शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
4
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
5
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
6
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
7
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
8
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
9
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
10
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
11
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
12
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
13
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
14
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
15
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
16
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
17
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
18
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
19
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
20
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले

एस. जयशंकर यांनी मनं जिंकली; परराष्ट्र मंत्रिपद स्वीकारताच विनम्र ट्विट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2019 16:36 IST

गरजूंच्या मदतीला धावणाऱ्या आणि पाकिस्तानला खडे बोल सुनावणाऱ्या नेत्या अशी स्वराज यांची प्रतिमा आहे.

ठळक मुद्देजयशंकर यांनी पदाची सूत्रं स्वीकारताच सुषमा स्वराज यांच्याबद्दल आदर व्यक्त केला आहे.मोदी सरकार-२ मध्येही परराष्ट्र खातं सुषमा स्वराज यांनाच दिलं जाईल, असा बहुतेकांचा कयास होता.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपलं मंत्रिमंडळ निवडताना दिलेल्या काही धक्क्यांपैकी एक आश्चर्याचा धक्का म्हणजे, माजी परराष्ट्र सचिव डॉ. एस. जयशंकर यांना देण्यात आलेलं परराष्ट्र मंत्रिपद. 'मोदी सरकार-१' मध्ये हे मंत्रालय सुषमा स्वराज यांच्याकडे होतं आणि त्यांनी आपल्या कार्यकुशलतेनं त्यावर आपली छाप सोडली आहे. गरजूंच्या मदतीला धावणाऱ्या आणि पाकिस्तानला खडे बोल सुनावणाऱ्या नेत्या अशी स्वराज यांची प्रतिमा आहे. त्यांची ही लोकप्रियता ओळखून, जयशंकर यांनी पदाची सूत्रं स्वीकारताच त्यांच्याबद्दल विनम्र भावना व्यक्त केल्यात. 

'माझं पहिलं ट्विट. आपल्या सर्वांच्या शुभेच्छांबद्दल आभार. ही जबाबदारी माझ्यावर सोपवण्यात आल्यानं सन्मानित झाल्यासारखं वाटतंय. सुषमा स्वराज यांच्या पाऊलखुणांवरून चालणं खूप अभिमानास्पद आहे', असं एस जयशंकर यांनी म्हटलंय. 

वास्तविक, मोदी सरकार-२ मध्येही परराष्ट्र खातं सुषमा स्वराज यांनाच दिलं जाईल, असा बहुतेकांचा कयास होता. प्रकृतीच्या कारणास्तव निवडणूक लढवणार नसल्याचं स्वराज यांनी आधीच स्पष्ट केलं होतं. परंतु, त्यांना राज्यसभा सदस्यत्व देऊन मंत्री केलं जाईल, असं वाटत होतं. परंतु, शपथविधीच्या दिवशी सुषमा स्वराज स्टेजसमोर बसल्या आणि अनेकांचा हिरमोड झाला. सोशल मीडियावरून नाराजीही व्यक्त झाली. परंतु आता, स्वराज यांच्या चाहत्यांची मनं एस. जयशंकर यांनी जिंकली आहेत.  

एस. जयशंकर यांना परराष्ट्र व्यवहारातील प्रत्यक्ष डावपेचांची चांगली माहिती आहे. रशिया, वॉशिंग्टन, बिजींग अशा सध्याच्या जगातील महत्वाच्या शक्तीकेंद्रांवर त्यांनी काम केले आहे. अन्य अनेक देशांतील त्यांची कामगिरी वाखाणली गेली आहे. मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हापासून जयशंकर यांच्याशी त्यांचे मित्रत्वाचे संबंध होते. अमेरिकेने मोदींचा व्हिसा रद्द केला. पंतप्रधान झाल्यावर मोदींना तो पुन्हा मिळाला. मोदींचा पहिला अमेरिकन दौरा बराच गाजला. तो यशस्वी करण्यात जयशंकर यांचा वाटा महत्त्वाचा होता. भारताच्या अणुकार्यक्रमातही त्यांची भूमिका महत्वाची राहिली आहे. अनेक राष्ट्रप्रमुखांशी त्यांचा थेट संबंध आहे. हे गुण हेरूनच मोदींनी परराष्ट्र मंत्री म्हणून एस. जयशंकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलंय. जयशंकर यांचे वडील सुब्रमण्यम हे नावाजलेले सामरिक सल्लागार होते. 

टॅग्स :PM Narendra Modi Cabinetनरेंद्र मोदी मंत्रिमंडळSushma Swarajसुषमा स्वराजNarendra Modiनरेंद्र मोदी