शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
3
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
4
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
5
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
6
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
7
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
8
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
9
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
10
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
11
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
12
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
13
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
14
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
15
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
16
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले
17
आंध्र प्रदेशातील बस अपघातातील चालकाला अटक, आग लागल्यानंतर प्रवाशांना सोडून पळून गेला होता
18
पॅरिसमधील संग्रहालयात ‘धूम’स्टाईल चोरी, मौल्यवान रत्ने लांबवली, अखेर असे सापडले चोर  
19
"मी दर महिन्याला एक युद्ध थांबवतो; आता पाकिस्तान-अफगाणिस्तान...," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
20
‘मद्यपान करून गाडी चालवणारे दहशतवादीच’, कुरनूल बस अपघातानंतर हैदराबादच्या पोलीस आयुक्तांचं परखड विधान

ज्येष्ठांचे संरक्षण हे जिल्हाधिकाऱ्यांचे कर्तव्य, सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2025 06:34 IST

राजेश्वरप्रसाद रॉय गृहनिर्माण मंडळाचे निवृत्त अभियंता आहेत. निवृत्तीनंतर त्यांनी स्वकमाईच्या जागेवर २० खोल्यांचे विश्रामगृह अतिरिक्त उत्पन्नासाठी बांधले होते.

-डॉ. खुशालचंद बाहेती, नवी दिल्लीज्येष्ठ नागरिकांचे जीवन व मालमत्ता सुरक्षित राहावी आणि त्यांना सुरक्षित व सन्मानाने जगता यावे याची खात्री करणे हे जिल्हा दंडाधिकाऱ्यांचे कर्तव्य आहे. वृद्ध पालकांना त्रास देणाऱ्या मुलांना ज्येष्ठ नागरिकांच्या मालमत्तेतून काढून टाकले नाही तर ज्येष्ठ नागरिक कायद्याचा पराभव होईल, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

राजेश्वरप्रसाद रॉय गृहनिर्माण मंडळाचे निवृत्त अभियंता आहेत. निवृत्तीनंतर त्यांनी स्वकमाईच्या जागेवर २० खोल्यांचे विश्रामगृह अतिरिक्त उत्पन्नासाठी बांधले. राजेश्वर यांचा विवाहित मुलगा पत्नीसह वेगळा राहायचा. २०२१ मध्ये मुलाने पर्यायी जागा मिळेपर्यंत तात्पुरती विश्रामगृहातील एक खोली मागितली. नंतर त्याने आणखी २ खोल्यांवर अतिक्रमण केले.

नेमके काय घडले?

राजेश्वर यांनी खोली ताब्यात घेण्यावरून विचारले तेव्हा मुलाने त्यांना अडकविण्याची धमकी दिली. राजेश्वर यांनी याची पोलिसांत तक्रार केली. मुलानेही पत्नीशी गैरवर्तन केल्याची तक्रार केली.

राजेश्वर यांनी अर्ज दाखल करून मालमत्तेवरील मुलाचे अतिक्रमण हटवण्याची मागणी केली. यावर सुनेने  हिंसाचार कायद्याचा खटला दाखल केला. ज्येष्ठ नागरिक न्यायाधिकरणाने मुलाला मालमत्तेतून काढून टाकण्याचे आदेश दिले. सुप्रीम कोर्टाने न्यायाधिकरणाचा आदेश कायम केला.

कुटुंब संस्थेत बदल 

बंगळुरू : भारतात कुटुंब संस्थेत वेगाने बदल होत आहेत आणि या बदलांचा केवळ कुटुंबांच्या रचनेवरच नव्हे तर कायदेशीर व्यवस्थेवरही खोलवर परिणाम होत आहे, असे मत सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश बी. व्ही. नागरत्ना यांनी व्यक्त केले.

‘कुटुंब : भारतीय समाजाचा पाया’ या विषयावर दक्षिण विभागीय प्रादेशिक संमेलनाला संबोधित करताना त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या की, शिक्षणाची उपलब्धता, वाढते शहरीकरण, वैयक्तिक आकांक्षा आणि शिक्षण घेणाऱ्या महिलांचे वाढते आर्थिक स्वातंत्र्य यासह अनेक घटकांमुळे हा बदल घडत आहे.

ज्येष्ठ नागरिकांच्या स्वअर्जीत मालमत्तेवर अतिक्रमण करणाऱ्या आणि वृद्ध पालकांना मानसिक व शारीरिक त्रास देणाऱ्या पाल्यांना मालमत्तेतून काढून टाकण्याच्या तरतुदींचा लाभ देण्यात आला नाही तर ज्येष्ठ नागरिक देखभाल आणि कल्याण कायद्याचा उद्देशच अपयशी ठरेल. -न्या. विक्रम नाथ आणि संदीप मेहता.

टॅग्स :Senior Citizenज्येष्ठ नागरिकSupreme Courtसर्वोच्च न्यायालयcollectorजिल्हाधिकारी