शहरं
Join us  
Trending Stories
1
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
2
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
3
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
4
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
5
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
6
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
7
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
8
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?
9
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
10
Nag Panchami 2025 Upvas: भावाच्या रक्षणासाठी करतात नागपंचमीचा उपास; पूजेच्या वेळी टाळा 'ही' एक चूक!
11
बाजार २ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर! सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, पण 'या' शेअरने दिला छप्परफाड परतावा!
12
₹३०० वरुन १ रुपयांवर आला 'हा' शेअर; विक्रीसाठी गुंतवणुकदारांची रांग, नकारात्मक बातमीचा परिणाम
13
Mumbai Local: पाऊस नसतानाही लोकलमधून छत्री घेऊन प्रवास, पण कारण काही वेगळच!
14
पहलगाम हल्ल्यातील मास्टरमाईंडचा खात्मा, एन्काऊंटरचे फोटो समोर, मिळाली धक्कादायक माहिती
15
सेल्फी अन् रीलचा नाद लय बेक्कार! काही सेकंदांचं वेड करतंय जीवाशी खेळ; फुकट जातोय वेळ...
16
नवीन कर प्रणालीतही टॅक्स वाचवता येतो! NPS, EPF पासून ते 'या' खास पर्यायांपर्यंत, बचत करण्याचे ७ प्रभावी मार्ग!
17
रायगड बोट दुर्घटनेत बेपत्ता झालेल्या ३ मच्छिमारांचे मृतदेह सापडले!
18
ऐकावं ते नवलच! नाव डॉग बाबू, वडील कुत्ता बाबू अन् आई कुटिया देवी; कुत्र्यासाठी बनवले रहिवासी प्रमाणपत्र
19
गुंतवणुकीसाठी बेस्ट आहे 'ही' सरकारी स्कीम; एकदा गुंतवणूक करा आणि दरवर्षी मिळवा २ लाखांचं फिक्स व्याज
20
दहशतवादी पहलगाममध्ये घुसलेच कसे? PoK का घेतले नाही? काँग्रेसचा सरकारवर हल्लाबोल

UP Assembly Election 2022 : प्रचारासाठी पोहोचल्या प्रियंका गांधी, पक्षाचा उमेदवार 'बेपत्ता'; म्हणाल्या, 'हद्द झाली!'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2022 13:59 IST

UP Assembly Election 2022 : काँग्रेसचे उमेदवार जाहीर सभेदरम्यान अचानक बेपत्ता झाले. त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या नेत्या प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांना आज मंचावर अस्वस्थ स्थितीला सामोरे जावे लागले. 

रामपूर : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या (UP Election 2022) पहिल्या टप्प्यातील 58 जागांसाठी मतदान सुरू आहे. तर दुसऱ्या टप्प्यासाठी निवडणूक प्रचार सुरू आहे. निवडणूक प्रचारादरम्यान एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान, काँग्रेसचे उमेदवार जाहीर सभेदरम्यान अचानक बेपत्ता झाले. त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या नेत्या प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांना आज मंचावर अस्वस्थ स्थितीला सामोरे जावे लागले. 

'कुठे गेले, हद्द झाली!'रामपूरच्या निवडणूक रॅलीत प्रियांका गांधी आपल्या पक्षासाठी मतं मागण्यासाठी मंचावर पोहोचल्या. त्यावेळी त्यांना आपला उमेदवार दिसला नाही, तेव्हा त्या चिंतेत दिसून आल्या. त्यांना आधी वाटलं इथेच कुठेतरी असतील, पण बराच वेळ काँग्रेस उमेदवार एकलव्य पोहोचले नाहीत. तेव्हा प्रियंका गांधी म्हणाल्या, कुठे गेले…अरे कुठे गेले, हद्द झाली!

काही वेळानंतर उमेदवार मंचावरथोड्या वेळाने उमेदवार एकलव्य मंचावर आले, तेव्हा प्रियंका गांधी म्हणाल्या, 'कमाल आहे'. त्याचवेळी हात जोडून शाहबाद मतदारसंघातील पक्षाचे उमेदवार एकलव्य यांनी प्रियंका गांधी यांना हात जोडून नमस्कार केला.

रामपूरमध्ये प्रियंका गांधींचे स्वागतदरम्यान, प्रियंका गांधी यांचे रामपूरमध्ये आगमन होताच रामपूर शहर विधानसभेचे उमेदवार नावेद मियाँ आणि बेगम बानो यांनी त्यांचे स्वागत केले. याच कार्यक्रमात त्यांना शाहबाद मतदारसंघाचे उमेदवार एकलव्य यांचीही भेट घ्यायची होती. एकलव्य यांच्या विधानसभा मतदारसंघात प्रियंका गांधींच्या रोड शोचा कार्यक्रम झाला नाही. त्यामुळे एकलव्य यांना रामपूर शहरात येऊन त्यांच्या ताफ्यासह जायचे होते.

काँग्नेसच्या नशिबात सत्ता लिहिलेली नाही - पंतप्रधान मोदीदुसरीकडे, उत्तर प्रदेश विभानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सहारनपूर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी उत्तर प्रदेशातील काही मतदारसंघांमध्ये पहिल्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. हिवाळ्यात सकाळी लोक मोठ्या संख्येने मतदान करणार आहेत,याचा मला आनंद आहे. या सर्व मतदारांचे मी कौतुक करतो. भाजप यूपीचे 'घोषणा पत्र' हा कल्याणाचा ठराव आहे, असे नरेंद्र मोदी म्हणाले. तसेच, काँग्रेसवर (Congress) सडकून टीका केली. ते म्हणाले, "मी आजकाल पाहतोय की काही अत्यंत कुटुंबवादी लोक जनतेला सतत पोकळ आश्वासने देत आहेत. मात्र त्यांना माहीत आहे की, त्यांचे जुने कारनामे आठवून उत्तर प्रदेशातील जनता त्यांना पुन्हा कधीही येऊ देणार नाही. त्यांच्या नशिबात सत्ता लिहिलेली नाही, उत्तर प्रदेशच्या जनतेने त्यांना नाकारले".

टॅग्स :Uttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२Priyanka Gandhiप्रियंका गांधीcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदी