शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
2
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
3
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
4
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
5
“महाराष्ट्र विधानपरिषद देशासाठी आदर्श”; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे कौतुकोद्गार
6
Mamata Banerjee : "मी माफी मागते"; मेस्सीच्या कार्यक्रमातील गोंधळ पाहून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी नाराज
7
H-1B व्हिसाच्या नव्या नियमांवरुन ट्रम्पच गोत्यात, वॉशिंग्टन ते कॅलिफोर्नियापर्यंत १९ राज्यांनी कोर्टाचा दरवाजा ठोठावला
8
इंडिगोला आणखी एक धक्का; रांचीत लँडिंग दरम्यान 'टेल स्ट्राइक'; थोडक्यात वाचले ७० प्रवासी
9
सॉल्ट लेक स्टेडियम तोडफोडप्रकरणी आयोजकाला अटक, प्रेक्षकांनाही तिकिटाचे पैसे परत मिळणार!
10
WhatsApp कॉलवर बोलताय? तुमचं लोकेशन होऊ शकतं ट्रॅक; सुरक्षिततेसाठी ऑन करा 'ही' सेटिंग
11
"आम्ही थांबणार नाही..", दुसऱ्या बाळाच्या जन्माआधीच भारती सिंग करतेय तिसऱ्या बाळाचं प्लानिंग? पती हर्ष म्हणाला...
12
Stock Market Holidays: पुढच्या वर्षी १५ दिवस बंद राहणार शेअर बाजार, पाहा NSE मध्ये सुट्ट्या कधी, पाहा लिस्ट
13
कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी उपस्थित केलं भाजपाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह, म्हणाले, येथे सर्व निर्णय... 
14
जिथं वक्फचा वाद उफाळला, तिथे भाजपाला मिळाला 'ऐतिहासिक' विजय; केरळमध्ये हैराण करणारा निकाल
15
Gold-Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; १८ कॅरेट सोनंही १ लाखांच्या पार, मुंबई ते दिल्ली नवे दर काय?
16
“शरद पवारांना भारतरत्न पुरस्कार द्यावा”; राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाच्या खासदाराचे समर्थन
17
“विधान परिषदेतील नियम, परंपरा आणि चर्चांमुळे लोकशाही बळकट”: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
18
“विधान परिषदेतील गुणवत्तापूर्ण चर्चांचे दस्तऐवजीकरण म्हणजे लोकशाहीची खरी ताकद”: CM फडणवीस
19
Lionel Messi : Video - मेस्सी आला, ५ मिनिटांत गेला, फॅन्सचा पारा चढला; खुर्च्या फेकल्या, स्टेडियममध्ये तोडफोड
20
मेस्सीला पाहण्यासाठी इतकं महागडं तिकीट, राज्यपाल संतापले; राज्य सरकारकडून मागवला रिपोर्ट
Daily Top 2Weekly Top 5

Corona Vaccine: भारतीयांना प्राधान्य का दिले नाही? रेमडेसिवीर, कोरोना लस निर्यातीवरून प्रियंका गांधी कडाडल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2021 14:54 IST

Corona Vaccine: काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

ठळक मुद्देप्रियंका गांधींची केंद्रातील मोदी सरकारवर टीकाभारतीयांना प्राधान्य का दिले नाही? - प्रियंका गांधीपंतप्रधान मोदी निवडणूक प्रचारात व्यस्त - प्रियंका गांधी

नवी दिल्ली: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर देशात सुरू आहे. कोरोनाच्या गंभीर परिस्थितीवर उपाय म्हणून लसीकरणावर मोठ्या प्रमाणात भर दिला जात आहे. तसेच रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणीही वाढत चालली आहे. मात्र, कोरोना लस आणि रेमडेसिवीर इंजेक्शन या दोन्ही गोष्टींची देशात चणचण निर्माण झाली आहे. यातच काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. देशवासीयांना प्राधान्य का दिले नाही, असा सवाल प्रियंका गांधी यांनी केला आहे. (priyanka gandhi asked to modi govt that why were indians not prioritised)

गेल्या काही दिवसांपासून कोरोना लस आणि रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. केंद्र सरकारने यासंदर्भात निर्णय घेऊन निर्यातबंदी केली आहे. याच मुद्द्यावरून प्रियंका गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकारला घेरले आहे. एनआयए या वृत्तसंस्थेशी बोलताना प्रियंका गांधी यांनी टीका केली आहे. रेमडेसिवीरसाठी लोक वणवण फिरत आहेत. गेल्या सहा महिन्यात १० लाखांहून अधिक रेमडेसिवीरची निर्यात करण्यात आली. सरकारने गेल्या तीन महिन्यात सहा कोटी लसींची निर्यात केली, असे प्रियंका गांधी म्हणाल्या.

भारतीयांना प्राधान्य का दिले नाही?

देशातील तीन ते चार कोटी लोकांना लस देण्यात आली. तुम्ही देशवासियांना प्राधान्य का दिले नाही? तुम्ही प्रसिद्धीत व्यस्त आहात. कोरोनाची लस मॉरिशिअस, नेपाळला जात असल्याचे आम्ही पाहात होतो. तुम्ही सहा कोटी लस निर्यात केल्या आणि देशवासियांना तीन ते चार कोटी लस दिल्या. योग्य धोरण नसल्यानेच तुटवडा जाणवत आहे, अशी टीका प्रियंका गांधी यांनी केली.

गुड न्यूज! १८ वर्षांवरील सर्वांना कोरोनाची लस मोफत मिळणार; योगी सरकारचा निर्णय

कोरोनाच्या स्थितीकडे दुर्लक्ष

केंद्र सरकारकडे आठ ते नऊ महिने होते. दुसरी लाट येणार सांगत असतानाही सरकारने दुर्लक्ष केले. युद्धपातळीवर काम करत तुम्ही सुविधा निर्माण करू शकत होता. सध्या देशात फक्त २ हजार ट्रक ऑक्सिजनची वाहतूक करू शकतात. देशात ऑक्सिजन आहे, पण जिथे पोहचण्याची गरज आहे पोहोचत नाही, असा दावाही प्रियंका गांधी यांनी केला. 

“देशातील कोरोनाची परिस्थिती गंभीर, पंतप्रधान मोदींनी राजीनामा द्यावा”

पंतप्रधान मोदी निवडणुकीत व्यस्त

रुग्णलयांमध्ये सुविधा का वाढवली नाही, अशी विचारणा करत ते निवडणूक प्रचारात व्यस्त आहेत. स्टेजवर जाऊन हसत आहेत. देशभरात लोक मदत मागत असताना, रडत असताना तुम्ही हसू कसे शकता. हे सरकारचे अपयश आहे, असा आरोप प्रियंका गांधी यांनी केला.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसPriyanka Gandhiप्रियंका गांधीcongressकाँग्रेसPoliticsराजकारणprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदी