शहरं
Join us  
Trending Stories
1
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
2
“सरन्यायाधीश भूषण गवई यांना हात जोडून विनंती आहे की...”; उद्धव ठाकरेंचे साकडे, प्रकरण काय?
3
ICICI बँकेचा यु-टर्न; अकाऊंटमध्ये ५० हजार रुपये नाही तर 'इतकी' रक्कम ठेवावी लागणार
4
इन्फोसिसचा ऑस्ट्रेलियात मोठा व्यवहार! १३०० कोटी रुपयांमध्ये खरेदी केली 'ही' कंपनी
5
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताची मिसाईल ताकद पाहून घाबरला पाकिस्तान; आता उचललं 'हे' मोठं पाऊल!
6
७९ वर्षांत असे दोन पंतप्रधान होऊन गेले, ज्यांच्या भाग्यात लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिन आलाच नाही...
7
नवाब मलिकांवर मोठी जबाबदारी; मुंबई महापालिका निवडणुकीबाबत अजित पवारांचा महत्त्वाचा निर्णय
8
Viral Video : काय म्हणावं यांना! लाबुबू डॉलची पूजा करू लागली महिला, म्हणाली "ही बाहुली नाही, तर..."
9
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Nifty २४,६०० च्या वर, IT-फार्मा शेअर्समध्ये मोठी खरेदी
10
राष्ट्रवादीमध्ये नव्या 'दादां'चा उदय! रोहित पवार अजितदादांची पोकळी भरून काढत आहेत का?
11
'फुले' सिनेमाच्या अपयशावर प्रतीक गांधीने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "जितकी अपेक्षा..."
12
पाकिस्तानचं स्वातंत्र्यदिनी हे कसलं सेलिब्रेशन... हवेत गोळीबार, तिघांचा मृत्यू, ६० जखमी
13
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
14
शिल्पा शिरोडकरच्या कारला बसची धडक, अभिनेत्रीने केली तक्रार; तर बस मालकांनी केली अरेरावी
15
आजचे राशीभविष्य : गुरुवार १४ ऑगस्ट २०२५; या ४ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो, काहींना मित्रांकडूनही लाभ होतील
16
लंडनच्या भूमीत १८ ऑगस्टला होणार ऐतिहासिक 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन'
17
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
18
फडणवीस, शिंदे, ठाकरे आज एका व्यासपीठावर..?; बीडीडीवासीयांचे पाऊल आज नव्या घरात
19
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई
20
मुनीर यांचा बाष्कळ थयथयाट, भारताविषयी वक्तव्ये करण्याआधी 'आका'ची परवानगी घेतली का?

Corona Vaccine: भारतीयांना प्राधान्य का दिले नाही? रेमडेसिवीर, कोरोना लस निर्यातीवरून प्रियंका गांधी कडाडल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2021 14:54 IST

Corona Vaccine: काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

ठळक मुद्देप्रियंका गांधींची केंद्रातील मोदी सरकारवर टीकाभारतीयांना प्राधान्य का दिले नाही? - प्रियंका गांधीपंतप्रधान मोदी निवडणूक प्रचारात व्यस्त - प्रियंका गांधी

नवी दिल्ली: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर देशात सुरू आहे. कोरोनाच्या गंभीर परिस्थितीवर उपाय म्हणून लसीकरणावर मोठ्या प्रमाणात भर दिला जात आहे. तसेच रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणीही वाढत चालली आहे. मात्र, कोरोना लस आणि रेमडेसिवीर इंजेक्शन या दोन्ही गोष्टींची देशात चणचण निर्माण झाली आहे. यातच काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. देशवासीयांना प्राधान्य का दिले नाही, असा सवाल प्रियंका गांधी यांनी केला आहे. (priyanka gandhi asked to modi govt that why were indians not prioritised)

गेल्या काही दिवसांपासून कोरोना लस आणि रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. केंद्र सरकारने यासंदर्भात निर्णय घेऊन निर्यातबंदी केली आहे. याच मुद्द्यावरून प्रियंका गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकारला घेरले आहे. एनआयए या वृत्तसंस्थेशी बोलताना प्रियंका गांधी यांनी टीका केली आहे. रेमडेसिवीरसाठी लोक वणवण फिरत आहेत. गेल्या सहा महिन्यात १० लाखांहून अधिक रेमडेसिवीरची निर्यात करण्यात आली. सरकारने गेल्या तीन महिन्यात सहा कोटी लसींची निर्यात केली, असे प्रियंका गांधी म्हणाल्या.

भारतीयांना प्राधान्य का दिले नाही?

देशातील तीन ते चार कोटी लोकांना लस देण्यात आली. तुम्ही देशवासियांना प्राधान्य का दिले नाही? तुम्ही प्रसिद्धीत व्यस्त आहात. कोरोनाची लस मॉरिशिअस, नेपाळला जात असल्याचे आम्ही पाहात होतो. तुम्ही सहा कोटी लस निर्यात केल्या आणि देशवासियांना तीन ते चार कोटी लस दिल्या. योग्य धोरण नसल्यानेच तुटवडा जाणवत आहे, अशी टीका प्रियंका गांधी यांनी केली.

गुड न्यूज! १८ वर्षांवरील सर्वांना कोरोनाची लस मोफत मिळणार; योगी सरकारचा निर्णय

कोरोनाच्या स्थितीकडे दुर्लक्ष

केंद्र सरकारकडे आठ ते नऊ महिने होते. दुसरी लाट येणार सांगत असतानाही सरकारने दुर्लक्ष केले. युद्धपातळीवर काम करत तुम्ही सुविधा निर्माण करू शकत होता. सध्या देशात फक्त २ हजार ट्रक ऑक्सिजनची वाहतूक करू शकतात. देशात ऑक्सिजन आहे, पण जिथे पोहचण्याची गरज आहे पोहोचत नाही, असा दावाही प्रियंका गांधी यांनी केला. 

“देशातील कोरोनाची परिस्थिती गंभीर, पंतप्रधान मोदींनी राजीनामा द्यावा”

पंतप्रधान मोदी निवडणुकीत व्यस्त

रुग्णलयांमध्ये सुविधा का वाढवली नाही, अशी विचारणा करत ते निवडणूक प्रचारात व्यस्त आहेत. स्टेजवर जाऊन हसत आहेत. देशभरात लोक मदत मागत असताना, रडत असताना तुम्ही हसू कसे शकता. हे सरकारचे अपयश आहे, असा आरोप प्रियंका गांधी यांनी केला.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसPriyanka Gandhiप्रियंका गांधीcongressकाँग्रेसPoliticsराजकारणprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदी