भागणार नाही. आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानची सर्व पातळ्यांवर कोंडी करुन जगापुढे त्यांना उघडे पाडावे लागेल.- साजेद खान, औरंगाबादराष्ट्रीय कायदा बनवादहशतवादाला कायदा आणि सुरक्षेच्या प्रश्नावरच केंद्रीय गुन्हा (फेडरल क्राइम) मानले गेले पाहिजे आणि हा गुन्हा रोखण्यासाठी अमेरिकेतील ‘होमलँड सेक्युरिटी अ‍ॅक्ट’च्या धर्तीवर भारतात एक सर्वसमावेशक राष्ट्रीय कायदा बनवायला हवा.- लालन शर्मा, 9673902887एक महिन्याचा पगार देतोपुलवामामध्ये झालेल्या हल्याचा मी निषेध करतो. मी एक सरकारी कर्मचारी आहे, आणि अस काही ऐकल की तळपायाची आग मस्तकात जाते. दहशतवाद्यांचा बीमोड करण्यासाठी मी माझी एक महिन्याचा पगार द्यायला तयार आहे. देशाचे पंतप्रधान एक धाडसी निर्णय घेतील आणि त्यांना सडेतोड उत्तर देतील अशी मला अपेक्षा आहे.- उदेश पवार, (वाहतूक नियंत्रण) नवी मुंबई महानगर पालिकाना मंदिर, ना आरक्षण चाहिये, ना १५ लाख चाहीये, बस मोदीजी अब ४० के बदले ४०० चाहिये.- अरविंद जाधव, खडका, घनसावंगी, जि.जालना

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाLokmatलोकमतMartyrशहीद