शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
3
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
4
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
5
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
6
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
7
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
8
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
9
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
10
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
11
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
12
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
13
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
14
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
15
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
16
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
17
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
18
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
19
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
20
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?

2022 मध्ये प्रियंका गांधी बनू शकतात काँग्रेसच्या उत्तर प्रदेशमधील मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2019 10:52 IST

प्रियंका गांधी यांच्या सक्रिय राजकारणात प्रवेश करण्याची घोषणा झाल्यानंतर देशभरातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वारे वाहू लागले आहेत.

ठळक मुद्दे प्रियंका गांधी यांच्या सक्रिय राजकारणात प्रवेश करण्याची घोषणा झाल्यानंतर देशभरातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वारे वाहू लागले आहेत.लोकसभा आणि विधानभेतील जागांच्या दृष्टीने देशातील सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये प्रियंका गांधी यांच्या आगमनामुळे पक्षाला गतवैभव मिळेल, अशी काँग्रेसला अपेक्षा आहे. आपल्या पारंपरिक सवर्ण मतदारांना पुन्हा एकदा पक्षाकडे खेचण्यासाठी 2022 मध्ये उत्तर प्रदेशमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार म्हणून प्रियंका गांधी यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे. 

लखनौ - प्रियंका गांधी यांच्या सक्रिय राजकारणात प्रवेश करण्याची घोषणा झाल्यानंतर देशभरातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वारे वाहू लागले आहेत. त्यातच लोकसभा आणि विधानभेतील जागांच्या दृष्टीने देशातील सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशमध्येप्रियंका गांधी यांच्या आगमनामुळे पक्षाला गतवैभव मिळेल, अशी काँग्रेसला अपेक्षा आहे. आता राज्यातील आपल्या पारंपरिक सवर्ण मतदारांना पुन्हा एकदा पक्षाकडे खेचण्यासाठी मोठी खेळी खेळण्याची तयारी काँग्रेसने केली असून, 2022 मध्ये उत्तर प्रदेशमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार म्हणून प्रियंका गांधी यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी आजपासून उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. प्रियंका गांधी यांचा सक्रीय राजकारणातील प्रवेश हा लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून झाला असल्याचे बोलले जात असले तरी प्रत्यक्षात 2022 मध्ये राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर पक्षाची नजर आहे. तसेच या निवडणुकीसाठी प्रियंका यांना मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार बनवण्यासाठी पक्ष प्रयत्नशील आहे. प्रियंका गांधी यांच्या सोमवारी होणाऱ्या रोड शो पूर्वी काही काँग्रेसी नेत्यांनी तसे संकेतही दिले आहेत. दरम्यान, एकेकाळी उत्तर प्रदेशमध्ये एकहाती वर्चस्व राखणाऱ्या काँग्रेसची सध्या बिकट अवस्था झाली आहे. 2017 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला केवळ 7 जागांवर विजय मिळाला होता. 1989 नंतर पक्ष उत्तर प्रदेशमधील सत्तेतून बाहेर आहे. त्यामुळे प्रियंका गांधी यांना चेहरा म्हणून समोर आणले तर पक्षाला संजीवनी मिळेल, अशी अपेक्षा काँग्रेस नेत्यांना आहे. 

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीUttar Pradeshउत्तर प्रदेशcongressकाँग्रेसPoliticsराजकारण