शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

GST म्हणजे ‘गृहस्थी सत्यानाश टैक्स’, करप्रणालीवरुन प्रियंका गांधींचा केंद्र सरकारवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 20:58 IST

Priyanka Gandhi on GST : देशातील करप्रणालीवरुन प्रियंका गांधींनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.

Priyanka Gandhi on GST : काँग्रेस खासदार प्रियांका गांधी यांनी देशातील महागाई आणि करप्रणालीवर प्रश्न उपस्थित करत केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. एका एक्स पोस्टमध्ये त्या म्हणतात, 'कॉर्पोरेट्सना लाखो कोटींचे जीवनदान देणारे भाजप सरकार गरीब आणि मध्यमवर्गीयांकडून जीवन विमा आणि आयुष्यातील मूलभूत गरजांवरही कर वसूल करत आहे. सामान्यांसाठी GST चा अर्थ 'गृहस्थी सत्यानाश टैक्स' झाला आहे.'

याच पोस्टमध्ये प्रियंका गांधी पुढे म्हणतात, 'एका रिपोर्टनुसार, एकूण जीएसटीपैकी 90 टक्के गरीब आणि मध्यमवर्गीयांकडून वसूल केला जात आहे. तर जीएसटीमध्ये सर्वाधिक उत्पन्न असलेल्या 10 टक्के लोकसंख्येचे योगदान केवळ 3 टक्के आहे. कॉर्पोरेट कराचा दर 30% वरुन 22% केला आणि गरीब लोकांकडून रोटी-डाळवरही कर वसुली केली जात आहे.'

भारतात सध्या 7 प्रकारचे कर चालू यासोबतच काँग्रेस पक्षाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वरील आपल्या एका पोस्टमध्ये म्हटले की, 'कर प्रक्रिया सुलभ करण्यासाठी जीएसटी आणण्यात आला होता, परंतु असे काहीही झाले नाही. जगातील इतर देशांमध्ये एक किंवा दोन प्रकारचे कर आहेत, परंतु भारतात सध्या सुमारे 7 प्रकारचे कर आहेत. जीएसटीचे सरलीकरण देशासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. जीएसटीच्या नावाखाली सरकारने ज्या प्रकारे गरिबांवर बोजा लादला आहे, त्याला आमचा विरोध आहे.'

मल्लिकार्जुन खरगेंची टीकाकाँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, यांनीदेखील कर वसुलीवरुन भाजपवर निशाणा साधला. "गब्बर सिंह टैक्स" म्हणा, "गृहस्थी सत्यानाश टैक्स" म्हणा, किंवा "Give Sitharaman Tax" म्हणा...भाजपच्या GST ला काहीही नाव द्या, एक गोष्ट पक्की आहे. मोदी सरकारने GST ला गरीब आणि मध्यम वर्गाची कमाई लुटण्याचे साधन बनवले आहे. आगामी सर्वसाधारण अर्थसंकल्पात मोदी सरकारने हा कर दहशतवाद आणि जनतेची लूट थांबवावी, अशी काँग्रेस पक्षाची मागणी आहे.'

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीGSTजीएसटीBJPभाजपा