शहरं
Join us  
Trending Stories
1
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
2
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
3
Grand Vitara-Hyryder चे वर्चस्व धोक्यात; 28.65 Kmpl मायलेज देणारी Hybrid SUV ठरली गेमचेंजर
4
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
5
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
6
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
7
भारतानंतर आता दक्षिण आफ्रिकेनेही सुरू केली बांग्लादेशी घुसखोरांविरुद्ध हद्दपारीची मोहीम
8
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
9
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
10
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
11
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
Daily Top 2Weekly Top 5

प्रियंका गांधी म्हणाल्या, 'मी शिवस्तोत्र म्हणून आलेय'; लोकसभेत नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 16:59 IST

Priyanka Gandhi Speech: प्रियंका गांधींनी ऑपरेशन सिंदूरवर सुरू असलेल्या चर्चेत सहभाग घेतला. भाषण सुरू असताना सत्ताधारी खासदारांनी त्यांना टोकलं. त्यावर त्यांनी उत्तर दिलं. 

Priyanka Gandhi Speech on Operation Sindoor: पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल अनेक प्रश्न उपस्थित करत प्रियंका गांधी यांनी मोदी सरकारवर हल्ला चढवला. मुंबई हल्ल्याचा हवाला देत प्रियंका गांधींनी सरकारच्या उत्तरदायीत्वावर बोट ठेवले. प्रियंका गांधींनी पहलगाममध्ये मारल्या गेल्या पर्यटकांबद्दल उल्लेख केला. तेव्हा सत्ताधारी बाकावरील खासदारांनी त्यांना टोकलं. त्यावर प्रियंका गांधी म्हणाल्या, मी आजही शिवस्तोत्र वाचून आले आहे.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

लोकसभेत बोलताना प्रियंका गांधी म्हणाल्या, "26 जण मारले गेले. पती, मुलांचा मृत्यू झाला. मेलेले भारतीय होते." त्यावेळी सत्ताधारी बाकावरील खासदार म्हणाले, "हिंदू."

सत्ताधारी खासदारांनी हिंदू म्हटल्यानंतर प्रियंका गांधी म्हणाल्या, "मी आजही शिवतांडव स्तोत्र म्हणून आले आहे."

प्रियंका गांधी म्हणाल्या, मी वर्तमानाबद्दल बोलतेय

खासदार प्रियंका गांधी बोलत असताना काही खासदारांनी काँग्रेस सरकारच्या काळातील मुद्दा मांडला. त्यावर प्रियंका गांधी म्हणाल्या, 'तुम्ही इतिहासाबद्दल बोलत रहा. मी वर्तमानबद्दल बोलत राहीन. पहलगाम हल्ल्याची जबाबदारी का घेतली गेली नाही? गृहमंत्र्यांचा राजीनामा का घेतला गेला नाही?', असा सवाल प्रियंका गांधींनी केला. 

अमित शाह हसत होते

"तुम्ही ११ वर्षे सत्तेत आहात, जबाबदारी घ्यायला हवी. काल मी पाहत होते, गौरव गोगोई यांनी जबाबदारीबद्दल बोलताना राजनाथ सिंह मान हलवत होते, पण गृहमंत्री अमित शाह हसत होते. उरी-पुलवामाच्या वेळी राजनाथ सिंह गृहमंत्री होते, आज ते संरक्षणमंत्री आहेत. अमित शाहांच्या काळात मणिपूर जळत आहे, दिल्लीत दंगली झाल्या, पहलगाम घडले आणि आजही ते गृहमंत्री आहेत. त्यांचा राजीनामा का घेतला नाही?", असे प्रियंका गांधी म्हणाल्या.

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीOperation Sindoorऑपरेशन सिंदूरPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाMonsoon Session Of Parliamentसंसेदेचे पावसाळी अधिवेशनBJPभाजपा