शहरं
Join us  
Trending Stories
1
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
2
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
3
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
4
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाण्यात नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार
5
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
6
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
7
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
8
KL Sharma : स्मृती इराणींच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात काँग्रेसने उतरवलेले केएल शर्मा कोण आहेत?
9
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
10
RBI ने निर्बंध हटवले; Bajaj Finance च्या शेअर्समध्ये मोठी तेजी, ब्रोकरेजचा विश्वास वाढला
11
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
12
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
13
हाताला दुखापत अन्...; अंकिता लोखंडेला काय झालं? हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत म्हणते...
14
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
15
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
16
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
17
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
18
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
19
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
20
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!

बालविवाह रोखण्यास कायदा दुरुस्तीचा प्रस्ताव

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2018 3:35 AM

बालविवाह पूर्णपणे अवैध ठरविण्यासाठी बालविवाहविरोधी कायद्यातील तिसऱ्या कलमात दुरुस्ती करण्यासंदर्भातील प्रस्ताव केंद्रीय महिला व बालकल्याण खात्यातर्फे लवकरच मंत्रिमंडळापुढे सादर केला जाणार आहे, असे एका वरिष्ठ अधिका-याने सांगितले.

नवी दिल्ली : बालविवाह पूर्णपणे अवैध ठरविण्यासाठी बालविवाहविरोधी कायद्यातील तिसऱ्या कलमात दुरुस्ती करण्यासंदर्भातील प्रस्ताव केंद्रीय महिला व बालकल्याण खात्यातर्फे लवकरच मंत्रिमंडळापुढे सादर केला जाणार आहे, असे एका वरिष्ठ अधिका-याने सांगितले.सर्वोच्च न्यायालयाने आॅक्टोबर २०१७मध्ये दिलेल्या एका निकालात म्हटले आहे की, अल्पवयीनांबरोबर शारीरिक संबंध राखण्यास कायद्याने संमती दिलेली नाही. त्यामुळे १८ वर्षे वयाखालील पत्नीबरोबर लैंगिक संबंध राखणे हा तिच्यावर केलेला बलात्कारच असतो. विद्यमान कायद्यातील एका तरतुदीनुसार बालविवाहाला असलेली संमती या निकालानंतर तरी रद्द होणे आवश्यक आहे असेही या अधिकाºयाने पुढे सांगितले. बालविवाह झालेल्या पती-पत्नीपैकी कोणीही एकाने प्रौढ झाल्यानंतर दोन वर्षांच्या आत किंवा आपल्या पालकांकरवी जिल्हा न्यायालयात अर्ज केला तर विवाह रद्द होऊ शकतो अशीही कायदेशीर तरतूद बालविवाहविरोधी कायद्यात आहे.>सव्वादोन कोटी बालविवाहविवाहासाठी मुलाचे वय २१ व मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे, तरच तो विवाह कायदेशीर मानला जातो. २०११च्या जनगणनेनुसार देशात२.३ कोटी मुलींचे बालविवाह झाले आहेत. सन २०१५-१६ या कालावधीत करण्यात आलेल्या राष्ट्रीयकुटुंब आरोग्य सर्वेक्षणाच्या (एनएफएचएस) आकडेवारीनुसार वयाची १८ वर्षे पूर्ण होण्याआधीच २६.८ टक्के महिला विवाहबद्ध झाल्या होत्या. तसेच १५ ते १९ वर्षे वयोगटातील ८ टक्के मुली माता बनल्या होत्या किंवा गरोदर होत्या, असेही २०१५-१६च्या एनएफएचएस सर्वेक्षणात दिसून आले. अशा माता आजारांना लवकर बळी पडण्याचीही शक्यता असते.

टॅग्स :Courtन्यायालय