शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

‘पीटीआय’ने घेतली चिनी राजदूतांची मुलाखत; प्रसारभारती नाराज

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2020 07:02 IST

वृत्तसंस्थेशी करार तोडण्याची दिली धमकी : ‘ते’ वृत्त राष्ट्रविरोधी असल्याचा केला आरोप; वृत्तसंस्थेची कृती सकारात्मक मूल्यांच्या विरोधात

नवी दिल्ली : चीनचे राजदूत सन वेडाँग यांची भारतावर टीका करणारी मुलाखत प्रसारित केल्याप्रकरणी प्रसारभारतीने प्रेस ट्रस्ट आॅफ इंडिया (पीटीआय) या वृत्तसंस्थेशी कराराचा फेरआढावा घेण्याचे ठरविले आहे. पीटीआयने दिलेले वृत्त राष्ट्रविरोधी आणि देशाच्या एकात्मतेस बाधा आणणारे असल्याचा आरोपही प्रसारभारतीने केला आहे.

प्रसारभारतीने पीटीआयला एक पत्र पाठविले असून, त्यात म्हटले आहे की, तुम्ही प्रसारित केलेल्या बातमीत देशहिताच्या विरोधात आरोप करण्यात आले आहेत. त्यामुळे देशाच्या प्रादेशिक एकात्मतेला बाधा पोहोचली आहे. आता पीटीआयसोबतच्या कराराचा फेरआढावा घेण्याची वेळ आली आहे. प्रसारभारती ही संस्था पीटीआयची वर्गणीदार आहे. पीटीआय ही देशातील सर्वात जुनी वृत्तसंस्था आहे. चीनच्या राजदूतांची मुलाखत प्रसारित केल्याने ही संस्था आता वादात सापडली आहे. प्रसारभारतीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, आम्ही पीटीआयला ६.७५ कोटी रुपये वार्षिक वर्गणी देतो. दरम्यान, पीटीआयचे प्रमुख संपादक विजय जोशी यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. चिनी राजदूतांची जी मुलाखत प्रसारित करण्यात आली त्याचे वृत्तसंस्थेने समर्थन केलेआहे.

प्रसारभारती ही आकाशवाणी आणि दूरदर्शन यांचे नियंत्रण करणारी संस्था आहे. त्यांनी पीटीआयला पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, सार्वजनिक प्रसारक म्हणून वृत्तसंस्थेची कृती या देशासाठी सकारात्मक मूल्यांच्या विरोधात आहे. प्रसारभारती कायदा १९९० च्या कलम १२ मध्ये ज्या मूल्यांचा उल्लेख आहे, त्यांची वृत्तसंस्थेने पायमल्ली केली आहे. त्यामुळे यापुढे आम्हाला पीटीआयची सेवा सुरू ठेवण्यात स्वारस्य वाटत नाही. प्रसारभारतीच्या कायद्यान्वये सार्वजनिक सेवा प्रसारकाने त्याची कामे करताना देशाची एकता व अखंडता याला बाधा येईल, असे काही करू नये. प्रसारभारतीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, २०१७-१८ मध्ये त्यांची वर्गणी २५ टक्के कमी केली आहे. पीटीआयच्या मंडळात पत्रकारांचा समावेश असून, स्वतंत्र संचालक नाहीत. प्रसारभारतीला प्रतिनिधित्व नाही. प्रसारभारती पीटीआयला सर्वाधिक रक्कम देते.पीटीआयचे म्हणणे काय?पीटीआयने म्हटले आहे की, प्रसारभारतीची भूमिका आणि कराराचा फेरआढावा घेण्याचा विचार अन्याय्य आणि चुकीचा आहे.चिनी राजदूतांची जी मुलाखत घेतली होती त्याचा एकतर्फी भाग चिनी दूतावासाने प्रसारित केला. त्याच्या आधारे वृत्तसंस्थेवर एकतर्फी टीका होत आहे.नाराजीचे कारण काय?पीटीआयने गत आठवड्यात चीनचे राजदूत वेडाँग यांची मुलाखत घेतली होती. गलवानमधील संघर्षात २० भारतीय जवान शहीद झाल्याच्या घटनेस भारतच जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला होता.अनेक परदेशी वृत्तसंस्थांशी पीटीआयचे करार आहेत.१९४७ मध्ये पीटीआयची नोंदणी झाली. वृत्तसंस्थेचे काम १९४९ मध्ये सुरूझाले. या वृत्तसंस्थेचे संचालक मंडळ असून, मुख्य कार्यकारी अधिकारी रोजचे काम पाहतात.

टॅग्स :Indiaभारतchinaचीन