शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

UP Assembly Election 2022 : प्रचारासाठी पोहोचल्या प्रियंका गांधी, पक्षाचा उमेदवार 'बेपत्ता'; म्हणाल्या, 'हद्द झाली!'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2022 13:59 IST

UP Assembly Election 2022 : काँग्रेसचे उमेदवार जाहीर सभेदरम्यान अचानक बेपत्ता झाले. त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या नेत्या प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांना आज मंचावर अस्वस्थ स्थितीला सामोरे जावे लागले. 

रामपूर : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या (UP Election 2022) पहिल्या टप्प्यातील 58 जागांसाठी मतदान सुरू आहे. तर दुसऱ्या टप्प्यासाठी निवडणूक प्रचार सुरू आहे. निवडणूक प्रचारादरम्यान एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान, काँग्रेसचे उमेदवार जाहीर सभेदरम्यान अचानक बेपत्ता झाले. त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या नेत्या प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांना आज मंचावर अस्वस्थ स्थितीला सामोरे जावे लागले. 

'कुठे गेले, हद्द झाली!'रामपूरच्या निवडणूक रॅलीत प्रियांका गांधी आपल्या पक्षासाठी मतं मागण्यासाठी मंचावर पोहोचल्या. त्यावेळी त्यांना आपला उमेदवार दिसला नाही, तेव्हा त्या चिंतेत दिसून आल्या. त्यांना आधी वाटलं इथेच कुठेतरी असतील, पण बराच वेळ काँग्रेस उमेदवार एकलव्य पोहोचले नाहीत. तेव्हा प्रियंका गांधी म्हणाल्या, कुठे गेले…अरे कुठे गेले, हद्द झाली!

काही वेळानंतर उमेदवार मंचावरथोड्या वेळाने उमेदवार एकलव्य मंचावर आले, तेव्हा प्रियंका गांधी म्हणाल्या, 'कमाल आहे'. त्याचवेळी हात जोडून शाहबाद मतदारसंघातील पक्षाचे उमेदवार एकलव्य यांनी प्रियंका गांधी यांना हात जोडून नमस्कार केला.

रामपूरमध्ये प्रियंका गांधींचे स्वागतदरम्यान, प्रियंका गांधी यांचे रामपूरमध्ये आगमन होताच रामपूर शहर विधानसभेचे उमेदवार नावेद मियाँ आणि बेगम बानो यांनी त्यांचे स्वागत केले. याच कार्यक्रमात त्यांना शाहबाद मतदारसंघाचे उमेदवार एकलव्य यांचीही भेट घ्यायची होती. एकलव्य यांच्या विधानसभा मतदारसंघात प्रियंका गांधींच्या रोड शोचा कार्यक्रम झाला नाही. त्यामुळे एकलव्य यांना रामपूर शहरात येऊन त्यांच्या ताफ्यासह जायचे होते.

काँग्नेसच्या नशिबात सत्ता लिहिलेली नाही - पंतप्रधान मोदीदुसरीकडे, उत्तर प्रदेश विभानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सहारनपूर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी उत्तर प्रदेशातील काही मतदारसंघांमध्ये पहिल्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. हिवाळ्यात सकाळी लोक मोठ्या संख्येने मतदान करणार आहेत,याचा मला आनंद आहे. या सर्व मतदारांचे मी कौतुक करतो. भाजप यूपीचे 'घोषणा पत्र' हा कल्याणाचा ठराव आहे, असे नरेंद्र मोदी म्हणाले. तसेच, काँग्रेसवर (Congress) सडकून टीका केली. ते म्हणाले, "मी आजकाल पाहतोय की काही अत्यंत कुटुंबवादी लोक जनतेला सतत पोकळ आश्वासने देत आहेत. मात्र त्यांना माहीत आहे की, त्यांचे जुने कारनामे आठवून उत्तर प्रदेशातील जनता त्यांना पुन्हा कधीही येऊ देणार नाही. त्यांच्या नशिबात सत्ता लिहिलेली नाही, उत्तर प्रदेशच्या जनतेने त्यांना नाकारले".

टॅग्स :Uttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२Priyanka Gandhiप्रियंका गांधीcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदी