शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
2
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
3
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
4
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
5
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
6
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
7
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
8
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
9
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
10
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
11
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
12
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
13
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
14
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
15
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
16
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
17
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
18
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
19
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
20
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

त्याला देशाबाहेर पळू कोणी दिलं?; नीरव मोदीच्या अटकेवर प्रियांका गांधींचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2019 07:37 IST

नीरव मोदीच्या अटकेवरुन काँग्रेससह विरोधकांचा मोदी सरकारवर निशाणा

लखनऊ: पीएनबी घोटाळ्यातील प्रमुख आरोपी नीरव मोदीला काल लंडनमध्ये अटक झाली. यावरुन मोदी सरकार स्वत:ची पाठ थोपटून घेत असताना काँग्रेसनं सडकून टीका केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच ही कारवाई का होत आहे? असा सवाल काँग्रेससह विरोधकांनी उपस्थित केला आहे. नीरव मोदीला अटक झाली. हे यश आहे का? तो कुणामुळे पळून गेला होता?, असे सवाल काँग्रेस नेत्या प्रियंका गांधींनी उपस्थित केले आहेत. नीरव मोदीला काल लंडनमध्ये अटक करण्यात आली. त्यानंतर त्याला भारतात आणण्यात येणार असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली. नीरवला झालेली अटक म्हणजे मोदी सरकारचं मोठं यश असल्याचा दावा भाजपाकडून करण्यात आला. यावरुन प्रियंका गांधींनी सरकारवर तोंडसुख घेतलं. 'यात यश कसलं? त्याला भारताबाहेर कोणी जाऊ दिलं होतं?,' असे प्रश्न त्यांनी विचारले. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रियंका गांधी-वाड्रा उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी नीरव मोदीच्या अटकेवर भाष्य केलं. नीरव मोदीच्या अटकेचं श्रेय मोदी सरकारचं नाही, असंदेखील त्या म्हणाल्या. काँग्रेसचे वरिष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनीही नीरवच्या अटकेवरुन मोदी सरकारला लक्ष्य केलं. 'मोदी सरकारनंच नीरवला देश सोडून जाण्यात मदत केली आणि आता तेच त्याला परत आणण्याचा प्रयत्न करत आहेत. निवडणुकीसाठी या घडामोडी सुरू आहेत. निवडणूक झाल्यावर त्याला परत पाठवण्यात येईल,' असं आझाद म्हणाले. नीरवला लंडनमधील न्यायालयानं 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. नीरवनं न्यायालयाकडे जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र तो फेटाळून लावण्यात आला. नीरवला जामीन दिल्यास तो कदाचित न्यायालयाला शरण येणार नाही, असं जामीन अर्ज फेटाळताना न्यायमूर्तींनी म्हटलं. पीएनबीला 13,500 कोटी रुपयांचा चुना लावणाऱ्या नीरवला भारताच्या स्वाधीन करण्यात यावं, अशी मागणी मोदी सरकारकडून ब्रिटनकडे करण्यात आली आहे.  

टॅग्स :Nirav Modiनीरव मोदीPriyanka Gandhiप्रियंका गांधीcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीPunjab National Bank Scamपंजाब नॅशनल बँक घोटाळा