शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तुमची अनेक प्रकरणे पाहिली आहेत; बोललो तर उगाच...", CJI गवईंनी ईडीला फटकारले
2
गायिका मैथिली ठाकूरचा भाजपमध्ये प्रवेश! दुसऱ्या यादीत येणार नाव, कोणत्या मतदारसंघातून लढणार?
3
BJP Candidate list: भाजपने १० विद्यमान आमदारांची तिकिटं कापली, ५ जण आहेत माजी मंत्री; पहिल्या यादीमध्ये कोण?
4
३१ व्या मजल्यावरून पडला, चप्पल, मोबाईल सापडले २४ व्या मजल्यावर, तरुणाच्या मृत्यूचं गुढ वाढलं   
5
लष्कराकडून जेन-Z वर गोळीबार करण्यास नकार, जीव वाचवून राष्ट्रपती देशाबाहेर पसार, या देशात अराजक
6
वेस्ट इंडीजच्या नाकी नऊ आणणाऱ्या रवींद्र जडेजाची सचिन-सेहवागच्या विक्रमाशी बरोबरी!
7
...अन् हमासने बिपिन जोशीचा मृतदेहच सोपवला, लेकाच्या सुटकेसाठी अमेरिकेचेही दार ठोठावणाऱ्या आईवर मोठा 'आघात'
8
विक्रमी वाढ, चांदी १,९५,००० रुपयांवर, इतिहासात प्रथमच एका दिवसात १५,००० रुपयांनी महागली
9
अखेर मुहूर्त सापडला! वैभव खेडेकरांचा भाजपा प्रवेश झाला, मनसेला फटका, राजकीय समीकरणे बदलणार
10
स्वेटर, कानटोपी, हातमोजे अन् ब्लँकेट...! तयार रहा, ८६ टक्के हिमालयाला बर्फाने आच्छादले
11
भूतबाधा उतरवण्याच्या नावाखाली भोंदूबाबाचा महिलेवर बलात्कार; व्हिडिओ रेकॉर्ड करून ब्लॅकमेल!
12
टाटाची दिवाळीपूर्वीच शॉपिंग! जगात दबदबा वाढविण्यासाठी चिनी कंपनीच घेतली विकत
13
असाही असतो बॉस! कामाचा ताण नाही, फक्त मनसोक्त आराम; म्हणाले दिवाळीत २ किलो वजन वाढवून या
14
प्रेमानंद महाराजांना नेमका कोणता आजार झालाय? यात मृत्यूचा धोका आहे का? जाणून घ्या...
15
हवेतच कतार एअरवेजच्या विमानात बिघाड; अहमदाबादमध्ये इमर्जन्सी लँडिंग, मोठा अपघात टळला!
16
"महाराष्ट्रात राहायची लायकी नाही", बिकिनीतील फोटोंवर आक्षेपार्ह कमेंट, अभिनेत्रीचं सडेतोड उत्तर, म्हणाली...
17
LIC कडून दिवाळीचा 'डबल धमाका'! मध्यमवर्गीयांसाठी २ नवीन 'रिस्क फ्री' योजना लाँच, शेअर झाला रॉकेट
18
मंत्रिमंडळ मोठे निर्णय! बांबू उद्योग धोरण जाहीर, ५ लाख रोजगार; मुंबई HC मध्ये २२२८ पदांना मान्यता
19
राज ठाकरे पहिल्यांदाच ‘मविआ’ नेत्यांसोबत दिसले; CM फडणवीस म्हणाले, “भाजपा अन् महायुती...”
20
हरयाणात काय चाललंय? ASI ची गोळी झाडून आत्महत्या; दिवंगत IPS पूरन कुमार यांच्यावर गंभीर आरोप

Corona Vaccine: भारतीयांना प्राधान्य का दिले नाही? रेमडेसिवीर, कोरोना लस निर्यातीवरून प्रियंका गांधी कडाडल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2021 14:54 IST

Corona Vaccine: काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

ठळक मुद्देप्रियंका गांधींची केंद्रातील मोदी सरकारवर टीकाभारतीयांना प्राधान्य का दिले नाही? - प्रियंका गांधीपंतप्रधान मोदी निवडणूक प्रचारात व्यस्त - प्रियंका गांधी

नवी दिल्ली: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर देशात सुरू आहे. कोरोनाच्या गंभीर परिस्थितीवर उपाय म्हणून लसीकरणावर मोठ्या प्रमाणात भर दिला जात आहे. तसेच रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणीही वाढत चालली आहे. मात्र, कोरोना लस आणि रेमडेसिवीर इंजेक्शन या दोन्ही गोष्टींची देशात चणचण निर्माण झाली आहे. यातच काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. देशवासीयांना प्राधान्य का दिले नाही, असा सवाल प्रियंका गांधी यांनी केला आहे. (priyanka gandhi asked to modi govt that why were indians not prioritised)

गेल्या काही दिवसांपासून कोरोना लस आणि रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. केंद्र सरकारने यासंदर्भात निर्णय घेऊन निर्यातबंदी केली आहे. याच मुद्द्यावरून प्रियंका गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकारला घेरले आहे. एनआयए या वृत्तसंस्थेशी बोलताना प्रियंका गांधी यांनी टीका केली आहे. रेमडेसिवीरसाठी लोक वणवण फिरत आहेत. गेल्या सहा महिन्यात १० लाखांहून अधिक रेमडेसिवीरची निर्यात करण्यात आली. सरकारने गेल्या तीन महिन्यात सहा कोटी लसींची निर्यात केली, असे प्रियंका गांधी म्हणाल्या.

भारतीयांना प्राधान्य का दिले नाही?

देशातील तीन ते चार कोटी लोकांना लस देण्यात आली. तुम्ही देशवासियांना प्राधान्य का दिले नाही? तुम्ही प्रसिद्धीत व्यस्त आहात. कोरोनाची लस मॉरिशिअस, नेपाळला जात असल्याचे आम्ही पाहात होतो. तुम्ही सहा कोटी लस निर्यात केल्या आणि देशवासियांना तीन ते चार कोटी लस दिल्या. योग्य धोरण नसल्यानेच तुटवडा जाणवत आहे, अशी टीका प्रियंका गांधी यांनी केली.

गुड न्यूज! १८ वर्षांवरील सर्वांना कोरोनाची लस मोफत मिळणार; योगी सरकारचा निर्णय

कोरोनाच्या स्थितीकडे दुर्लक्ष

केंद्र सरकारकडे आठ ते नऊ महिने होते. दुसरी लाट येणार सांगत असतानाही सरकारने दुर्लक्ष केले. युद्धपातळीवर काम करत तुम्ही सुविधा निर्माण करू शकत होता. सध्या देशात फक्त २ हजार ट्रक ऑक्सिजनची वाहतूक करू शकतात. देशात ऑक्सिजन आहे, पण जिथे पोहचण्याची गरज आहे पोहोचत नाही, असा दावाही प्रियंका गांधी यांनी केला. 

“देशातील कोरोनाची परिस्थिती गंभीर, पंतप्रधान मोदींनी राजीनामा द्यावा”

पंतप्रधान मोदी निवडणुकीत व्यस्त

रुग्णलयांमध्ये सुविधा का वाढवली नाही, अशी विचारणा करत ते निवडणूक प्रचारात व्यस्त आहेत. स्टेजवर जाऊन हसत आहेत. देशभरात लोक मदत मागत असताना, रडत असताना तुम्ही हसू कसे शकता. हे सरकारचे अपयश आहे, असा आरोप प्रियंका गांधी यांनी केला.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसPriyanka Gandhiप्रियंका गांधीcongressकाँग्रेसPoliticsराजकारणprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदी