शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
2
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
3
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
4
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
5
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
6
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
7
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
8
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
9
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
10
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
11
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
12
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
13
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
14
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
15
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
16
VIDEO: अरे देवा... माकडाने ट्रेकरला मध्येच गाठलं, आधी बॅग उचकली, मग पाठीवर चढलं अन् मग...
17
धक्कादायक! या डेटिंग ॲपवरून महिलांचे हजारो फोटो लीक, प्रायव्हसी आली धोक्यात
18
'संपत्तीचे पुरावे देतो चौकशी करा'; एकनाथ खडसे म्हणाले, 'महिलांबाबत गिरीश महाजनांचे नाव पुढे का येतं?'
19
फणस खाणं महागात पडलं, ड्रिंक अँड ड्राइव्हमध्ये पकडलं; चालकांसोबत नेमकं काय घडलं?
20
१ ऑगस्टपासून लागू होणार नवे नियम, क्रेडिट कार्ड, यूपीआय, एलपीजीसह होणार हे ६ बदल, खबरदारी न घेतल्यास खिसा होणार रिकामा

"देश-विदेशात फिरण्यासाठी मोदी १६ हजार कोटींची विमानं घेतात, पण शेतकऱ्यांना द्यायला त्यांच्याकडे पैसा नाही"

By देवेश फडके | Updated: February 15, 2021 16:07 IST

उत्तर प्रदेशमधील बिजनौर येथे किसान महापंचयातीला संबोधित करताना काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

ठळक मुद्देप्रियंका गांधींची भाजप सरकारवर जोरदार टीकाकृषी कायदे मागे घेण्याच्या मागणीचा पुनरुच्चारपंतप्रधान मोदींवरही केली टीका

बिजनौर : उत्तर प्रदेशमधील बिजनौर येथे किसान महापंचयातीला संबोधित करताना काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दोनवेळा देशवासीयांनी निवडून दिले. मात्र, जनतेच्या अपेक्षा पूर्ण करू शकले नाहीत. त्यांनी वारंवार रोजगार, शेतकऱ्यांच्या मुद्दे उपस्थित केले. परंतु, त्यांच्या राज्यात यासंदर्भात काहीच होताना दिसत नाही, असा आरोप प्रियंका गांधी यांनी यावेळी बोलताना केला. (priyanka gandhi criticised modi govt on farmers protest at bijnor kisan mahapanchayat)

उत्तर प्रदेशमधील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आतापासूनच कंबर कसली आहे. उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसची ताकद वाढवण्यासाठी प्रियंका गांधी मैदानात उतरल्या असून, त्या ठिकठिकाणी किसान महापंचायतीत सहभागी होऊन मोर्चा सांभाळत असल्याचे दिसत आहे. बिजनौर येथील महापंचायतमध्ये बोलताना त्या म्हणाल्या की, सन २०१७ पासून उसाचा दर वाढवण्यात आलेला नाही. शेतकऱ्यांची देणी मोदी सरकारने दिली नाहीत. मोदी सरकार १६ हजार कोटी रुपयांची विमाने खरेदी करू शकतात. मात्र, शेतकऱ्यांसाठी काही करत नाहीत, असा दावा प्रियंका गांधी यांनी केला आहे. 

कृषी कायदे उद्योगपतींसाठी

उद्योगपतींचा फायदा होण्यासाठी केंद्रीय कृषी कायदे तयार करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांचे पीक घ्यायचे की नाही, हे आता उद्योगपती ठरवणार आहेत. उद्योगपतींचे भले करण्यासाठी मोदी सरकार काम करत आहे. मात्र, शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकायला मोदी सरकारकडे वेळ नाही, अशी टीका प्रियंका गांधी यांनी केली. 

दिशा रविला पाकिस्तानचा पाठिंबा; मोदी सरकारवर केली जोरदार टीका

शेतकऱ्यांच्या भेटीसाठी वेळ नाही

पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका, चीन आणि पाकिस्तानच्या दौऱ्यावर जातात. मात्र, दिल्ली सीमेवरील शेतकऱ्यांची भेट घेण्यासाठी जात नाहीत. पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांची चेष्टा केली आहे. शेतकऱ्यांना आंदोलनजीवी, परजीवी म्हणाले. पंतप्रधान मोदींना देशभक्त आणि देशद्रोही यातील अंतर समजले नाही, असे प्रियंका गांधी यांनी सांगितले. 

कृषी कायदे मागे घ्या

पंतप्रधान मोदी, तुम्ही सत्तेत आहात. शेतकऱ्यांचा आदर करा. शेतकऱ्यांवर अन्याय करणारे कृषी कायदे मागे घ्या, या मागणीचा पुनरुच्चार प्रियंका गांधी यांनी यावेळी बोलताना केला. मोदी सरकारच्या कार्यकाळात गरिबांचे, शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले. श्रीमंतांची संपत्ती मात्र दुप्पट झाली, असा दावा करत शेतकरी आंदोलनात मृत्यू झालेल्यांविषयी सहवेदना प्रकट करून दोन मिनिटांचे मौन पाळण्यात आले. 

टॅग्स :PoliticsराजकारणPriyanka Gandhiप्रियंका गांधीcongressकाँग्रेसFarmers Protestशेतकरी आंदोलनBJPभाजपा