शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

आमच्याकडून 'चौकीदार' होण्याची अपेक्षा ठेवू नका; 3.20 लाख बँक अधिकाऱ्यांचं मोदींना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2019 07:48 IST

सरकारी बँकांमधील अधिकाऱ्यांचं पंतप्रधान मोदींना पत्र 

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नुकतंच ट्विटरवरुन डॉक्टर, वकील, अभियंते, शिक्षक, बँक आणि आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना 'मैं भी चौकीदार' मोहिमेत सहभागी होण्याचं आवाहन केलं होतं. मात्र देशातील सरकारी बँक अधिकाऱ्यांची सर्वात मोठी संघटना असलेल्या 'द ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कॉन्फडरेशन'नं या संघटनेनं याबद्दल असमर्थतता दर्शवली आहे. यासाठी संघटनेनं थेट पंतप्रधान मोदींनाच पत्र लिहिलं आहे. आमचे महत्त्वाचे प्रश्न सोडवा. ते सुटेपर्यंत आमच्याकडून 'मैं भी चौकीदार' या राजकीय मोहिमेत सहभागी होण्याची अपेक्षा ठेवू नका, असा पवित्रा संघटनेनं घेतला आहे. 'बिझनेस स्टँडर्ड'नं या इंग्रजी दैनिकानं हे वृत्त दिलं आहे.'द ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कॉन्फडरेशन'नं (एआयबीओसी) पंतप्रधान मोदींना लिहिलेल्या पत्रात सरकारी बँकांमधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या समस्यांचा पाढा वाचला आहे. यामध्ये बँकांचं विलिनीकरण, कर्मचारी भरती यांच्यासह अनेक प्रश्नांचा समावेश आहे. या पत्राची प्रत आर्थिक सेवा विभाग आणि इंडियन बँक्स असोसिएशनलाही (आयबीए) पाठवण्यात आली आहे. एआयबीओसी सरकारी बँकांमधील कर्मचाऱ्यांची सर्वात मोठी संघटना आहे. जवळपास 3 लाख 20 हजार अधिकारी (एकूण अधिकाऱ्यांच्या 85 टक्के) या संघटनेचे सदस्य आहेत. 'सरकारी बँकांमध्ये काम करणाऱ्या लाखो कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या मूळ समस्यांकडे लक्ष न देता तुम्ही आमच्याकडून 'मैं भी चौकीदार' या राजकीय प्रचारमोहिमेत सहभागी होण्याची अपेक्षा करु नका. सरकारी बँक कर्मचारी सरकारच्या धोरणांमुळे त्रासलेले आहेत,' असं एआयबीओसींनं मोदींना लिहिलेल्या पत्रात नमूद केलं आहे. एआयबीओसीचा विजया बँक, देना बँक आणि बँक ऑफ बडोदाच्या विलिनीकरणाला विरोध आहे. याविरोधात संघटनेनं दिल्ली उच्च न्यायालयात याचिकाही दाखल केली आहे. बँकांमध्ये उच्च पदांवर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचं वेतन बँकांच्या कामगिरीवर आधारित असावं, यासाठी इंडियन बँक्स असोसिएशन प्रयत्नशील आहे. यालाही बँक कर्मचाऱ्यांचा विरोध आहे.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBanking Sectorबँकिंग क्षेत्रbankबँक