शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू
2
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
3
Success Story: 'आपली आजी', वय वर्ष ७४, युट्यूबद्वारे महिन्याला ६ लाखांची कमाई; मराठमोळ्या आजींचा कसा आहे प्रवास?
4
FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी
5
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
6
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
7
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
8
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
9
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
10
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
11
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
12
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
13
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
14
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
15
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
16
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
17
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
18
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
19
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
20
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम

आंदोलक शेतकरी घरात असते तरी मेले असते!, हरियाणाच्या कृषीमंत्र्यांचे वादग्रस्त उद्गार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2021 06:03 IST

farmers Protests : या प्रसंगाचा दलाल यांचा एक व्हिडीओ प्रसारमाध्यमे व समाजमाध्यमांवर झळकल्यानंतर खळबळ माजली.

चंदीगढ : नव्या कृषी कायद्याविरोधात आंदोलन करणारे शेतकरी त्याऐवजी घरात असते तरी मरण पावले असते. आता त्यातील काही जण स्वत:च्या हाताने मरण ओढवून घेत आहेत असे अत्यंत वादग्रस्त उद्गार हरियाणाचे कृषीमंत्री जयप्रकाश दलाल यांनी काढले व त्यावर ते हसलेही.या प्रसंगाचा दलाल यांचा एक व्हिडीओ प्रसारमाध्यमे व समाजमाध्यमांवर झळकल्यानंतर खळबळ माजली. शेतकरी आंदोलनामध्ये दोनशे शेतकºयांचा मृत्यू झाला आहे. यासंदर्भात भिवानी येथे एका पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नावर दलाल यांनी सांगितले की, हे शेतकरी घरात असते तरी मेले असते. सहा महिन्यांत दर एक ते दोन लाख लोकांमागे दोनशे-अडीचशे लोक मरतातच. कोणी हृदयविकाराच्या झटक्याने मरतो तर कोणी आणखी काही व्याधी होऊन. मात्र शेतकरी आंदोलनातील काही लोक स्वत:च्या इच्छेनेच मरणाला कवटाळत आहेत. या वक्तव्यावर जयप्रकाश दलाल व त्यांच्यासोबतच्या लोकांमध्ये हशा पिकला. दलाल यांच्या विधानावर काँग्रेससहित इतर विरोधी पक्षांनी जोरदार टीका केली आहे. (वृत्तसंस्था)

दलाल यांनी नंतर मागितली माफी  - या वादग्रस्त वक्तव्यामुळे खळबळ माजल्यानंतर हरियाणाचे कृषीमंत्री जयप्रकाश दलाल यांनी शेतकऱ्यांची माफी मागितली.  ते म्हणाले की, माझे विधान विपर्यस्त पद्धतीने सर्वत्र प्रसारित केले जात आहे. मात्र माझ्या विधानांमुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी त्यांची माफी मागतो.

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलन