शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

आंदोलक शेतकऱ्यांना हरयाणा सीमेवर अडवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2020 08:08 IST

पोलिसांकडून पाण्याच्या फवाऱ्यांचा वापर;  राहुल गांधी, अमरिंदर सिंग, केजरीवालांकडून कारवाईचा निषेध

चंदीगढ : केंद्र सरकारने केलेल्या नव्या कृषी कायद्यांच्याविरोधात गुरुवारी ‘चलो दिल्ली’आंदोलनात सहभागी झालेल्या पंजाबमधील शेतकऱ्यांना हरयाणाच्या सीमेवर अडवण्यात आले. त्यांना पाण्याच्या फवाऱ्यांना तोंड द्यावे लागले. नंतर शेतकऱ्यांनी पोलिसांनी उभारलेले अडथळेही तोडले.शंभू सीमेवर हरयाणाचे पोलीस व ट्रॅक्टर-ट्रॉलीजमध्ये आलेले पंजाबचे शेतकरी घग्गर नदीवरील पुलावर समोरासमोर आले. हरयाणाच्या सीमेला लागून असलेल्या पंजाबच्या बाजुला एकत्र जमलेल्या शेतकऱ्यांना पोलिसांनी तेथून निघून जायला ध्वनिक्षेपकाद्वारे सांगितले. हरयाणा पोलिसांनी या सीमेवरील अमृतसर-दिल्ली महामार्ग ट्रक्स उभ्या करून बंद केला. काही शेतकऱ्यांनी बॅरिकेडस नदीतही फेकले. सुरवातीला काही आंदोलक बॅरिकेडस पायीच ओलांडताना दिसले. नंतर पोलिसांनी बॅरिकेडस हटवले व आंदोलकांना व त्यांच्या ट्रॅक्टर्सना तेथून २०० किलोमीटरवर असलेल्या दिल्लीला जाणाऱ्या रस्त्यावर जाऊ दिले. परंतु, भाजपची सत्ता असलेल्या हरयाणातून महामार्ग जात असल्यामुळे दुसऱ्या ठिकाणी बॅरिकडेस पोलिसांनी लावले होते.

करनालमध्ये पोलीस आणि शेतकरी समोरासमोर आले होते. हरयाणा आणि उत्तर प्रदेशला लागून असलेल्या सीमेवर दिल्ली पोलिसांनी सुरक्षा वाढवली होती. दुपारी आंदोलक शेतकऱ्यांनी सीमेवरील इतर ठिकाणांवरून हरयाणात प्रवेश केला ते दिल्लीकडे प्रवास करत होते. शंभूशिवाय पोलिसांनी खनौरी सीमा आणि कैथाल जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या आंदोलकांना अडवण्यासाठी पाण्याच्या फवाऱ्यांचा वापर केला. मोदी सरकारच्या कुवर्तनाच्या विरोधात शेतकरी ठामपणे उभे राहिले आहेत, असे ट्वीट काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केले आहे. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी, पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदरसिंग, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पोलिसांनी केलेल्या कारवाईचा निषेध केला. गुडगावमध्ये स्वराज इंडियाचे अध्यक्ष योगेंद्र यादव आणि आंदोलकांच्या गटाला पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

टॅग्स :delhiदिल्लीFarmerशेतकरीagitationआंदोलन