शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

Robert Vadra On Politics : "जनतेची इच्छा असल्यास सक्रिय राजकारणात उतरणार," EVM वरही रॉबर्ट वाड्रांनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2022 20:23 IST

Robert Vadra On Politics : काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांनी आपण राजकारणात उतरुन मोठ्या प्रमाणात जनतेची सेवा करू शकतो, असं वक्तव्य केलं.

Robert Vadra On Politics : काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी वाड्रा (Congress Priyanka Gandhi-Vadra) यांचे पती रॉबर्ट वाड्रा (रॉबर्ट वाड्रा) यांनी पुन्हा एकदा सक्रिय राजकारणात (Politics) उतरण्याची इच्छा व्यक्त केली आहे. जनतेची इच्छा असल्यास आपण राजकारणात उतरू शकतो. राजकारणात उतरून आपण मोठ्या प्रमाणात जनतेची सेवा करू इच्छितो, असंही त्यांनी यावेळी म्हटलं. वाड्रा हे रविवारी मध्यप्रदेशच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी दिलेल्या एका मुलाखतीत यावर भाष्य केलं. दरम्यान त्यांनी उज्जैनच्या महाकालेश्वर ज्योतिर्लिंग आणि अन्य मदिरांमध्ये पूजाही केली.

"मला राजकारणाची माहिती आहे. सामान्य जनतेला जर मी त्यांचं नेतृत्व करावं असं वाटतं असेल आणि मी त्यांच्यासाठी काही बदल घडवू शकतो असं वाटत असेल, तर मी हे पाऊल नक्कीच उचलेन," असं वाड्रा म्हणाले. "मी १० वर्षांपेक्षा अधिक कालावधीपासून समाजकार्यात आहे आणि हे पुढेही कायम राहील. कितीही वेळ लागला किंवा मी राजकारणात येईन अथवा नाही मी जनतेची सेवा करतच राहणार," असंही त्यांनी स्पष्ट केलं.

"... तर मोठ्या प्रमाणात सेवा करता येईल"जर आपण राजकारणात आलो तर लोकांची मोठ्या प्रमाणात सेवा करत येईल. तसं आताही मी देशभरात मोठ्या प्रमाणात लोकांमध्ये पोहोचतोय. लोक माझ्यासोबत आहेत याची मला कल्पना आहे. त्यांना माहितीये जर माझ्या नावाचा वापर केला, तर जनतेसाठी चांगलंच काम करणार असंही ते म्हणाले.

"सद्यस्थिती पाहून भिती वाटते""पुढे काय होतं हे पाहू. आम्ही दररोज कुटुंबात आजकाल कशाप्रकारचं राजकारण केलं जात आहे आणि देश कसा बदलतोय याची चर्चा करतो," असं वाड्रा म्हणाले. तसंच राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना सद्यस्थिती पाहून भिती वाटते असंही ते म्हणाले. "आजकाल माध्यमांना खरी परिस्थिती दाखवायला भिती वाटते. हे सर्व लोकशाहीचा भाग नाही. या गोष्टी देशाला पुढे नेणाऱ्या नाही, त्या देशाला मागे घेऊन जातील," असंही त्यांनी स्पष्ट केलं. यावेळी प्रियंका गांधींच्या उत्तर प्रदेशातील कामगिरीवर बोलताना त्यांनी आपण त्यांना १० पैकी १० गुण देणार असल्याचं सांगितलं. त्यांनी दिवसरात्र एक करून काम केलं. आम्ही उत्तर प्रदेशचा जनादेश स्वीकार असल्याचं म्हणत लोकांच्या हितासाठी पूर्ण मेहनतीनं काम करत राहणार असल्याचं सांगितलं.

ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह"ईव्हीएमच्या बाबतीस सामान्यांच्या मनात जी शंका आहे ती जर दूर केली तर देशात राजकीय निकाल वेगळे दिसतील," असंही वाड्रा यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी कोरोनाच्या परिस्थितीवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. कोरोना काळात देशात अचानक लॉकडाऊन लावण्यात आला. सध्या बेरोजगारीही वाढत आहे. देशातील हिंदू मुस्लीम भेदभाव संपला पाहिजे आणि सर्वांच्या मतांचा समानतेनं आदर करत ते स्वीकारले पाहिजे असंही ते म्हणाले.

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीrobert vadraरॉबर्ट वाड्राcongressकाँग्रेसPoliticsराजकारणSonia Gandhiसोनिया गांधी