शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

गेल्या वर्षभरात बँकांमध्ये 30 हजार कोटींचे घोटाळे- आरबीआय

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 18:31 IST

सरकारी बँकांमध्ये सर्वाधिक घोटाळे

मुंबई: गेल्या वर्षभरात देशभरातील बँकांमध्ये तब्बल 30 हजार कोटी रुपयांचे घोटाळे झाले असल्याची आकडेवारी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं प्रसिद्ध केली आहे. 2017-18 या आर्थिक वर्षात देशभरातील बँकांमध्ये साडे सहा हजार घोटाळे झाले आहेत. यातील 85 टक्के घोटाळे सरकारी बँकांमध्ये झाल्याची माहिती आरबीआयनं दिली आहे. आरबीआयनं फायनान्शियल स्टॅबिलिटी रिपोर्ट (एफएसआर) प्रसिद्ध केला आहे. '2017-18 या आर्थिक वर्षात बँकिंग व्यवस्थेतील 6 हजार 500 घोटाळे समोर आले. या घोटाळ्यांचं मूल्य 30 हजार कोटी रुपये इतकं होतं', अशी आकडेवारी या अहवालात आहे. 'गेल्या काही वर्षांमध्ये बँकिंग व्यवस्थेत 1 लाखांपेक्षा अधिक रकमेच्या घोटाळ्यांचं प्रमाण वाढलं आहे. बँकिंग व्यवस्थेतील घोटाळ्यांची संख्याच वाढली नसून घोटाळ्याचं मूल्यदेखील प्रचंड प्रमाणात वाढलं आहे,' असं आरबीआयनं अहवालात नमूद केलं आहे. सरकारी बँकांमधील घोटाळ्यांचं प्रमाण सर्वाधिक असल्याचं आरबीआयचा अहवाल सांगतो. एकूण घोटाळ्यांपैकी 85 टक्के घोटाळे सरकारी बँकांमध्ये झाले आहेत. 2018 मध्ये झालेल्या सर्वाधिक 10 घोटाळे पाहिल्यास, केवळ या 10 घोटाळ्यांमुळे बँकांना तब्बल 10 हजार कोटींचा चुना लावण्यात आला आहे. फसवणूक करुन घेतल्या जाणाऱ्या कर्जातून सर्वाधिक घोटाळे होतात, असं अहवालात अधोरेखित करण्यात आलं आहे.  

टॅग्स :Reserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँकfraudधोकेबाजीPunjab National Bank Scamपंजाब नॅशनल बँक घोटाळाNirav Modiनीरव मोदी