शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

उत्तर प्रदेशात आघाडीसाठी दरवाजे बंद केले नाहीत; सरचिटणीस प्रियांका गांधींचे स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2021 09:13 IST

भाजपला पराभूत करण्यासाठी आम्ही काहीही करू शकतो, असे काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी सांगितले.

लखनऊ :उत्तर प्रदेशमध्ये इतर पक्षांशी युती करण्याचे दरवाजे आम्ही बंद केलेले नाहीत. भाजपला पराभूत करण्यासाठी आम्ही काहीही करू शकतो, असे काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी सांगितले.

उत्तर प्रदेशमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर प्रियांका गांधी म्हणाल्या की, काँग्रेस पक्ष दुर्बल होईल असा कोणताही निर्णय आम्ही घेणार नाही. मात्र, कोणाशी युती करणार किंवा नाही याबद्दल इतक्या लवकर काही सांगणे योग्य होणार नाही. भाजपला पराभूत करणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे. आगामी काळातील स्थिती पाहूनच काँग्रेस आपली रणनीती ठरविणार आहे. त्यांनी सांगितले की, गेल्या दीड वर्षांच्या काळात काँग्रेसने उत्तर प्रदेशात खूप मेहनत घेऊन काम केले आहे. ग्रामपंचायतींच्या स्तरापर्यंत आपल्या कार्यकर्त्यांचे मजबूत जाळे विणले आहे. त्यामुळे काँग्रेस आता संपूर्ण ताकदीने निवडणुका लढवेल. 

प्रियांका गांधी या राजकीय पर्यटक आहेत अशी टीका भाजपच्या काही नेत्यांनी केली होती. त्याबद्दल प्रियांका गांधी म्हणाल्या की, मी उत्तर प्रदेशला वारंवार भेटी देत असते. मी व माझा भाऊ राहुल गांधी फारशा गांभीर्याने राजकारण करत नाही असा गैरसमज भाजप पसरवत असतो. मात्र, त्याकडे आम्ही अजिबात लक्ष देणार नाही. मी उत्तर प्रदेशकडे दुर्लक्ष करते असा खोडसाळ प्रचार भाजपकडून केला जातो. मात्र, गेल्या १८ महिन्यांत प्रत्येक महत्त्वाच्या प्रश्नावर काँग्रेसने आवाज उठविला आहे, हे नागरिकांना दिसून येईल.

भीती दूर करा 

प्रियांका गांधी यांनी शनिवारी सांगितले की, काँग्रेस कार्यकर्त्यांना मनातले भय बाजूला सारून २०२२ साली होणाऱ्या उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकांसाठी सज्ज व्हावे. त्यासाठी अहोरात्र काम करावे. नागरिकांच्या प्रश्नांवर २०१९ पासून काँग्रेसने रस्त्यावर उतरून संघर्ष केला आहे याची आठवणही त्यांनी करून दिली.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशElectionनिवडणूकcongressकाँग्रेसPriyanka Gandhiप्रियंका गांधी