शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
4
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
5
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
6
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
7
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!
8
Gold Silver Price 18 September: अचानक का कमी होताहेत सोन्या-चांदीचे दर; पुढेही सुरू राहणार का ही घसरण?
9
१ महिना सूर्य-शनि समोरासमोर: ८ राशींना विशेष लाभ, भरभरून पद-पैसा; शुभ-कल्याण, सुखाचा काळ!
10
ऑनलाइन पद्धतीने मतदाराचे नाव मतदार यादीतून हटवता येते का? निवडणूक आयोग म्हणाले...
11
११ वर्षांनी लहान मुलाच्या प्रेमात पडली २८ वर्षांची तरुणी; लग्नाला नकार मिळाल्यावर मागू लागली ५० लाख!
12
Navi Mumbai: 'कपडे काढ नाहीतर तुझ्या भावालाच संपवेन'; 12 वर्षाच्या मुलीवर घरी नेऊन केला बलात्कार, नवी मुंबईतील घटना
13
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
14
"महाराष्ट्रातील मतचोरीचाही राहुल गांधींकडून पर्दाफाश, फडणविसांनी तात्काळ राजानीमा द्यावा’’, काँग्रेसची मागणी   
15
डॉक्टरांनी फ्लू सांगितलं पण आईने गुगलवर शोधलं; लेकाला गंभीर आजार असल्याचं समजलं अन्...
16
प्रिती झिंटाच्या संघाची उडाली दाणादाण; फलंदाजांनी केली हाराकिरी, फायनलचं स्वप्न भंगलं?
17
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
18
Lahori Zeera Success Story: १० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
19
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
20
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 

त्याला देशाबाहेर पळू कोणी दिलं?; नीरव मोदीच्या अटकेवर प्रियांका गांधींचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2019 07:37 IST

नीरव मोदीच्या अटकेवरुन काँग्रेससह विरोधकांचा मोदी सरकारवर निशाणा

लखनऊ: पीएनबी घोटाळ्यातील प्रमुख आरोपी नीरव मोदीला काल लंडनमध्ये अटक झाली. यावरुन मोदी सरकार स्वत:ची पाठ थोपटून घेत असताना काँग्रेसनं सडकून टीका केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच ही कारवाई का होत आहे? असा सवाल काँग्रेससह विरोधकांनी उपस्थित केला आहे. नीरव मोदीला अटक झाली. हे यश आहे का? तो कुणामुळे पळून गेला होता?, असे सवाल काँग्रेस नेत्या प्रियंका गांधींनी उपस्थित केले आहेत. नीरव मोदीला काल लंडनमध्ये अटक करण्यात आली. त्यानंतर त्याला भारतात आणण्यात येणार असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली. नीरवला झालेली अटक म्हणजे मोदी सरकारचं मोठं यश असल्याचा दावा भाजपाकडून करण्यात आला. यावरुन प्रियंका गांधींनी सरकारवर तोंडसुख घेतलं. 'यात यश कसलं? त्याला भारताबाहेर कोणी जाऊ दिलं होतं?,' असे प्रश्न त्यांनी विचारले. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रियंका गांधी-वाड्रा उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी नीरव मोदीच्या अटकेवर भाष्य केलं. नीरव मोदीच्या अटकेचं श्रेय मोदी सरकारचं नाही, असंदेखील त्या म्हणाल्या. काँग्रेसचे वरिष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनीही नीरवच्या अटकेवरुन मोदी सरकारला लक्ष्य केलं. 'मोदी सरकारनंच नीरवला देश सोडून जाण्यात मदत केली आणि आता तेच त्याला परत आणण्याचा प्रयत्न करत आहेत. निवडणुकीसाठी या घडामोडी सुरू आहेत. निवडणूक झाल्यावर त्याला परत पाठवण्यात येईल,' असं आझाद म्हणाले. नीरवला लंडनमधील न्यायालयानं 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. नीरवनं न्यायालयाकडे जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र तो फेटाळून लावण्यात आला. नीरवला जामीन दिल्यास तो कदाचित न्यायालयाला शरण येणार नाही, असं जामीन अर्ज फेटाळताना न्यायमूर्तींनी म्हटलं. पीएनबीला 13,500 कोटी रुपयांचा चुना लावणाऱ्या नीरवला भारताच्या स्वाधीन करण्यात यावं, अशी मागणी मोदी सरकारकडून ब्रिटनकडे करण्यात आली आहे.  

टॅग्स :Nirav Modiनीरव मोदीPriyanka Gandhiप्रियंका गांधीcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीPunjab National Bank Scamपंजाब नॅशनल बँक घोटाळा