शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

स्मृती इराणींचा पराभव करण्यासाठी प्रियांका गांधींची रणनीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2024 08:06 IST

आदेश रावल लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्यासाठी अमेठी आणि रायबरेली लोकसभा जागा या ...

आदेश रावललोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्यासाठी अमेठी आणि रायबरेली लोकसभा जागा या प्रतिष्ठेचा प्रश्न बनल्या आहेत. काँग्रेसने अमेठीतून किशोरीलाल शर्मा यांना तिकीट दिले असले तरी, अमेठी आणि रायबरेलीमध्ये प्रियांका स्वतः निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराच्या भूमिकेत आहेत.प्रियांका सध्या दररोज अमेठी लोकसभा अंतर्गत येणाऱ्या विधानसभा मतदारसंघात भेटी देत आहेत या भागात वर्चस्व असलेल्या नेत्यांची, कार्यकर्त्यांची भेट घेत आहेत. तसेच, राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांची अमेठीचे निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, भूपेश बघेल यांची रायबरेलीचे निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आले आहे.

नेमके काय करणार? हे दोन नेते कोणतीही निवडणूक सभा घेत नाहीत तर, पडद्याआडून निवडणुकीचे व्यवस्थापन बघत आहेत. किशोरीलाल शर्मा यांना उमेदवार बनवण्यामागे काँग्रेसची रणनीती अशी आहे की, स्मृती इराणींना पराभूत करून त्यांना संदेश द्यायचा आहे की, या निवडणुकीत एका छोट्या काँग्रेस कार्यकर्त्याने केंद्रीय मंत्र्याचा पराभव केला. त्यामुळे प्रियांका यांनी पुढील १३ दिवस तिथेच थांबण्याचा निर्णय घेतला आहे.

भाजप राहुल विरोधात खोटे बोलण्यात गुंतलेलीप्रियांका गांधी यांनी आरोप केला की, भाजपची संपूर्ण यंत्रणा राहुल गांधींविरोधात खोटे पसरवण्यात गुंतलेली आहे. भाजप धर्म, जात आणि मंदिर-मशिदींबद्दल बोलतो, पण लोकांच्या खऱ्या प्रश्नांवर बोलत नाही. भाजपला राज्यघटना बदलायची आहे, पण निवडणुकीत याचा त्रास सहन करावा लागेल, हे लक्षात आल्यावर त्यांनी अशी कोणतीही योजना नसल्याचे सांगितले.

लोकांना वाटते की त्यांच्या समस्यांवर चर्चा व्हावी, त्यांना उपाय हवा आहे. सरकारने वाढलेली बेरोजगारी, महागाई दूर करण्यासाठी काय केले हे त्यांना जाणून घ्यायचे आहे. मी पंतप्रधानांना बेरोजगारीवर बोलण्याचे आव्हान देते. बेरोजगारी ४५ वर्षांतील सर्वाधिक आहे.- प्रियांका गांधी, काँग्रेस नेत्या

टॅग्स :Smriti Iraniस्मृती इराणीamethi-pcअमेठीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Priyanka Gandhiप्रियंका गांधी