शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

केजरीवालांच्या घराबाहेर पाकिस्तानी निर्वासितांचे आंदोलन, मुख्यमंत्र्यांची केंद्रावर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2024 17:54 IST

'पाकिस्तानी लोकांना माझ्या घरासमोर गोंधळ घालायची परवानगी आहे, पण या देशातील शेतकऱ्यांना दिल्लीत येण्याचीही परवानगी नाही.'

नवी दिल्ली: पाकिस्तानातून आलेल्या निर्वासितांनी गुरुवारी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (arvind kejariwal) यांच्या घराबाहेर निदर्शने केली. निदर्शनादरम्यान निर्वासितांनी मुख्यमंत्र्यांविरोधात जोरदार घोषणाबाजीही केली. निर्वासितांचे म्हणणे आहे की, केजरीवालांनी CAA कायद्याबद्दल दिशाभूल करणारे विधान केले, ज्यासाठी त्यांनी माफी मागितली पाहिजे. दरम्यान, आपल्या घराबाहेर निदर्शन पाहून केजरीवाल यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला.

केजरीवाल सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाले की, आज काही पाकिस्तानी लोकांनी माझ्या घरासमोर निदर्शने करून गोंधळ घातला. दिल्ली पोलिसांनी त्यांना पूर्ण सन्मान आणि संरक्षण दिले. यांना माझ्या घराबाहेर पोलीस संरक्षणात आंदोलन करण्याची परवानगी आहे, पण या देशातील शेतकऱ्यांना दिल्लीत येण्याचीही परवानगी नाही? भारतीय शेतकऱ्यांवर अश्रुधुराच्या कांड्या, लाठ्या-काठ्या, गोळ्या झाडल्या जातात अन् पाकिस्तानींना एवढा मान मिळतो? भाजपचा त्यांना पूर्ण पाठिंबा आहे. त्यांच्यात एवढी हिंमत होते की, दिल्लीच्या जनतेने प्रचंड बहुमताने निवडून दिलेल्या मुख्यमंत्र्यांना आपल्या देशात घुसून माफी मागायला सांगतात, आणि भाजप त्यांना पाठिंबा देते. माझा द्वेष करता करता भाजप पाकिस्तानींच्या पाठीशी उभा राहिला. 

केजरीवाल एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी अमित शाह यांच्या सीएएवरील विधानालाही प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, या CAA नंतर हे पाकिस्तानी देशभर पसरतील आणि आपल्याच देशातील लोकांना त्रास देतील. सीएए देशासाठी धोकादायक आहे. त्यामुळे बेरोजगारी वाढेल. बाहेरुन लोक आले, तर नोकऱ्या कुठून देणार? तुमच्यामुळेच रोहिंग्या भारतात आले. CAA मुळे 1947 च्या तुलनेत मोठ्या प्रमाणात स्थलांतर होईल. इतके लोक भारतात आले तर सरकार त्यांना रोजगार कसा देणार? पंतप्रधान आपली व्होट बँक वाढवण्यासाठी हे करत आहेत. हे भाजपचे व्होट बँकेचे राजकारण आहे, अशी टीका त्यांनी केली. 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकdelhiदिल्लीPakistanपाकिस्तानBJPभाजपा