शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

'राहुल गांधी संविधानासाठी लढतात, म्हणून सरकार त्यांना घाबरते', प्रियांका गांधींची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 20:11 IST

Priyanka Gandhi : '2024 च्या लोकसभा निवडणुकीत देशातील जनतेने भाजपला धडा शिकवला, त्यामुळे मोदीजी घाबरले.'

Priyanka Gandhi :काँग्रेस खासदार प्रियांका गांधींनी मंगळवारी(21 जानेवारी) भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (RSS) जोरदार टीका केली. भाजप आणि आरएसएसची भ्याड विचारधारा आहे, असा आरोप त्यांनी केला. जय बापू, जय भीम, जय संविधान रॅलीला संबोधित करताना प्रियंकांनी दावा केला की, राहुल गांधी संविधानासाठी लढत असल्याने केंद्र सरकार त्यांना घाबरते. देशासाठी बलिदान देण्याचा विचार काँग्रेसच्या मनात आहे, असेही त्या यावेळी म्हणाल्या. 

कर्नाटकातील बेळगावी येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना प्रियांका गांधी म्हणाल्या की, संविधान हे फक्त पुस्तक नसून, लोकांचे संरक्षण कवच आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लोकशाहीचा त्यात समावेश केला. बाबासाहेब सामाजिक न्याय आणि हक्काचे प्रतीक आहेत. अनेक सरकारे आली आणि गेली, पण असे एकही सरकार आले नाही, ज्यांच्या गृहमंत्र्यांनी संसदेत बाबासाहेबांचा अपमान केला असेल, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

या विचारसरणीने संविधानाच्या विरोधात प्रचार केलाप्रियांका गांधी पुढे म्हणाल्या, स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षांनंतरही 1947 मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळाले नाही, अशी वक्तव्ये केली जातात, याची कोणी कल्पनाही करू शकत नाही. संविधान बनवतानाही आरएसएसच्या विचारसरणीने अपमान केला होता. या विचारसरणीने संविधानाच्या विरोधात मोहीम उघडली होती. देशाच्या गृहमंत्र्यांनी बाबासाहेबांचा आणि लोकशाहीचा अपमान केला आहे. स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्यांचा अपमान झाला आहे.

सरकार राहुल गांधींना घाबरते2024 च्या लोकसभा निवडणुकीत देशातील जनतेने भाजपला धडा शिकवला, त्यामुळे मोदीजी घाबरले. निवडणुकीनंतर संसदेत गेल्यावर त्यांनी लगेच संविधानाला अभिवादन केले. पण, राहुल गांधी रोज संविधानासाठी लढतात. यासाठी ते प्राणाची आहुती देण्यास तयार आहेत. त्यामुळेच हे सरकार राहुल गांधींना घाबरते. त्यांना पाहून सरकार थरथर कापते, अशी टीकाही प्रियंकांनी यावेळी केली. 

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीRahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेस