शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, महाराष्ट्रात चार टप्प्यात होणार मतदान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2019 17:54 IST

17 व्या लोकसभा निवडणुकीसाठीचे बिगूल अखेर आज वाजले. केंद्रीय निवडणूक आयोगाने  नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला

नवी दिल्ली -  17 व्या लोकसभा निवडणुकीसाठीचे बिगूल अखेर आज वाजले. केंद्रीय निवडणूक आयोगाने  नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून, महाराष्ट्रामध्ये चार टप्प्यात मतदान होणार आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाने केलेल्या लोकसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाच्या घोषणेबरोबरच देशात आदर्श आचार संहिता जाहीर झाली आहे.  

महाराष्ट्रातील मतदान प्रक्रिया एप्रिल महिन्यात होणाऱ्या चार टप्प्यातील मतदानामध्ये आटोपणार आहे.  पहिल्या टप्प्यात 11 एप्रिलला महाराष्ट्रातील सात मतदारसंघात मतदान होणार आहे, तर दुसऱ्या टप्प्यात 18 एप्रिलला राज्यातील 10 मतदार संघात मतदान होईल. राज्यातील 14 मतदार संघांमध्ये तिसऱ्या टप्प्यात 23 एप्रिल रोजी मतदान होईल. तर उर्वरीत 17 मतदारसंघांमध्ये 29 एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पूर्ण होणार आहे.  महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या एकूण 48 जागा असून, सदस्यसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्र हे भारतातील दुसरे सर्वात मोठे राज्य आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्षांनी कंबर कसली असून, राज्यात शिवसेना-भाजप युती आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी यांच्यात मुख्य लढत रंगणार आहे. 

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Maharashtraमहाराष्ट्रlok sabhaलोकसभाPoliticsराजकारण