शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
2
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
3
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
4
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
5
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
6
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
7
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
8
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
9
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
10
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
11
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
12
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
13
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
14
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
15
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
16
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
17
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
18
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
19
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
20
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील

आंदोलक शेतकरी घरात असते तरी मेले असते!, हरियाणाच्या कृषीमंत्र्यांचे वादग्रस्त उद्गार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2021 06:03 IST

farmers Protests : या प्रसंगाचा दलाल यांचा एक व्हिडीओ प्रसारमाध्यमे व समाजमाध्यमांवर झळकल्यानंतर खळबळ माजली.

चंदीगढ : नव्या कृषी कायद्याविरोधात आंदोलन करणारे शेतकरी त्याऐवजी घरात असते तरी मरण पावले असते. आता त्यातील काही जण स्वत:च्या हाताने मरण ओढवून घेत आहेत असे अत्यंत वादग्रस्त उद्गार हरियाणाचे कृषीमंत्री जयप्रकाश दलाल यांनी काढले व त्यावर ते हसलेही.या प्रसंगाचा दलाल यांचा एक व्हिडीओ प्रसारमाध्यमे व समाजमाध्यमांवर झळकल्यानंतर खळबळ माजली. शेतकरी आंदोलनामध्ये दोनशे शेतकºयांचा मृत्यू झाला आहे. यासंदर्भात भिवानी येथे एका पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नावर दलाल यांनी सांगितले की, हे शेतकरी घरात असते तरी मेले असते. सहा महिन्यांत दर एक ते दोन लाख लोकांमागे दोनशे-अडीचशे लोक मरतातच. कोणी हृदयविकाराच्या झटक्याने मरतो तर कोणी आणखी काही व्याधी होऊन. मात्र शेतकरी आंदोलनातील काही लोक स्वत:च्या इच्छेनेच मरणाला कवटाळत आहेत. या वक्तव्यावर जयप्रकाश दलाल व त्यांच्यासोबतच्या लोकांमध्ये हशा पिकला. दलाल यांच्या विधानावर काँग्रेससहित इतर विरोधी पक्षांनी जोरदार टीका केली आहे. (वृत्तसंस्था)

दलाल यांनी नंतर मागितली माफी  - या वादग्रस्त वक्तव्यामुळे खळबळ माजल्यानंतर हरियाणाचे कृषीमंत्री जयप्रकाश दलाल यांनी शेतकऱ्यांची माफी मागितली.  ते म्हणाले की, माझे विधान विपर्यस्त पद्धतीने सर्वत्र प्रसारित केले जात आहे. मात्र माझ्या विधानांमुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी त्यांची माफी मागतो.

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलन