शहरं
Join us  
Trending Stories
1
कुख्यात गुंड नीलेश घायवळच्या मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठीचा पैसा कुठून आला? तपास होणार!
2
जालना मनपा आयुक्त संतोष खांडेकर यांना अटक; १० लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडलं!
3
एकरकमी ३७५१ पहिली उचल टाका, मगच ऊसाला कोयता; राजू शेट्टी यांनी स्पष्ट केली भूमिका
4
DIGच्या घरात सापडलं घबाड, नोटा मोजण्यासाठी मागवावी लागली मशीन, CBIची मोठी कारवाई  
5
'PM मोदी आणि ट्रम्प यांच्यात फोनवरून कसलीही चर्चा झाली नाही'; भारताने दावा फेटाळला, अमेरिकेच्या अध्यक्षांची 'पंचाईत'
6
बिहारच्या मुख्यमंत्रिपदाबाबत अमित शाहांचं सस्पेन्स वाढवणारं विधान, नितिश कुमारांबाबत म्हणाले...
7
ऑस्ट्रेलियन भूमीवर वनडेत सर्वाधिक षटकार कोणी मारले? पहिलं नाव पाहून खूश व्हाल!
8
'स्वतःच्या अपयशांसाठी शेजाऱ्यांना दोष देणे पाकिस्तानची जुनी सवय', अफगाण-पाक संघर्षावरुन भारताचे टीकास्त्र
9
कर्मचारीच द्यायचा टिप, मग फ्लिपकार्टच्या ट्रकमधील वस्तूंवर मारायचे डल्ला, ७ जण अटकेत, २२६ मोबाईल जप्त  
10
रणजी ट्रॉफी स्पर्धेत 'जर्सी' चित्रपटाचा ट्रेलर! मुंबईकरांवर भारी पडला जम्मू-काश्मीरचा ४० वर्षीय कॅप्टन
11
डीएसएलआर कॅमेऱ्याला टक्कर देणारी ओप्पो फाइंड एक्स ९ सीरीज लॉन्च; जाणून घ्या किंमत!
12
सलग दुसऱ्या सेंच्युरीसह एलिसा हीलीनं पा़डला बांगलादेशचा बुक्का; ऑस्ट्रेलियाला मिळालं सेमीचं पहिलं तिकीट
13
Gujarat Cabinet Resignation: भाजपने गुजरातमधील सर्व मंत्र्यांचे राजीनामे का घेतले, आता पुढे काय घडणार?
14
टी-२० विश्वचषक २०२६ साठी पात्र ठरलेले सर्व २० संघ कोणते? येथे पाहा संपूर्ण यादी
15
वापरली अशी ट्रिक आणि दोन वर्षे फ्रीमध्ये ऑनलाइन ऑर्डर केलं जेवण, बिंग फुटताच...   
16
"इज्जत गेली गावाची, मग आठवण आली भावाची" एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
17
कुंभमेळा आयोजनाची कामं नियोजित वेळेत पूर्ण झाली पाहिजेत; मुख्य सचिव राजेश कुमारांचे निर्देश
18
VIDEO: बापरे !! महाकाय अजगराने महिलेच्या पायाला घातला विळखा, महिलेचे धाडस पाहून सारे थक्क
19
Kaps Cafe Firing: कपिल शर्माच्या कॅफेवर पुन्हा गोळीबार; बिश्नोई टोळीच्या गोल्डी-सिद्धूने घेतली हल्ल्याची जबाबदारी
20
‘गर्भवती असाल तर सुट्टी घ्या, पैसे कमावण्यासाठी येता आणि बैठकीला अनुपस्थित राहता” महिला अधिकाऱ्यावर काँग्रेसचे आमदार भडकले

Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2024 13:47 IST

Lok Sabha Election 2024 And Jairam Ramesh : राहुल गांधी अमेठीतून तर प्रियंका गांधी रायबरेलीतून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा होती. मात्र पक्षाने रणनीती बदलून नवे चेहरे उभे करण्याचा निर्णय घेतला. यावर काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी प्रतिक्रिया दिली.

काँग्रेसने उत्तर प्रदेशातील अमेठी आणि रायबरेली जागांसाठी उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यावेळी रायबरेली मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. तर अमेठीच्या जागेवर पक्षाने किशोरीलाल शर्मा यांना उमेदवारी दिली आहे. किशोरीलाल हे सोनिया गांधी यांच्या जवळच्या मानले जातात. ते पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहेत. राहुल गांधींनी यापूर्वी अमेठी मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. 

राहुल गांधी अमेठीतून तर प्रियंका गांधी रायबरेलीतून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा यापूर्वी होती. मात्र, पक्षाने अचानक रणनीती बदलून दोन्ही जागांवर नवे चेहरे उभे करण्याचा निर्णय घेतला. यावर काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जयराम रमेश म्हणाले की, "राहुल गांधी रायबरेलीतून निवडणूक लढवण्याच्या वृत्तावर अनेकांची मतं आहेत. पण ते राजकारण आणि बुद्धिबळातील अनुभवी खेळाडू आहेत आणि आपली वाटचाल विचारपूर्वक करतात."

"पक्षनेतृत्वाने बरंच विचारमंथन केल्यानंतर आणि मोठ्या रणनीतीचा भाग म्हणून हा निर्णय घेतला आहे. या निर्णयाने भाजपा, त्यांचे समर्थक कोलमडले आहेत. गांधी घराण्याच्या बालेकिल्ल्याचा विचार केला तर, केवळ अमेठी-रायबरेलीच नाही तर उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत संपूर्ण देश गांधी घराण्याचा गड आहे. राहुल गांधी उत्तर प्रदेशातून तीनदा आणि केरळमधून एकदा खासदार झाले, पण निवडणूक लढवण्याची हिंमत मोदीजी का दाखवू शकले नाहीत? आणखी एक गोष्ट स्पष्ट आहे की, काँग्रेस परिवार हे लाखो कार्यकर्त्यांच्या अपेक्षा आणि आकांक्षांचे कुटुंब आहे."

"काँग्रेसचा सामान्य कार्यकर्ता हा मोठ्या नेत्यांपेक्षा जास्त ताकदवान आहे. काल एक प्रख्यात पत्रकार अमेठीतील एका कार्यकर्त्याला उपहासाने विचारत होता की, तिकीट काढण्याची तुमचा नंबर कधी येईल? हे घ्या... आला आहे. एक सामान्य काँग्रेस कार्यकर्ता अमेठीत भाजपाचा भ्रम आणि अहंकार दोन्ही तोडेल. प्रियंकाजी जोरदार प्रचार करत आहेत आणि त्या एकट्या नरेंद्र मोदींना त्यांच्या प्रत्येक खोट्याला सत्याने उत्तर देऊन गप्प करत आहेत, म्हणूनच त्यांनी फक्त त्यांच्या मतदारसंघापुरते मर्यादित न राहणे आवश्यक होते."

"प्रियंकाजी कोणतीही पोटनिवडणूक लढवून सभागृहात पोहोचतील. आज स्मृती इराणी यांची एकमेव ओळख आहे ती म्हणजे त्या अमेठीतून राहुल गांधींविरोधात निवडणूक लढवतात. आता ती प्रसिद्धीही स्मृती इराणींकडून हिरावून घेतली गेली. आता व्यर्थ विधानं करण्यापेक्षा स्मृती इराणींनी स्थानिक विकासाबाबत उत्तर द्यावे, बंद पडलेली रुग्णालये, स्टील प्लांट आणि आयआयआयटी यांच्यावर उत्तर द्यावं. बुद्धिबळातील काही चाली बाकी आहेत, थोडी वाट पाहा" असं देखील जयराम रमेश यांनी म्हटलं आहे. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४congressकाँग्रेसPriyanka Gandhiप्रियंका गांधीRahul Gandhiराहुल गांधीPoliticsराजकारण