शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

"देश-विदेशात फिरण्यासाठी मोदी १६ हजार कोटींची विमानं घेतात, पण शेतकऱ्यांना द्यायला त्यांच्याकडे पैसा नाही"

By देवेश फडके | Updated: February 15, 2021 16:07 IST

उत्तर प्रदेशमधील बिजनौर येथे किसान महापंचयातीला संबोधित करताना काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

ठळक मुद्देप्रियंका गांधींची भाजप सरकारवर जोरदार टीकाकृषी कायदे मागे घेण्याच्या मागणीचा पुनरुच्चारपंतप्रधान मोदींवरही केली टीका

बिजनौर : उत्तर प्रदेशमधील बिजनौर येथे किसान महापंचयातीला संबोधित करताना काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दोनवेळा देशवासीयांनी निवडून दिले. मात्र, जनतेच्या अपेक्षा पूर्ण करू शकले नाहीत. त्यांनी वारंवार रोजगार, शेतकऱ्यांच्या मुद्दे उपस्थित केले. परंतु, त्यांच्या राज्यात यासंदर्भात काहीच होताना दिसत नाही, असा आरोप प्रियंका गांधी यांनी यावेळी बोलताना केला. (priyanka gandhi criticised modi govt on farmers protest at bijnor kisan mahapanchayat)

उत्तर प्रदेशमधील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आतापासूनच कंबर कसली आहे. उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसची ताकद वाढवण्यासाठी प्रियंका गांधी मैदानात उतरल्या असून, त्या ठिकठिकाणी किसान महापंचायतीत सहभागी होऊन मोर्चा सांभाळत असल्याचे दिसत आहे. बिजनौर येथील महापंचायतमध्ये बोलताना त्या म्हणाल्या की, सन २०१७ पासून उसाचा दर वाढवण्यात आलेला नाही. शेतकऱ्यांची देणी मोदी सरकारने दिली नाहीत. मोदी सरकार १६ हजार कोटी रुपयांची विमाने खरेदी करू शकतात. मात्र, शेतकऱ्यांसाठी काही करत नाहीत, असा दावा प्रियंका गांधी यांनी केला आहे. 

कृषी कायदे उद्योगपतींसाठी

उद्योगपतींचा फायदा होण्यासाठी केंद्रीय कृषी कायदे तयार करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांचे पीक घ्यायचे की नाही, हे आता उद्योगपती ठरवणार आहेत. उद्योगपतींचे भले करण्यासाठी मोदी सरकार काम करत आहे. मात्र, शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकायला मोदी सरकारकडे वेळ नाही, अशी टीका प्रियंका गांधी यांनी केली. 

दिशा रविला पाकिस्तानचा पाठिंबा; मोदी सरकारवर केली जोरदार टीका

शेतकऱ्यांच्या भेटीसाठी वेळ नाही

पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका, चीन आणि पाकिस्तानच्या दौऱ्यावर जातात. मात्र, दिल्ली सीमेवरील शेतकऱ्यांची भेट घेण्यासाठी जात नाहीत. पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांची चेष्टा केली आहे. शेतकऱ्यांना आंदोलनजीवी, परजीवी म्हणाले. पंतप्रधान मोदींना देशभक्त आणि देशद्रोही यातील अंतर समजले नाही, असे प्रियंका गांधी यांनी सांगितले. 

कृषी कायदे मागे घ्या

पंतप्रधान मोदी, तुम्ही सत्तेत आहात. शेतकऱ्यांचा आदर करा. शेतकऱ्यांवर अन्याय करणारे कृषी कायदे मागे घ्या, या मागणीचा पुनरुच्चार प्रियंका गांधी यांनी यावेळी बोलताना केला. मोदी सरकारच्या कार्यकाळात गरिबांचे, शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले. श्रीमंतांची संपत्ती मात्र दुप्पट झाली, असा दावा करत शेतकरी आंदोलनात मृत्यू झालेल्यांविषयी सहवेदना प्रकट करून दोन मिनिटांचे मौन पाळण्यात आले. 

टॅग्स :PoliticsराजकारणPriyanka Gandhiप्रियंका गांधीcongressकाँग्रेसFarmers Protestशेतकरी आंदोलनBJPभाजपा