शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

Robert Vadra On Politics : "जनतेची इच्छा असल्यास सक्रिय राजकारणात उतरणार," EVM वरही रॉबर्ट वाड्रांनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2022 20:23 IST

Robert Vadra On Politics : काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांनी आपण राजकारणात उतरुन मोठ्या प्रमाणात जनतेची सेवा करू शकतो, असं वक्तव्य केलं.

Robert Vadra On Politics : काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी वाड्रा (Congress Priyanka Gandhi-Vadra) यांचे पती रॉबर्ट वाड्रा (रॉबर्ट वाड्रा) यांनी पुन्हा एकदा सक्रिय राजकारणात (Politics) उतरण्याची इच्छा व्यक्त केली आहे. जनतेची इच्छा असल्यास आपण राजकारणात उतरू शकतो. राजकारणात उतरून आपण मोठ्या प्रमाणात जनतेची सेवा करू इच्छितो, असंही त्यांनी यावेळी म्हटलं. वाड्रा हे रविवारी मध्यप्रदेशच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी दिलेल्या एका मुलाखतीत यावर भाष्य केलं. दरम्यान त्यांनी उज्जैनच्या महाकालेश्वर ज्योतिर्लिंग आणि अन्य मदिरांमध्ये पूजाही केली.

"मला राजकारणाची माहिती आहे. सामान्य जनतेला जर मी त्यांचं नेतृत्व करावं असं वाटतं असेल आणि मी त्यांच्यासाठी काही बदल घडवू शकतो असं वाटत असेल, तर मी हे पाऊल नक्कीच उचलेन," असं वाड्रा म्हणाले. "मी १० वर्षांपेक्षा अधिक कालावधीपासून समाजकार्यात आहे आणि हे पुढेही कायम राहील. कितीही वेळ लागला किंवा मी राजकारणात येईन अथवा नाही मी जनतेची सेवा करतच राहणार," असंही त्यांनी स्पष्ट केलं.

"... तर मोठ्या प्रमाणात सेवा करता येईल"जर आपण राजकारणात आलो तर लोकांची मोठ्या प्रमाणात सेवा करत येईल. तसं आताही मी देशभरात मोठ्या प्रमाणात लोकांमध्ये पोहोचतोय. लोक माझ्यासोबत आहेत याची मला कल्पना आहे. त्यांना माहितीये जर माझ्या नावाचा वापर केला, तर जनतेसाठी चांगलंच काम करणार असंही ते म्हणाले.

"सद्यस्थिती पाहून भिती वाटते""पुढे काय होतं हे पाहू. आम्ही दररोज कुटुंबात आजकाल कशाप्रकारचं राजकारण केलं जात आहे आणि देश कसा बदलतोय याची चर्चा करतो," असं वाड्रा म्हणाले. तसंच राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना सद्यस्थिती पाहून भिती वाटते असंही ते म्हणाले. "आजकाल माध्यमांना खरी परिस्थिती दाखवायला भिती वाटते. हे सर्व लोकशाहीचा भाग नाही. या गोष्टी देशाला पुढे नेणाऱ्या नाही, त्या देशाला मागे घेऊन जातील," असंही त्यांनी स्पष्ट केलं. यावेळी प्रियंका गांधींच्या उत्तर प्रदेशातील कामगिरीवर बोलताना त्यांनी आपण त्यांना १० पैकी १० गुण देणार असल्याचं सांगितलं. त्यांनी दिवसरात्र एक करून काम केलं. आम्ही उत्तर प्रदेशचा जनादेश स्वीकार असल्याचं म्हणत लोकांच्या हितासाठी पूर्ण मेहनतीनं काम करत राहणार असल्याचं सांगितलं.

ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह"ईव्हीएमच्या बाबतीस सामान्यांच्या मनात जी शंका आहे ती जर दूर केली तर देशात राजकीय निकाल वेगळे दिसतील," असंही वाड्रा यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी कोरोनाच्या परिस्थितीवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. कोरोना काळात देशात अचानक लॉकडाऊन लावण्यात आला. सध्या बेरोजगारीही वाढत आहे. देशातील हिंदू मुस्लीम भेदभाव संपला पाहिजे आणि सर्वांच्या मतांचा समानतेनं आदर करत ते स्वीकारले पाहिजे असंही ते म्हणाले.

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीrobert vadraरॉबर्ट वाड्राcongressकाँग्रेसPoliticsराजकारणSonia Gandhiसोनिया गांधी