शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
3
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
4
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
6
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
7
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
8
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
9
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
10
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
11
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
12
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
13
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
14
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
15
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
16
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
17
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
18
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
19
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
20
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे

"वातावरण आपल्या बाजूने, भाजपने धडा घेतलेला नाही"; सोनिया गांधी यांचा महत्त्वाचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2024 12:52 IST

आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी सीपीपीच्या बैठकीत काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत.

Sonia Gandhi : लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीमध्ये काँग्रेस पक्षाला गेल्या निवडणुकीपेक्षा चांगले यश मिळाले आहे. लोकसभेत काँग्रेसच्या खासदारांची संख्या १०० आहे. त्यामुळे भाजपला केंद्रात तगडं आव्हान मिळालं आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे विरोधी पक्षनेतेपद आल्याने ते चांगलेच आक्रमक झाले आहेत. पावसाळी आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनात राहुल गांधी यांची आक्रमक भूमिक पाहायला मिळाली. आता माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी काँग्रे नेत्यांना महत्त्वाचा सल्ला दिला आहे. वातावरण आपल्या बाजूने आहे म्हणत सोनिया गांधी यांनी नेत्यांना महत्त्वाच्या सूचना केल्या.

महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. त्यामुळे आता काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी सक्रिय झाल्या आहेत. सोनिया गांधी यांनी आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी सीपीपीच्या बैठकीत पक्षाच्या नेत्यांना सूचना दिल्या आहेत. आपण आत्मसंतुष्ट आणि अतिआत्मविश्वासात राहू नये, वातावरण आपल्या अनुकूल आहे, आपल्याला एकजुटीने काम करावे लागेल, असं सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे.

"पब्लिक मूड  आपल्या पक्षाच्या बाजूने आहे. पण लोकसभा निवडणुकीत पक्षासाठी तयार केलेली गती आणि सद्भावना राखण्याची गरज आहे. आपण आत्मसंतुष्ट आणि अतिआत्मविश्वासाने वागू नये. मी असे म्हणण्याचे धाडस करते की जर आपण लोकसभा निवडणुकीत जशी कामगिरी केली तशीच कामगिरी केली तर राष्ट्रीय राजकारणात बदल घडून येतील," असे सोनिया गांधी म्हणाल्या. 

"लोकसभा निवडणुकीच्या निकालातून मोदी सरकार धडा घेईल असं वाटलं होतं. पण तरीही ते समाजात फूट पाडण्याच्या आणि  शत्रुत्वाचे वातावरण निर्माण करण्याच्या आपल्या धोरणावर ठाम आहे. आरएसएस स्वतःला सांस्कृतिक संघटना म्हणवते. पण संपूर्ण जगाला माहित आहे की ती भाजपचा राजकीय आणि वैचारिक आधार आहे," अशीही टीका सोनिया गांधी यांनी केली.

कावड यात्रेवरुन केलं भाष्य

कावड यात्रेच्या मार्गाबाबत उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड सरकारने दिलेल्या आदेशावर बंदी घातल्याबाबत सोनिया गांधी यांनी भाष्य केलं. "सुदैवाने सुप्रीम कोर्टाने योग्य वेळी हस्तक्षेप केला. पण हा केवळ तात्पुरता दिलासा ठरू शकतो. नोकरशाहीला आरएसएसच्या कार्यात सहभागी होण्यासाठी अचानक नियम कसे बदलले गेले ते पहा. त्यांनी स्वतःला एक सांस्कृतिक संघटना म्हणून घोषित केले आहे. पण हा भाजपचा राजकीय आणि वैचारिक आधार आहे हे साऱ्या जगाला माहीत आहे, असे सोनिया गांधींनी म्हटलं.

टॅग्स :congressकाँग्रेसSonia Gandhiसोनिया गांधीRahul Gandhiराहुल गांधीlok sabhaलोकसभाBJPभाजपा