शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

Pulwama Aattack: 'ज्या हल्ल्यातून आपली असमर्थतता दिसली; त्याचं स्मारक कशासाठी?'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2020 13:25 IST

माकप नेते मोहम्मद सलिम यांच्या विधानानं वाद

नवी दिल्ली: पुलवाम्यातील दहशतवादी हल्ल्याला वर्ष पूर्ण होत असताना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते मोहम्मद सलिम यांनी केलेल्या विधानामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. केंद्रीय राखीव सुरक्षा दलाच्या ४० जवानांचं स्मारक उभारण्याची गरज नाही. त्यामुळे केवळ आपल्या असमर्थतेची आठवण होईल. कारण आपण तो हल्ला रोखण्यात अपयशी ठरलो होतो, असं वक्तव्य सलिम यांनी केलं आहे. पुलवाम्यात गेल्या १४ फेब्रुवारीला सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यात ४० जवान शहीद झाले होते. 'आपली असमर्थतता दाखवणारं स्मारक उभारण्याची गरज नाही. आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून ८० किलो आरडीएक्स भारतात कसं आणलं गेलं? जगातल्या इतर कोणत्याही भागाच्या तुलनेत सर्वाधिक जवान तैनात असलेल्या भागात आरडीएक्सचा स्फोट कसा काय झाला?, या प्रश्नांची उत्तरं मिळायला हवीत,' असं सलीम यांनी म्हटलं आहे.पुलवामात वर्षभरापूर्वी झालेल्या हल्ल्यात हौतात्म्य पत्करलेल्या जवानांच्या कुटुंबाबद्दल, त्यांच्या मित्र परिवाराबद्दल मला पूर्ण सहानुभूती असल्याचं सलिम म्हणाले. पुलवामातला हल्ला रोखण्यात आपण अपयशी ठरलो. त्याबद्दल प्रश्न विचारण्याची आवश्यकता असल्याचं त्यांनी न्यूज१८ला सांगितलं. भविष्यात अशा प्रकारचे हल्ले होऊ नयेत, यासाठी प्रश्न विचारायला हवेत, असंदेखील त्यांनी पुढे म्हटलं. 'आम्ही आपल्या जवानांचं रक्षण करू शकलो नाही. वरिष्ठांना त्यांची चिंता नाही. सीमेपलीकडून आरडीएक्स आलं. याची केंद्र सरकारनं चौकशी करायला हवी होती,' असं सलिम यांनी म्हटलं. दिवसभरातल्या महत्त्वाच्या बातम्या-पुलवामा हल्ल्याचा सर्वाधिक फायदा कोणाला झाला?; राहुल गांधींचा सवालPulwama Attack : गर्व इतना था कि हम देर तक रोये नही... Pulwama च्या शहिदांना दिलेलं 'ते' वचन जवानांनी पूर्ण केलं!आघाडीत बिघाडी? शरद पवार म्हणतात, मुख्यमंत्र्यांच्या 'तो' निर्णय अतिशय अयोग्य

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्ला