शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

देशातील 8 कोटी नागरिकांना मोफत धान्य देण्याचं वचन, प्रत्यक्षात 2 कोटींनाच दिलं

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2020 9:26 AM

केंद्र सरकारने 8 लाख मेट्रीक टन खाद्यान्नाची व्यवस्था केली होती, मात्र, राज्यांनी केवळ 6.39 मेट्रीक टनच धान्य घेतले.

ठळक मुद्देकेंद्र सरकारने 8 लाख मेट्रीक टन खाद्यान्नाची व्यवस्था केली होती, मात्र, राज्यांनी केवळ 6.39 मेट्रीक टनच धान्य घेतले. 8 कोटी नागरिकांना धान्य देण्याचं वचन देण्यात आलं, पण दोन महिन्यात पुरवठा केवळ 2 कोटी लोकांनाच करण्यात आला आहे. 

नवी दिल्ली - कोरोना लॉकडाऊन काळात देशातील 8 कोटी स्थलांतरीत मजुरांच्या अन्नाची गरज भागविण्यासाठी केंद्र सरकारने दरमहा 5 किलो धान्य देण्याच्या हेतुने आत्मनिर्भर भारत अभियान सुरु केले आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांत केवळ 1.20 कोटी लोकांपर्यंतच हे मोफतचे धान्य पोहोचले आहे. विशेष म्हणजे जून महिन्यात या लाभार्थ्यांची संख्या 89.88 लाखापर्यंत पोहोचली आहे. 

केंद्र सरकारने 8 लाख मेट्रीक टन खाद्यान्नाची व्यवस्था केली होती, मात्र, राज्यांनी केवळ 6.39 मेट्रीक टनच धान्य घेतले. त्यापैकी मे आणि जून महिन्यात केवळ 99,207 मेट्रीक टन धान्यचं लोकांना वाटण्यात आलं आहे. विशेष म्हणजे 1.96 कोटी कुटुंबापैकी प्रत्येक कुटुंबाला एक-एक किलो दाळही देण्यात येत होती. त्यासाठी सरकारने 39,000 मेट्रीक टन डाळीचीही व्यवस्था केली होती. राज्यांनी या डाळीपैकी केवळ 31,868 मेट्रीक टन डाळ घेतली आहे. मात्र, लोकांना आत्तापर्यंत 4,702 मेट्रीक टन डाळ देण्यात आली आहे. 

केंद्र सरकाने धान्य वाटपासाठी 3109 कोटी आणि डाळ वाटपासाठी 280 कोटी रुपयांच संपूर्ण खर्च उचलणार असल्याचे सांगितले आहे. भारतीय खाद्य निगमच्या 28 जूनच्या आकडेवाडीनुसार 816.60 मेट्रीक टन खाद्यान्न शिल्लक आहे. त्यापैकी 266.29 लाक मेट्रीक टन तांदूळ आणि 550.31 लाख मेट्रीक टन गव्हाचे भंडार आहे. यंदाच्या वर्षीच्या उत्पादनाशिवाय हा धान्यसाठा आहे. 

पुढील एका महिन्यातील विविध कल्याणकारी योजनांसाठी जवळपास 55 लाख मेट्रीक टन धान्याची आवश्यकता असणार आहे. मात्र, अन्न व नागरीपुरवठा मंत्री रामविलास पासवान यांनी दावा केला आहे की, 8 कोटी मजुरांसाठी सर्वच राज्यांनी मे आणि जून महिन्यातील वितरणासाठी धान्य व डाळ घेतली आहे. तसेच या धान्याचे वितरणही चालू करण्यात आले आहे. 

अन्न सुरक्षा कायद्याच्या अखत्यारित न येणाऱ्या मजूर व स्थलांतरीतांनाही 5 किलो मोफत धान्य देण्याची योजना सरकारने लॉकडाऊन काळात सुरु केली होती. म्हणजेच, देशातील 8 कोटी नागरिकांना रेशन कार्डशिवाय हे धान्य देण्यात येणार होते. मात्र, 8 कोटी नागरिकांना धान्य देण्याचं वचन देण्यात आलं, पण दोन महिन्यात पुरवठा केवळ 2 कोटी लोकांनाच करण्यात आला आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याfoodअन्न