शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
2
Air India Plane Crash in Ahmedabad : पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
3
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
4
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
5
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
6
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी
7
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
8
सर्वत्र मृतदेह, ओळख पटवणेही अशक्य; गुजरात सरकारकडून डीएनए सॅम्पल देण्याचं आवाहन
9
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
10
Ahmedabad Plane Crash : पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी
11
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
12
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला
13
'आम्हाला आत जाऊ द्या', रुग्णालयाबाहेर मृत आणि जखमींच्या नातेवाईकांचा आक्रोश
14
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
15
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
16
Air India Plane Crash: वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी केले होते MBA; विमान अपघातात भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
17
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
18
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
19
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
20
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...

"वातावरण आपल्या बाजूने, भाजपने धडा घेतलेला नाही"; सोनिया गांधी यांचा महत्त्वाचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2024 12:52 IST

आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी सीपीपीच्या बैठकीत काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत.

Sonia Gandhi : लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीमध्ये काँग्रेस पक्षाला गेल्या निवडणुकीपेक्षा चांगले यश मिळाले आहे. लोकसभेत काँग्रेसच्या खासदारांची संख्या १०० आहे. त्यामुळे भाजपला केंद्रात तगडं आव्हान मिळालं आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे विरोधी पक्षनेतेपद आल्याने ते चांगलेच आक्रमक झाले आहेत. पावसाळी आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनात राहुल गांधी यांची आक्रमक भूमिक पाहायला मिळाली. आता माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी काँग्रे नेत्यांना महत्त्वाचा सल्ला दिला आहे. वातावरण आपल्या बाजूने आहे म्हणत सोनिया गांधी यांनी नेत्यांना महत्त्वाच्या सूचना केल्या.

महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. त्यामुळे आता काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी सक्रिय झाल्या आहेत. सोनिया गांधी यांनी आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी सीपीपीच्या बैठकीत पक्षाच्या नेत्यांना सूचना दिल्या आहेत. आपण आत्मसंतुष्ट आणि अतिआत्मविश्वासात राहू नये, वातावरण आपल्या अनुकूल आहे, आपल्याला एकजुटीने काम करावे लागेल, असं सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे.

"पब्लिक मूड  आपल्या पक्षाच्या बाजूने आहे. पण लोकसभा निवडणुकीत पक्षासाठी तयार केलेली गती आणि सद्भावना राखण्याची गरज आहे. आपण आत्मसंतुष्ट आणि अतिआत्मविश्वासाने वागू नये. मी असे म्हणण्याचे धाडस करते की जर आपण लोकसभा निवडणुकीत जशी कामगिरी केली तशीच कामगिरी केली तर राष्ट्रीय राजकारणात बदल घडून येतील," असे सोनिया गांधी म्हणाल्या. 

"लोकसभा निवडणुकीच्या निकालातून मोदी सरकार धडा घेईल असं वाटलं होतं. पण तरीही ते समाजात फूट पाडण्याच्या आणि  शत्रुत्वाचे वातावरण निर्माण करण्याच्या आपल्या धोरणावर ठाम आहे. आरएसएस स्वतःला सांस्कृतिक संघटना म्हणवते. पण संपूर्ण जगाला माहित आहे की ती भाजपचा राजकीय आणि वैचारिक आधार आहे," अशीही टीका सोनिया गांधी यांनी केली.

कावड यात्रेवरुन केलं भाष्य

कावड यात्रेच्या मार्गाबाबत उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड सरकारने दिलेल्या आदेशावर बंदी घातल्याबाबत सोनिया गांधी यांनी भाष्य केलं. "सुदैवाने सुप्रीम कोर्टाने योग्य वेळी हस्तक्षेप केला. पण हा केवळ तात्पुरता दिलासा ठरू शकतो. नोकरशाहीला आरएसएसच्या कार्यात सहभागी होण्यासाठी अचानक नियम कसे बदलले गेले ते पहा. त्यांनी स्वतःला एक सांस्कृतिक संघटना म्हणून घोषित केले आहे. पण हा भाजपचा राजकीय आणि वैचारिक आधार आहे हे साऱ्या जगाला माहीत आहे, असे सोनिया गांधींनी म्हटलं.

टॅग्स :congressकाँग्रेसSonia Gandhiसोनिया गांधीRahul Gandhiराहुल गांधीlok sabhaलोकसभाBJPभाजपा