शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
2
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
3
'जरांगे, थोतांड करू नका! आरोपी यांचेच, आरोपही हेच करणार'; हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपावर धनंजय मुंडेंचा संताप
4
"मते चोरून सत्तेत आलेल्यांनीच जमीन चोरली, कारण त्यांना..."; राहुल गांधींचा पार्थ पवार भूखंड खरेदी प्रकरणावरून घणाघात
5
हात मिळवता मिळवता एकमेकांचे पाय खेचू लागले चीन-अमेरिका; China च्या एका निर्णयानं ट्रम्प यांचा तिळपापड
6
Dental Care: टार्टर आणि प्लाक दातांचे मुख्य शत्रू, करू शकतात गंभीर नुकसान; वेळीच घ्या 'ही' काळजी 
7
केक कापला, डीजे लावला आणि..., शेतकऱ्याने दणक्यात साजरा केला रेड्याचा वाढदिवस
8
१० लोकांना संपवलं, २७ जणांना मारण्याच्या तयारीत; नर्स रुग्णांच्या जीवावर का उठली? कारण ऐकाल तर..
9
माझी अन् त्यांची एकदा नार्को टेस्ट करा; जरांगे पाटलांच्या आरोपांवर धनंजय मुंडेंचे प्रत्युत्तर
10
चिकन नेकजवळ भारतीय लष्करानं केलं असं काम, शत्रूची प्रत्येक चाल होणार फेल
11
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदी करण्यापूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे लेटेस्ट रेट
12
मी काका झालो! कौशल कुटुंबात आला छोटा पाहुणा; विकीचा भाऊ सनीने व्यक्त केला आनंद
13
IPS Aakash Shrishrimal : एक नंबर! वडील उद्योगपती, आई LIC एजंट, बहीण CA... अभिनेत्रीचा पती आहे IPS ऑफिसर
14
Crime: चाकूचा धाक दाखवून परप्रांतीय कामगाराला मारहाण; पाय चाटण्यास भाग पाडले!
15
सर्वात व्यस्त दिल्ली विमानतळावर ‘ट्रॅफिक जाम’! ३०० हून अधिक विमानांना विलंब; पार्किंगलाही जागा नाही!
16
घर खरेदी करण्याची योग्य वेळ कोणती? तुमच्या पगारावर EMI चा किती बोजा असावा, 'हे' गणित तपासा!
17
ज्ञानेश कुमार निवृत्तीनंतर शांतपणे आयुष्य जगता येणार नाही..; प्रियंका गांधींचा निवडणूक आयुक्तांना इशारा
18
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली अण्णा हजारेंची भेट; नेमके काय बोलणे झाले? चर्चांना उधाण
19
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
20
बँक कर्मचाऱ्यांनी स्थानिक भाषेतच बोलावं, अर्थमंत्री निर्मला सीतारामन का म्हणाल्या असं?

"वातावरण आपल्या बाजूने, भाजपने धडा घेतलेला नाही"; सोनिया गांधी यांचा महत्त्वाचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2024 12:52 IST

आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी सीपीपीच्या बैठकीत काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत.

Sonia Gandhi : लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीमध्ये काँग्रेस पक्षाला गेल्या निवडणुकीपेक्षा चांगले यश मिळाले आहे. लोकसभेत काँग्रेसच्या खासदारांची संख्या १०० आहे. त्यामुळे भाजपला केंद्रात तगडं आव्हान मिळालं आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे विरोधी पक्षनेतेपद आल्याने ते चांगलेच आक्रमक झाले आहेत. पावसाळी आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनात राहुल गांधी यांची आक्रमक भूमिक पाहायला मिळाली. आता माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी काँग्रे नेत्यांना महत्त्वाचा सल्ला दिला आहे. वातावरण आपल्या बाजूने आहे म्हणत सोनिया गांधी यांनी नेत्यांना महत्त्वाच्या सूचना केल्या.

महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. त्यामुळे आता काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी सक्रिय झाल्या आहेत. सोनिया गांधी यांनी आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी सीपीपीच्या बैठकीत पक्षाच्या नेत्यांना सूचना दिल्या आहेत. आपण आत्मसंतुष्ट आणि अतिआत्मविश्वासात राहू नये, वातावरण आपल्या अनुकूल आहे, आपल्याला एकजुटीने काम करावे लागेल, असं सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे.

"पब्लिक मूड  आपल्या पक्षाच्या बाजूने आहे. पण लोकसभा निवडणुकीत पक्षासाठी तयार केलेली गती आणि सद्भावना राखण्याची गरज आहे. आपण आत्मसंतुष्ट आणि अतिआत्मविश्वासाने वागू नये. मी असे म्हणण्याचे धाडस करते की जर आपण लोकसभा निवडणुकीत जशी कामगिरी केली तशीच कामगिरी केली तर राष्ट्रीय राजकारणात बदल घडून येतील," असे सोनिया गांधी म्हणाल्या. 

"लोकसभा निवडणुकीच्या निकालातून मोदी सरकार धडा घेईल असं वाटलं होतं. पण तरीही ते समाजात फूट पाडण्याच्या आणि  शत्रुत्वाचे वातावरण निर्माण करण्याच्या आपल्या धोरणावर ठाम आहे. आरएसएस स्वतःला सांस्कृतिक संघटना म्हणवते. पण संपूर्ण जगाला माहित आहे की ती भाजपचा राजकीय आणि वैचारिक आधार आहे," अशीही टीका सोनिया गांधी यांनी केली.

कावड यात्रेवरुन केलं भाष्य

कावड यात्रेच्या मार्गाबाबत उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड सरकारने दिलेल्या आदेशावर बंदी घातल्याबाबत सोनिया गांधी यांनी भाष्य केलं. "सुदैवाने सुप्रीम कोर्टाने योग्य वेळी हस्तक्षेप केला. पण हा केवळ तात्पुरता दिलासा ठरू शकतो. नोकरशाहीला आरएसएसच्या कार्यात सहभागी होण्यासाठी अचानक नियम कसे बदलले गेले ते पहा. त्यांनी स्वतःला एक सांस्कृतिक संघटना म्हणून घोषित केले आहे. पण हा भाजपचा राजकीय आणि वैचारिक आधार आहे हे साऱ्या जगाला माहीत आहे, असे सोनिया गांधींनी म्हटलं.

टॅग्स :congressकाँग्रेसSonia Gandhiसोनिया गांधीRahul Gandhiराहुल गांधीlok sabhaलोकसभाBJPभाजपा