शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

GST म्हणजे ‘गृहस्थी सत्यानाश टैक्स’, करप्रणालीवरुन प्रियंका गांधींचा केंद्र सरकारवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 20:58 IST

Priyanka Gandhi on GST : देशातील करप्रणालीवरुन प्रियंका गांधींनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.

Priyanka Gandhi on GST : काँग्रेस खासदार प्रियांका गांधी यांनी देशातील महागाई आणि करप्रणालीवर प्रश्न उपस्थित करत केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. एका एक्स पोस्टमध्ये त्या म्हणतात, 'कॉर्पोरेट्सना लाखो कोटींचे जीवनदान देणारे भाजप सरकार गरीब आणि मध्यमवर्गीयांकडून जीवन विमा आणि आयुष्यातील मूलभूत गरजांवरही कर वसूल करत आहे. सामान्यांसाठी GST चा अर्थ 'गृहस्थी सत्यानाश टैक्स' झाला आहे.'

याच पोस्टमध्ये प्रियंका गांधी पुढे म्हणतात, 'एका रिपोर्टनुसार, एकूण जीएसटीपैकी 90 टक्के गरीब आणि मध्यमवर्गीयांकडून वसूल केला जात आहे. तर जीएसटीमध्ये सर्वाधिक उत्पन्न असलेल्या 10 टक्के लोकसंख्येचे योगदान केवळ 3 टक्के आहे. कॉर्पोरेट कराचा दर 30% वरुन 22% केला आणि गरीब लोकांकडून रोटी-डाळवरही कर वसुली केली जात आहे.'

भारतात सध्या 7 प्रकारचे कर चालू यासोबतच काँग्रेस पक्षाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वरील आपल्या एका पोस्टमध्ये म्हटले की, 'कर प्रक्रिया सुलभ करण्यासाठी जीएसटी आणण्यात आला होता, परंतु असे काहीही झाले नाही. जगातील इतर देशांमध्ये एक किंवा दोन प्रकारचे कर आहेत, परंतु भारतात सध्या सुमारे 7 प्रकारचे कर आहेत. जीएसटीचे सरलीकरण देशासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. जीएसटीच्या नावाखाली सरकारने ज्या प्रकारे गरिबांवर बोजा लादला आहे, त्याला आमचा विरोध आहे.'

मल्लिकार्जुन खरगेंची टीकाकाँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, यांनीदेखील कर वसुलीवरुन भाजपवर निशाणा साधला. "गब्बर सिंह टैक्स" म्हणा, "गृहस्थी सत्यानाश टैक्स" म्हणा, किंवा "Give Sitharaman Tax" म्हणा...भाजपच्या GST ला काहीही नाव द्या, एक गोष्ट पक्की आहे. मोदी सरकारने GST ला गरीब आणि मध्यम वर्गाची कमाई लुटण्याचे साधन बनवले आहे. आगामी सर्वसाधारण अर्थसंकल्पात मोदी सरकारने हा कर दहशतवाद आणि जनतेची लूट थांबवावी, अशी काँग्रेस पक्षाची मागणी आहे.'

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीGSTजीएसटीBJPभाजपा