शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

निदर्शने करणारे शेतकरी दहशतवादी आहेत; कंगना राणौत बरळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2020 06:15 IST

कृषी विधेयकावरून कंगना रनौतची मुक्ताफळे; याच लोकांनी केला सीएएविरोधात हिंसाचार

जालंधर : राज्यसभेत रविवारी संमत झालेल्या कृषीविषयक विधेयकांविरोधात पंजाबमध्ये निदर्शने करणाऱ्या शेतकऱ्यांना अभिनेत्री कंगना रनौत हिने दहशतवादी म्हटले आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायद्यामुळे एकाचेही नागरिकत्व गेलेले नसताना याच दहशतवाद्यांनी त्या कायद्याविरोधात हिंसाचार माजविला होता, अशी मुक्ताफळे कंगनाने उधळली आहेत.

कृषीविषयक विधेयके राज्यसभेत मंजूर झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चार टष्ट्वीट केले होते. कृषी विपणनाशी संबंधित विधेयकाचे कायद्यात रूपांतर झाल्यानंतरही कृषी उत्पन्न बाजार समितीचे अस्तित्व कायम राहणार आहे, तसेच सरकारही शेतकºयांकडून हमी भावाने कृषी उत्पादने यापुढेही खरेदी करणार आहे, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले होते. त्यावर राणावत म्हणाली, मोदीजी, कोणी झोपले असेल तर त्याला जागे करता येते, मात्र झोपेचे सोंग घेतलेल्यांना तुम्ही कितीही समजावून सांगितले तरी त्यांना काय फरक पडणार आहे?

एकाचेही नागरिकत्व गेलेले नसतानाही नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात हिंसाचार माजविणाºया दहशतवाद्यांनी आता कृषी विधेयकाच्या विरोधात निदर्शने सुरू केली आहेत.दलेर मेहंदी, कंगना करणार जनजागृतीच्कृषीविधेयकाच्या निमित्ताने मोदी सरकारवर कुरघोडी करण्याच्या प्रयत्नात असलेले विरोधी पक्ष व शेतकºयांच्या संघटना यांना तोंड देतानाच, भाजप कृषी विधेयकांबद्दल शेतकºयांच्या मनात बसलेली भीती दूर करण्यासाठी दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीदिनी, २५ सप्टेंबरपासून एक जागृती मोहीम हाती घेणार आहे.च्ही विधेयके शेतकºयांच्या हिताची कशी आहेत हे समजावून सांगण्याची कामगिरी आता या मोहिमेद्वारे कंगना रनौत व गायक दलेर मेहंदी यांच्यावर सोपविण्यात आली आहे.च्विविध राज्यांतील भाजपचे पक्षसंघटन, त्या पक्षाचे खासदार, किसान मोर्चा (भाजपचा शेतकरीविषयक विभाग) हे सर्वजण या मोहिमेत सहभागी झाले आहेत.

टॅग्स :Kangana Ranautकंगना राणौतFarmerशेतकरी