शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

पुलवामातील दहशतवादी हल्ल्याला सुरक्षेतील त्रुटी जबाबदार- माजी रॉ प्रमुख

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2019 21:57 IST

चीन आणि पाकिस्तान यांच्या संबंधांचं विक्रम सूद यांच्याकडून विश्लेषण

हैदराबाद: काश्मीरच्या पुलवामात झालेला दहशतवादी हल्ल्यामागे एक व्यक्ती नव्हे, तर एक संघटना असल्याचं रॉचे माजी प्रमुख विक्रम सूद यांनी म्हटलं आहे. सुरक्षेतील त्रुटीदेखील या हल्ल्याला जबाबदार असल्याचंदेखील सूद म्हणाले. सूद यांनी हैदराबादमध्ये एका कार्यक्रमानंतर माध्यमांशी संवाद साधला. सुरक्षेत हलगर्जीपणा असल्याशिवाय अशा प्रकारचा हल्ला होऊ शकत नाही, असं मत त्यांनी व्यक्त केलं.हल्लेखोरांना सीआरपीएफ जवानांचा ताफा जाणार असल्याची संपूर्ण माहिती होती. त्यामुळे यामागे एक नव्हे, तर बऱ्याच व्यक्ती आहेत, असं सूद यांनी म्हटलं. भारतानं या हल्ल्याचा बदला घ्यावा, असा प्रश्न त्यांना यावेळी विचारण्यात आला. त्यावर हा काही बॉक्सिंगचा सामना नाही. त्यामुळे एकानं ठोसा मारल्यावर दुसऱ्यानं तिच कृती करायला नको, असं उत्तर त्यांनी दिलं. 'या हल्ल्याचा बदला कधी, कुठे आणि कसा घ्यायचा ते सैन्य ठरवेल, असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. चीननं खोडा घातल्यामुळे जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मौलाना मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यात संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेला अडचणी येत आहेत. पाकिस्तानच्या सांगण्यावरुनच चीन या कुरापती करत आहे,' असंदेखील सूद म्हणाले.  जेव्हा जेव्हा मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याची वेळ येते, त्यावेळी फक्त चीन पाकिस्तानच्या बाजूनं उभा राहतो. शिनजियांग प्रांतातल्या इस्लामिक संघटना पाकिस्तानातल्या दहशतवाद्यांशी संपर्क करतील, असं चीनला वाटत असल्यानं त्यांच्याकडून खोडा घातला जातो, असं विश्लेषण 31 वर्षे गुप्तचर विभागात काम केलेल्या सूद यांनी केलं. चीन आणि पाकिस्तान परस्परांचे हितसंबंध जपतात. चीन पाकिस्तानच्या दहशतवाद्यांच्या बाजूनं उभा राहतो. तर आपल्या देशातलं दहशतवादी चीनसाठी डोकेदुखी ठरू नयते, याची काळजी पाकिस्तानकडून घेतली जाते, असं सूद म्हणाले.  

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाJammu Kashmirजम्मू-काश्मीरTerror Attackदहशतवादी हल्लाJaish e Mohammadजैश ए मोहम्मदchinaचीनPakistanपाकिस्तानterroristदहशतवादी