शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

सोनभद्र हत्याकांड: प्रियंका गांधी पोलिसांच्या ताब्यात, यूपीतील राजकारण तापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2019 14:21 IST

उत्तर प्रदेशमध्ये सोनभद्र जिल्ह्यातील हत्याकांड प्रकरणावरून राजकीय वातावरण तापले आहे.

लखनऊ : उत्तर प्रदेशमध्ये सोनभद्र जिल्ह्यातील हत्याकांड प्रकरणावरून राजकीय वातावरण तापले आहे. काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी यांनी आज वाराणसीत जाऊन याप्रकरणातील जखमींची भेट घेतली. त्यानंतर  प्रियंका गांधी सोनभद्रला जात असतानाच, त्यांचा वाहनताफा पोलिसांकडून अडविण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी त्यांना आपल्या ताब्यात घेतले आणि चुनार गेस्ट हाऊसला नेले. याविरोधात प्रियंका गांधी यांनी आपल्या समर्थकांसह धरणे धरले आहे. 

 

'आम्ही फक्त पीडित कुटुंबीयांची भेट घेणार आहेत. माझ्यासोबत फक्त चार जण असतील असेही सांगितले होते. तरीही प्रशासन आम्हाला त्याठिकाणी जाऊ देत नाही. आम्हाला का अडवले आहे, त्याचे त्यांनी द्यायलाच हवे.' असे यावेळी प्रियंका गांधी यांनी सांगितले. याशिवाय, मला कुठे घेऊन जात आहेत याची कल्पना नाही. पण जिथे घेऊन जातील तिथे जायला मी तयार आहे. तुम्हाला काय करायचे आहे, ते करा आता झुकणार नाही, असेही प्रियंका गांधी यांनी सांगितले. 

दरम्यान, सोनभद्र या ठिकाणी जमिनीच्या वादातून 10 जणांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या प्रकरणात मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांची भेट घेण्यासाठी प्रियंका गांधी सोनभद्रला निघाल्या होत्या. त्यावेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. सोनभद्र या ठिकाणी कलम 144 अर्थात जमावबंदी संदर्भातले कलमही लागू करण्यात आले आहे. 

टॅग्स :Sonbhadra Shootoutसोनभद्र हत्याकांडUttar Pradeshउत्तर प्रदेशPriyanka Gandhiप्रियंका गांधी