शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
4
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
5
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
6
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
7
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
8
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
9
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
10
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
11
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
12
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
13
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
14
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
15
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
16
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
17
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
18
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
19
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
20
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे

Pulwama Aattack: 'ज्या हल्ल्यातून आपली असमर्थतता दिसली; त्याचं स्मारक कशासाठी?'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2020 13:25 IST

माकप नेते मोहम्मद सलिम यांच्या विधानानं वाद

नवी दिल्ली: पुलवाम्यातील दहशतवादी हल्ल्याला वर्ष पूर्ण होत असताना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते मोहम्मद सलिम यांनी केलेल्या विधानामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. केंद्रीय राखीव सुरक्षा दलाच्या ४० जवानांचं स्मारक उभारण्याची गरज नाही. त्यामुळे केवळ आपल्या असमर्थतेची आठवण होईल. कारण आपण तो हल्ला रोखण्यात अपयशी ठरलो होतो, असं वक्तव्य सलिम यांनी केलं आहे. पुलवाम्यात गेल्या १४ फेब्रुवारीला सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यात ४० जवान शहीद झाले होते. 'आपली असमर्थतता दाखवणारं स्मारक उभारण्याची गरज नाही. आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून ८० किलो आरडीएक्स भारतात कसं आणलं गेलं? जगातल्या इतर कोणत्याही भागाच्या तुलनेत सर्वाधिक जवान तैनात असलेल्या भागात आरडीएक्सचा स्फोट कसा काय झाला?, या प्रश्नांची उत्तरं मिळायला हवीत,' असं सलीम यांनी म्हटलं आहे.पुलवामात वर्षभरापूर्वी झालेल्या हल्ल्यात हौतात्म्य पत्करलेल्या जवानांच्या कुटुंबाबद्दल, त्यांच्या मित्र परिवाराबद्दल मला पूर्ण सहानुभूती असल्याचं सलिम म्हणाले. पुलवामातला हल्ला रोखण्यात आपण अपयशी ठरलो. त्याबद्दल प्रश्न विचारण्याची आवश्यकता असल्याचं त्यांनी न्यूज१८ला सांगितलं. भविष्यात अशा प्रकारचे हल्ले होऊ नयेत, यासाठी प्रश्न विचारायला हवेत, असंदेखील त्यांनी पुढे म्हटलं. 'आम्ही आपल्या जवानांचं रक्षण करू शकलो नाही. वरिष्ठांना त्यांची चिंता नाही. सीमेपलीकडून आरडीएक्स आलं. याची केंद्र सरकारनं चौकशी करायला हवी होती,' असं सलिम यांनी म्हटलं. दिवसभरातल्या महत्त्वाच्या बातम्या-पुलवामा हल्ल्याचा सर्वाधिक फायदा कोणाला झाला?; राहुल गांधींचा सवालPulwama Attack : गर्व इतना था कि हम देर तक रोये नही... Pulwama च्या शहिदांना दिलेलं 'ते' वचन जवानांनी पूर्ण केलं!आघाडीत बिघाडी? शरद पवार म्हणतात, मुख्यमंत्र्यांच्या 'तो' निर्णय अतिशय अयोग्य

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्ला