शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
3
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
4
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
5
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
6
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
7
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
8
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
9
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
10
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
11
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
12
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
13
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
14
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
15
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
16
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
17
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
18
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
19
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
20
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल

UP Assembly Election 2022 : प्रचारासाठी पोहोचल्या प्रियंका गांधी, पक्षाचा उमेदवार 'बेपत्ता'; म्हणाल्या, 'हद्द झाली!'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2022 13:59 IST

UP Assembly Election 2022 : काँग्रेसचे उमेदवार जाहीर सभेदरम्यान अचानक बेपत्ता झाले. त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या नेत्या प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांना आज मंचावर अस्वस्थ स्थितीला सामोरे जावे लागले. 

रामपूर : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या (UP Election 2022) पहिल्या टप्प्यातील 58 जागांसाठी मतदान सुरू आहे. तर दुसऱ्या टप्प्यासाठी निवडणूक प्रचार सुरू आहे. निवडणूक प्रचारादरम्यान एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान, काँग्रेसचे उमेदवार जाहीर सभेदरम्यान अचानक बेपत्ता झाले. त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या नेत्या प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांना आज मंचावर अस्वस्थ स्थितीला सामोरे जावे लागले. 

'कुठे गेले, हद्द झाली!'रामपूरच्या निवडणूक रॅलीत प्रियांका गांधी आपल्या पक्षासाठी मतं मागण्यासाठी मंचावर पोहोचल्या. त्यावेळी त्यांना आपला उमेदवार दिसला नाही, तेव्हा त्या चिंतेत दिसून आल्या. त्यांना आधी वाटलं इथेच कुठेतरी असतील, पण बराच वेळ काँग्रेस उमेदवार एकलव्य पोहोचले नाहीत. तेव्हा प्रियंका गांधी म्हणाल्या, कुठे गेले…अरे कुठे गेले, हद्द झाली!

काही वेळानंतर उमेदवार मंचावरथोड्या वेळाने उमेदवार एकलव्य मंचावर आले, तेव्हा प्रियंका गांधी म्हणाल्या, 'कमाल आहे'. त्याचवेळी हात जोडून शाहबाद मतदारसंघातील पक्षाचे उमेदवार एकलव्य यांनी प्रियंका गांधी यांना हात जोडून नमस्कार केला.

रामपूरमध्ये प्रियंका गांधींचे स्वागतदरम्यान, प्रियंका गांधी यांचे रामपूरमध्ये आगमन होताच रामपूर शहर विधानसभेचे उमेदवार नावेद मियाँ आणि बेगम बानो यांनी त्यांचे स्वागत केले. याच कार्यक्रमात त्यांना शाहबाद मतदारसंघाचे उमेदवार एकलव्य यांचीही भेट घ्यायची होती. एकलव्य यांच्या विधानसभा मतदारसंघात प्रियंका गांधींच्या रोड शोचा कार्यक्रम झाला नाही. त्यामुळे एकलव्य यांना रामपूर शहरात येऊन त्यांच्या ताफ्यासह जायचे होते.

काँग्नेसच्या नशिबात सत्ता लिहिलेली नाही - पंतप्रधान मोदीदुसरीकडे, उत्तर प्रदेश विभानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सहारनपूर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी उत्तर प्रदेशातील काही मतदारसंघांमध्ये पहिल्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. हिवाळ्यात सकाळी लोक मोठ्या संख्येने मतदान करणार आहेत,याचा मला आनंद आहे. या सर्व मतदारांचे मी कौतुक करतो. भाजप यूपीचे 'घोषणा पत्र' हा कल्याणाचा ठराव आहे, असे नरेंद्र मोदी म्हणाले. तसेच, काँग्रेसवर (Congress) सडकून टीका केली. ते म्हणाले, "मी आजकाल पाहतोय की काही अत्यंत कुटुंबवादी लोक जनतेला सतत पोकळ आश्वासने देत आहेत. मात्र त्यांना माहीत आहे की, त्यांचे जुने कारनामे आठवून उत्तर प्रदेशातील जनता त्यांना पुन्हा कधीही येऊ देणार नाही. त्यांच्या नशिबात सत्ता लिहिलेली नाही, उत्तर प्रदेशच्या जनतेने त्यांना नाकारले".

टॅग्स :Uttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२Priyanka Gandhiप्रियंका गांधीcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदी